शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आरोग्य सेवेसाठी पुन्हा नवीन 23 रुग्णवाहिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2021 05:00 IST

कोविड-१९ च्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य प्रसार व प्रादुर्भाव थोपविण्याकरिता या रुग्णवाहिकांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असणार आहे. कोरोना  विषाणूच्या पार्श्वभूमीवर  जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी व दुर्गम भागातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी या रुग्णवाहिकांची मदत होणार आहे. २३ रुग्णवाहिकांपैकी २० रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्राला तर उर्वरित ३ रुग्णवाहिका जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोविड संक्रमणाच्या काळात रुग्णवाहिकांची संख्या वाढविल्यानंतर पुन्हा २३ अद्ययावत २३ रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत दाखल झाल्या. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते मंगळवारी  रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा पोलीस ग्राउंड, चंद्रपूर येथे पार पडला. या रुग्णवाहिकांमुळे आरोग्य सेवा विस्तारात मोठी वाढ झाली.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कोविड-१९ च्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य प्रसार व प्रादुर्भाव थोपविण्याकरिता या रुग्णवाहिकांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असणार आहे. कोरोना  विषाणूच्या पार्श्वभूमीवर  जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी व दुर्गम भागातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी या रुग्णवाहिकांची मदत होणार आहे. २३ रुग्णवाहिकांपैकी २० रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्राला तर उर्वरित ३ रुग्णवाहिका जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने आतापर्यंत जिल्ह्याला ४७  रुग्णवाहिका व ३० लसीकरण वाहने अशी एकूण ७७ वाहने आरोग्य सेवेसाठी उपलब्ध झाली आहेत. त्यापैकी २० रुग्णवाहिका खनिज निधीतून, ७ रुग्णवाहिका राज्य शासनाकडून, २७ रुग्णवाहिका महापारेषण विभागाकडून तर २३ रुग्णवाहिका राज्य शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत. 

१ हजार ३५० शाळा सुरू - दीड वर्षानंतर प्राथमिक व माध्यमिक मिळून  १३५० शाळा सुरू करण्यात आल्या. पहिल्या दिवशी १ लाख ५ हजार ६११ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. - शाळा सुरू करण्याअगोदर शिक्षकांचे लसीकरण करण्यात आले.-  ११ हजार ५५१ शिक्षकांपैकी ११ हजार ३१० शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी धान खरेदी, रबी  उपाययोजना, घरकुल व डाटा एन्ट्री ऑपरेटर, वणी, वरोरा– माढेळी वळण रस्ता भूसंपादन तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत आढावा घेण्यात आला.

मुबलक प्रमाणात  युरिया उपलब्ध रबी हंगामात युरिया तुटवडा भासणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी रबी उपाययोजना बैठकीत दिली. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, पणन अधिकारी अनिल गोगिरवार, जिल्हा पुरवठा अधिकारी शालिकराम भराडी उपस्थित होते. खरीप हंगामात ५९,५०८ टन तर रबी हंगामात २८,८९४ टन युरिया उपलब्ध झाला आहे,  पणन महासंघाकडून २७ हजार ८७० शेतकऱ्यांकडून ८ लाख  ७० हजार क्विंटल तर आदिवासी सोसायटीकडून ३ लाख २० हजार क्विंटल धान खरेदी झाल्याची माहिती देण्यात आली. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार