शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

२२ रेतीघाटांना ग्रामसभा मंजुरीची प्रतीक्षा

By admin | Updated: November 24, 2014 22:53 IST

गतवर्षी लिलाव झालेल्या रेतीघाटाची मुदत ३० सप्टेंबरला संपली आहे. यावर्षी खनिकर्म विभागाने जिल्ह्यातील १७३ रेतीघाट लिलावासाठी प्रस्तावित केले होते. यापैकी ५८ घाटांचा लिलाव होणार

५८ रेतीघाटांचे होणार लिलाव : १० कोटी रुपयांवर मिळणार महसूल मंगेश भांडेकर - चंद्रपूरगतवर्षी लिलाव झालेल्या रेतीघाटाची मुदत ३० सप्टेंबरला संपली आहे. यावर्षी खनिकर्म विभागाने जिल्ह्यातील १७३ रेतीघाट लिलावासाठी प्रस्तावित केले होते. यापैकी ५८ घाटांचा लिलाव होणार असून गतवर्षीच्या तुलनेत १५ अतिरीक्त घाटाचे लिलाव होणार आहे. प्रस्तावित १७३ घाटांपैकी सर्व्हेक्षणात ८२ घाट वगळून ९१ रेतीघाट प्रस्तावित करण्यात आले. या ९३ घाटांपैैकी आतापर्यंत ३६ रेतीघाटांना ग्रामसभेची मंजुरी मिळाली आहे. तर उर्वरित २२ रेतीघाटांनाही ग्रामसभेच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती खनिकर्म विभागाने दिली आहे. ५८ रेतीघाटांच्या माध्यमातून जिल्ह्याला १० कोटी रुपयांच्यावर महसूल मिळणार आहे.जिल्ह्यातील रेतीघाटांचे लिलाव न झाल्याने अनेक ठिकाणी अवैध रेती उपसा सुरु आहे. महसूल विभागाकडून अवैध रेती उपश्यावर नजर असली तरी चुप्या मार्गाने रेतीचोरी सुरुच आहे. आठ दिवसांपुर्वीच भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा रेती घाटातून अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला तीन तलाठ्यांनी अडविले. त्यानंतर ट्रॅक्टर मालकासह मजुरांनी तलाठ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. अशा घटनांवर आळा घालण्यासाठी रेतीघाटांचे लिलाव तत्काळ करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे. जिल्हा खनिकर्म विभागाने रेती घाट लिलावाचे प्रस्ताव पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविले असून मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविताच रेती घाटांचे लिलाव होणार आहे. डिसेंबर महिन्यात रेती घाटांचे लिलाव होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नदी, नाले असून मुबलक प्रमाणात रेतीसाठा उपलब्ध आहे. ३० सप्टेंबरला रेतीघाट उपशाची मुदत संपली असतानाही अनेक घाटांवरुन रेती उपसा सुरु आहे. यावर्षी कमी पाऊस पडल्याने रेती उपश्यावर काही प्रमाणात परिणाम पडला आहे. तर ज्या रेती घाटांच्या १ किमी परिसरात बंधारा, पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत झाली आहे, त्या रेतीघाटांना वगळण्यात आले आहे. गतवर्षी जिल्ह्यात ४६ रेती घाटांचे लिलाव झाले होते. या रेतीघाटातून ९ कोटी रुपयांचा महसूल जिल्हा प्रशासनाला मिळाला होता. यावर्षी ५८ रेती घाटांचा लिलाव होणार असल्याने जिल्हा प्रशासनाच्या महसूलात आणखी वाढ होणार आहे. मात्र, रेतीघाटांच्या लिलावासाठी पर्यावरण मंत्रालयाच्या परवानगीची आवश्यकता आहे. अवैध रेती उपसा सुरुच३० सप्टेंबरला मुदत संपणाऱ्या अनेक रेती घाटांवरुन आजही छुप्या मार्गाने रेती उपसा सुरुच आहे. मूल तालुक्यात मूल येथील उभा व बोरचांदली नदीच्या पुलाजवळील वाळूची तस्करी केली जात आहे. त्यामुळे सदर पूल कोसळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. याकडे तालुका प्रशासन गांभीर्याने लक्ष देण्यापेक्षा वाळू तस्करांना संरक्षण देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. असाच प्रकार इतरही तालुक्यात सुरु आहे. महसूल विभागाचे अधिकारी कारवाई करण्यास गेले तर त्यांच्यावरच प्राणघातक हल्ले होत असल्याने अधिकारीही कारवाई करण्यास धजावतात.