शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

२२ रेतीघाटांना ग्रामसभा मंजुरीची प्रतीक्षा

By admin | Updated: November 24, 2014 22:53 IST

गतवर्षी लिलाव झालेल्या रेतीघाटाची मुदत ३० सप्टेंबरला संपली आहे. यावर्षी खनिकर्म विभागाने जिल्ह्यातील १७३ रेतीघाट लिलावासाठी प्रस्तावित केले होते. यापैकी ५८ घाटांचा लिलाव होणार

५८ रेतीघाटांचे होणार लिलाव : १० कोटी रुपयांवर मिळणार महसूल मंगेश भांडेकर - चंद्रपूरगतवर्षी लिलाव झालेल्या रेतीघाटाची मुदत ३० सप्टेंबरला संपली आहे. यावर्षी खनिकर्म विभागाने जिल्ह्यातील १७३ रेतीघाट लिलावासाठी प्रस्तावित केले होते. यापैकी ५८ घाटांचा लिलाव होणार असून गतवर्षीच्या तुलनेत १५ अतिरीक्त घाटाचे लिलाव होणार आहे. प्रस्तावित १७३ घाटांपैकी सर्व्हेक्षणात ८२ घाट वगळून ९१ रेतीघाट प्रस्तावित करण्यात आले. या ९३ घाटांपैैकी आतापर्यंत ३६ रेतीघाटांना ग्रामसभेची मंजुरी मिळाली आहे. तर उर्वरित २२ रेतीघाटांनाही ग्रामसभेच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती खनिकर्म विभागाने दिली आहे. ५८ रेतीघाटांच्या माध्यमातून जिल्ह्याला १० कोटी रुपयांच्यावर महसूल मिळणार आहे.जिल्ह्यातील रेतीघाटांचे लिलाव न झाल्याने अनेक ठिकाणी अवैध रेती उपसा सुरु आहे. महसूल विभागाकडून अवैध रेती उपश्यावर नजर असली तरी चुप्या मार्गाने रेतीचोरी सुरुच आहे. आठ दिवसांपुर्वीच भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा रेती घाटातून अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला तीन तलाठ्यांनी अडविले. त्यानंतर ट्रॅक्टर मालकासह मजुरांनी तलाठ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. अशा घटनांवर आळा घालण्यासाठी रेतीघाटांचे लिलाव तत्काळ करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे. जिल्हा खनिकर्म विभागाने रेती घाट लिलावाचे प्रस्ताव पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविले असून मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविताच रेती घाटांचे लिलाव होणार आहे. डिसेंबर महिन्यात रेती घाटांचे लिलाव होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नदी, नाले असून मुबलक प्रमाणात रेतीसाठा उपलब्ध आहे. ३० सप्टेंबरला रेतीघाट उपशाची मुदत संपली असतानाही अनेक घाटांवरुन रेती उपसा सुरु आहे. यावर्षी कमी पाऊस पडल्याने रेती उपश्यावर काही प्रमाणात परिणाम पडला आहे. तर ज्या रेती घाटांच्या १ किमी परिसरात बंधारा, पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत झाली आहे, त्या रेतीघाटांना वगळण्यात आले आहे. गतवर्षी जिल्ह्यात ४६ रेती घाटांचे लिलाव झाले होते. या रेतीघाटातून ९ कोटी रुपयांचा महसूल जिल्हा प्रशासनाला मिळाला होता. यावर्षी ५८ रेती घाटांचा लिलाव होणार असल्याने जिल्हा प्रशासनाच्या महसूलात आणखी वाढ होणार आहे. मात्र, रेतीघाटांच्या लिलावासाठी पर्यावरण मंत्रालयाच्या परवानगीची आवश्यकता आहे. अवैध रेती उपसा सुरुच३० सप्टेंबरला मुदत संपणाऱ्या अनेक रेती घाटांवरुन आजही छुप्या मार्गाने रेती उपसा सुरुच आहे. मूल तालुक्यात मूल येथील उभा व बोरचांदली नदीच्या पुलाजवळील वाळूची तस्करी केली जात आहे. त्यामुळे सदर पूल कोसळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. याकडे तालुका प्रशासन गांभीर्याने लक्ष देण्यापेक्षा वाळू तस्करांना संरक्षण देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. असाच प्रकार इतरही तालुक्यात सुरु आहे. महसूल विभागाचे अधिकारी कारवाई करण्यास गेले तर त्यांच्यावरच प्राणघातक हल्ले होत असल्याने अधिकारीही कारवाई करण्यास धजावतात.