शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

२७९ अतिक्रमित पांदण रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

By admin | Updated: September 10, 2016 00:46 IST

रस्त्यांवर वाढलेले अतिक्रमण, पुढे सरकलेले शेतीचे धुरे या सर्व बाबींमुळे अरूंद झालेले ग्रामीण भागातील पांदणरस्ते अक्षरश: गुदमरायला लागले होते.

९० रस्त्यांना प्रतीक्षा : ४२३ किलोमीटर लांबीचे अतिक्रमण मोकळेचंद्रपूर : रस्त्यांवर वाढलेले अतिक्रमण, पुढे सरकलेले शेतीचे धुरे या सर्व बाबींमुळे अरूंद झालेले ग्रामीण भागातील पांदणरस्ते अक्षरश: गुदमरायला लागले होते. मात्र महसूल प्रशासनाने हाती घेतलेल्या उपक्रमामुळे जिल्ह्यातील तब्बल २७९ रस्ते मोकळे झाले आहेत. या रस्यांवरील एकूण मिळून ४२३ किलोमीटर लांबीचे अतिक्रम मोकळे करण्यात प्रशासनाला यश आले आहे.सुुवर्ण जयंती राजस्व अभियानाअंतर्गत महसूल विभागाने जिल्ह्यात हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत अतिक्रमण झालेले पांदणरस्ते, शेततळे तसेच शिवार रस्ते मोकळे झाले आहेत. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने सुवर्ण जयंती राजस्व अभियान सुरु केले होते. या अभियानाअंतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला होता.या उपक्रमाच्या प्रारंभी जिल्ह्यातील महसूल यंत्रणेने सर्वेक्षण करून अतिक्रमित पांदण रस्त्यांची माहिती घेतली होती. त्यात, ५६९ किलोमिटर लांबीचे ३७० पांदणरस्ते अतिक्रमित असल्याची बाब पुढे आली होती. अतिक्रमणामुळे अनेकांचे रस्तेही बंद झाल्याने शेतशिवारातील वहीवाटीसाठी मोठी अडचण होत होती. अतिक्रमण हटल्याने अडचण दूर झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)सर्वाधिक अतिक्रमण गोंडपिपरी तालुक्यात गोंडपिपरी तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे ९३ किलोमिटर लांबीचे अतिक्रमण असून ९ट रस्ते अतिक्रमेत झाल्याची बाब उघड झाली होती. त्यापाठोपाठ चंद्रपूर तालुक्यातील ६७ किलोमिटर लांबीच्या ४७ रस्त्यांवर अतिक्रमण आढळले. सुवर्ण जयंती राजस्व अभियानामुळे हे अतिक्रमण दूर झाले आहे. असे असले तरी जिल्ह्यातील १४५ किलोमिटर लांबीच्या ९० रस्त्यांवर अद्यापही शिल्लक आहे. येत्या काही महिण्यात हे रस्ते सुध्दा मोकळे होणार, असे महसूल यंत्रणेने कळविले आहे.