शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २५० वाघ; नैसर्गिक अधिवास आला धोक्यात

By साईनाथ कुचनकार | Updated: July 29, 2024 16:38 IST

Chandrapur : २९ जुलै रोजी वाघ संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी केला जातो आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दरवर्षी २९ जुलै रोजी वाघ संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो. आज घडीला चंद्रपूर जिल्ह्यात २५० च्या वर वाघांचे वास्तव आहे. ताडोबामध्ये हमखास वाघांचे दर्शन होत असल्याने पर्यटकांची मोठी पसंती असते. मात्र जिल्ह्यात मागील काही वर्षांमध्ये वाघांना अधिवास कमी पडत आहे. परिणामी मानव वन्यजीव संघर्ष वाढत आहे. त्यामुळे ही बाब भविष्यासाठी मानव आणि वाघांनाही धोकादायक ठरू शकते. मागील काही वर्षांमध्ये मानवी गरजांसाठी जंगलांची तोडणी केली जात आहे. जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. वाघांच्या घरांमध्ये मानवाने अतिक्रमण केल्यामुळे वाघांच्या नैसर्गिक अधिवास धोक्यात आला आहे.

असे आहे वाघांचे वास्तवजिल्ह्यात आजमितीस २५० च्या घरात वाघ आहेत. यामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर-बफर क्षेत्रात जवळपास १० अधिक वाघ आहेत. ब्रह्मपुरी एकट्या प्रादेशिक वनक्षेत्रात ७० ते ८० वाघ आहे. त्याशिवाय मध्य चांदा वनविभाग क्षेत्रात १५- २० आणि चंद्रपूर वनविभाग अंतर्गत वनक्षेत्रात २०ते २५ वाघ आहे. याशिवाय कन्हारगाव अभयारण्यामध्ये १० ते १२ वाघ, तर घोडाझरी अभयारण्यमध्येसुद्धा अनेक वाघ आहेत. एफडीसीएमच्या वनक्षेत्रात १० ते १५ वाधाची संख्या आहे.

हमखास वाघांचे दर्शनचंद्रपूर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांना एक नजर बघण्यासाठी देशातीलच नाहीं तर विदेशातीलही पर्यटक मोठ्या संख्येने येतात. येथे हमखास वाघाचे दर्शन होते.

वाघ आपले अधिवास बदलतोय"वाढत्या वाघांच्या संख्येसोबत त्यांना आवश्यक अधिवास कमी पडत आहे. त्यामुळे वाघाचा आपसातील संघर्ष वाढू लागला आहे. वाघांकडूनसुद्धा नवा अधिवास स्वीकारला जात आहे. यात विविध कारखान्याचे औद्योगिक क्षेत्र जसे सीटीपीएस, वेकोलिचे क्षेत्र आणि नदीपात्रांतील झाडेझुटूप असलेले क्षेत्रसुद्धा स्वीकारले जात आहे."- बंडू धोतरे वन्यजीव अभ्यासक, चंद्रपूर

मानव - वन्यजीव संघर्ष वाढला चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केल्यास दररोज वाघ-मानव संघर्षाच्या घटना घडत आहे. व्याघ्र जिल्हा म्हणून नावारूपास येताना वाढलेले वाघ आता वाघ - मानव संघर्षाच्या रूपाने मोठी समस्या निर्माण झाली आहे. पूर्वी ताडोबाचे जंगल आणि काही ठराविक जंगलात असलेले वाद्यांचा आज जिल्ह्यात सर्वत्र सर्वदूर असलेल्या वनक्षेत्रात वावर दिसून येतात. 

टॅग्स :wildlifeवन्यजीवTigerवाघchandrapur-acचंद्रपूर