शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जिल्ह्यात २५० वाघ; नैसर्गिक अधिवास आला धोक्यात

By साईनाथ कुचनकार | Updated: July 29, 2024 16:38 IST

Chandrapur : २९ जुलै रोजी वाघ संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी केला जातो आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दरवर्षी २९ जुलै रोजी वाघ संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो. आज घडीला चंद्रपूर जिल्ह्यात २५० च्या वर वाघांचे वास्तव आहे. ताडोबामध्ये हमखास वाघांचे दर्शन होत असल्याने पर्यटकांची मोठी पसंती असते. मात्र जिल्ह्यात मागील काही वर्षांमध्ये वाघांना अधिवास कमी पडत आहे. परिणामी मानव वन्यजीव संघर्ष वाढत आहे. त्यामुळे ही बाब भविष्यासाठी मानव आणि वाघांनाही धोकादायक ठरू शकते. मागील काही वर्षांमध्ये मानवी गरजांसाठी जंगलांची तोडणी केली जात आहे. जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. वाघांच्या घरांमध्ये मानवाने अतिक्रमण केल्यामुळे वाघांच्या नैसर्गिक अधिवास धोक्यात आला आहे.

असे आहे वाघांचे वास्तवजिल्ह्यात आजमितीस २५० च्या घरात वाघ आहेत. यामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर-बफर क्षेत्रात जवळपास १० अधिक वाघ आहेत. ब्रह्मपुरी एकट्या प्रादेशिक वनक्षेत्रात ७० ते ८० वाघ आहे. त्याशिवाय मध्य चांदा वनविभाग क्षेत्रात १५- २० आणि चंद्रपूर वनविभाग अंतर्गत वनक्षेत्रात २०ते २५ वाघ आहे. याशिवाय कन्हारगाव अभयारण्यामध्ये १० ते १२ वाघ, तर घोडाझरी अभयारण्यमध्येसुद्धा अनेक वाघ आहेत. एफडीसीएमच्या वनक्षेत्रात १० ते १५ वाधाची संख्या आहे.

हमखास वाघांचे दर्शनचंद्रपूर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांना एक नजर बघण्यासाठी देशातीलच नाहीं तर विदेशातीलही पर्यटक मोठ्या संख्येने येतात. येथे हमखास वाघाचे दर्शन होते.

वाघ आपले अधिवास बदलतोय"वाढत्या वाघांच्या संख्येसोबत त्यांना आवश्यक अधिवास कमी पडत आहे. त्यामुळे वाघाचा आपसातील संघर्ष वाढू लागला आहे. वाघांकडूनसुद्धा नवा अधिवास स्वीकारला जात आहे. यात विविध कारखान्याचे औद्योगिक क्षेत्र जसे सीटीपीएस, वेकोलिचे क्षेत्र आणि नदीपात्रांतील झाडेझुटूप असलेले क्षेत्रसुद्धा स्वीकारले जात आहे."- बंडू धोतरे वन्यजीव अभ्यासक, चंद्रपूर

मानव - वन्यजीव संघर्ष वाढला चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केल्यास दररोज वाघ-मानव संघर्षाच्या घटना घडत आहे. व्याघ्र जिल्हा म्हणून नावारूपास येताना वाढलेले वाघ आता वाघ - मानव संघर्षाच्या रूपाने मोठी समस्या निर्माण झाली आहे. पूर्वी ताडोबाचे जंगल आणि काही ठराविक जंगलात असलेले वाद्यांचा आज जिल्ह्यात सर्वत्र सर्वदूर असलेल्या वनक्षेत्रात वावर दिसून येतात. 

टॅग्स :wildlifeवन्यजीवTigerवाघchandrapur-acचंद्रपूर