शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

जिल्ह्यातील 3 टक्के विद्यार्थ्यांनी अडविली शाळांची संचमान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:25 IST

चंद्रपूर : कोरोनामुळे अद्यापही शाळा सुरु झाल्या नाही. या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालकांनी केवळ विद्यार्थी संख्या गृहित धरुन संचमान्यता न ...

चंद्रपूर : कोरोनामुळे अद्यापही शाळा सुरु झाल्या नाही. या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालकांनी केवळ विद्यार्थी संख्या गृहित धरुन संचमान्यता न करता आधार कार्ड असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या गृहित धरुन संचमान्यता करण्याचे पत्र जाहिर केले आहे. त्यामुळे आधार अपडेट करण्याची प्रक्रीया सुरु युद्धपातळीवर सुरु असून ७२.७१ टक्के संचमान्यता पूर्ण झाली आहे. परंतु, अद्यापही जिल्ह्यातील सुमारे ३ टक्के विद्यार्थ्यांकडे आधार कार्डच नसल्याचे वास्तव आहे.

पहिली ते बारावीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड स्टुडंट पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक करण्यात आले आहे. जिल्ह्यातील साधारण: ९७ टक्के आधार कार्ड आहे. मात्र यातील अनेक विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमध्ये छोट्या-मोठ्या चुका आहेत. त्यामध्ये सुधारणा करुन स्टुडंट पोर्टलवर अपडेट करणे सुरु आहे. सध्यास्थितीत जिल्ह्यातील ७२. ७१ टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. ज्यांचे आधार कार्ड नाही. त्यांच्यासाठी तालुका स्तरावर कार्ड काढणे सुरु झाले आहे. शंभर टक्के आधार अपडेशनसाठी शिक्षण विभागाची धावपळ सुरु आहे.

बॉक्स

मुख्याध्यापकांची होतेय दमछाक

मार्च महिन्यांपासून शाळा बंद आहेत. मात्र तरीसुद्धा आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मुख्याध्यापकांची धावपड सुरु आहे. वारंवार विद्यार्थ्यांना व पालकांना सुचना देणे, कार्ड क्लेक्ट करणे, स्टुडंट पोर्टलवर अपलोड करणे या जबाबदारऱ्या मुख्याध्यापकाकडे देण्यात आल्या होत्या. त्या पार पाडताना लॅाकडाऊनमुळे सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे अपडेट कामाला गती मिळाली.

कोट

जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी आधार कार्ड काढले आहे. केवळ ४ ते चार टक्के विद्यार्थ्यांनी आधार कार्ड काढले नाही. आधार अपडेट करण्याचे काम सुरु आहे. जोपर्यंत आधार अपडेट होणार नाही. तोपर्यंत संचनामन्यता होणार नाही. असे पत्र संचालकांचे आले आहे.

- उल्हास नरड, शिक्षणाधिकारी, चंद्रपूर