शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

3 कोटी 44 हजार परत करावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 05:00 IST

२०१९ मध्ये केंद्र सरकारची पीएम किसान निधी योजना सुरू झाल्यानंतर नोंदणीचे निकष कठोर नव्हते. रेशन कार्डावरही नोंदणी करता येत होती. २०२० मध्ये आधारकार्डाची सक्ती झाली. आता लाभार्थी शेतकऱ्यांचे सर्व खाते आयकर विभागाच्या संकेतस्थळाशी जोडण्यात आले. प्रारंभी अटींमध्येच स्पष्टता नव्हती. आमचा काय दोष, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. 

ठळक मुद्देपीएम किसान सन्मान निधी योजना : अपात्र शेतकऱ्यांनी घेतला होता लाभ

n  राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना १ डिसेंबर २०१८ पासून देशात लागू करण्यात आली. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्ष चार महिन्यांच्या अंतराने दोन हजार रूपयांचे तीन समान हप्त्यांमध्ये सहा हजार रूपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. मात्र, जिल्ह्यातील ३ हजार ४६५ कर भरण्यास अपात्र शेतकऱ्यांनी तब्बल ३ कोटी ४४ हजारांचा लाभ घेतला, असा आक्षेप केंद्र शासनाने नोंदवला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून या शेतकऱ्यांना नोटीसा पाठवून वसुलीची कारवाई केली आहे. केंद्र सरकारने दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांचा योजनेत समावेश केला होता.  नंतर व्याप्ती वाढवून जमिनीचा विचार न करता सगळ्यांनाच योजनेत समाविष्ट केले होते. 

तालुकानिहाय करपात्र शेतकरीबल्लारपूर, २२९, भद्रावती ३०२, ब्रह्मपुरी २३१, चंद्रपूर २५२, चिमूर ३२९, गोंडपिपरी १११, जिवती ४५, कोरपना १३, मूल २१५, नागभीड २०७, पोंभुर्णा ११६, राजुरा ५६७, सावली ३०२, सिंदेवाही १०६ व वरोरा तालुक्यात ४४० असे एकूण ३ हजार ४६५ शेतकरी कर भरण्यास पात्र आहेत.

अपात्रची इतर कारणेजिल्ह्यात २ लाख ७२ हजार ६७९ शेतकऱ्यांनी योजनेसाठी पात्र ठरले. निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज तेव्हाच बाद करण्यात आले होते. रेशनकार्ड प्रत न जोडणे, स्वाक्षरी न करणे, जमिनीच्या पोटहिश्शांची चुकीची नोंद ही कारणे होती.  

दोष कुणाचा ? २०१९ मध्ये केंद्र सरकारची पीएम किसान निधी योजना सुरू झाल्यानंतर नोंदणीचे निकष कठोर नव्हते. रेशन कार्डावरही नोंदणी करता येत होती. २०२० मध्ये आधारकार्डाची सक्ती झाली. आता लाभार्थी शेतकऱ्यांचे सर्व खाते आयकर विभागाच्या संकेतस्थळाशी जोडण्यात आले. प्रारंभी अटींमध्येच स्पष्टता नव्हती. आमचा काय दोष, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. 

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात राज्य शासनाकडून आलेल्या आदेशांचे पालन केले जात आहे. अपात्र लाभार्थी शोधून प्रत्येक तहसीलस्तरावर अशा याद्या तयार करण्यात आल्या. - अजय गुल्हाणे, जिल्हाधिकारी, चंद्रपूर

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना