शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

200 कोटींची ‘पाईप कन्व्हेअर सिस्टीम’ सहा महिन्यांपासून बंद; चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राला मोठा फटका

By राजेश भोजेकर | Updated: August 18, 2023 11:22 IST

साधारणत: पावणेदोन वर्षापूर्वी १४ नोव्हेंबर २०२१ रोजी भटाळी कोळसा खाणीतून चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन (सीएसटीपीएस) पर्यंत कोळशाच्या थेट वाहतुकीसाठी अत्याधुनिक पाईप कन्व्हेअर सिस्टीम ही नवीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.

चंद्रपूर : पर्यावरणपूरक वीज निर्मितीसाठी ऊर्जा मंत्रालयाने वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या भटाळी कोळसा खाणीतून चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन (सीएसटीपीएस) पर्यंत कोळशाच्या थेट वाहतुकीसाठी सुमारे २०० कोटींचा अवाढव्य खर्च करून ६ किलोमीटरच्या पाईप कन्व्हेअर सिस्टीम ही नवीन यंत्रणा पावणेदोन वर्षापूर्वी बसवली. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे सहा महिन्यांपासून पाईप कन्व्हेअर सिस्टीम बंद असल्याने वीज केंद्राला सहा हजार मेट्रिक टन कोळसा ट्रक वाहतुकीतून वीज केंद्रापर्यंत आणावा लागत आहे. यामुळे वीज केंद्राला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

साधारणत: पावणेदोन वर्षापूर्वी १४ नोव्हेंबर २०२१ रोजी भटाळी कोळसा खाणीतून चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन (सीएसटीपीएस) पर्यंत कोळशाच्या थेट वाहतुकीसाठी अत्याधुनिक पाईप कन्व्हेअर सिस्टीम ही नवीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. राज्याचे तत्कालीन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या सहा किलोमीटर लांबीच्या आधुनिक पाईप कन्व्हेअर सिस्टमचे लोकार्पण केले मोठा गाजावाजा करत केले होते. विशेष म्हणजे जवळपास २०० कोटींचा खर्च करून ही यंत्रणा उभारण्यात आली. या प्रकल्पाची प्रतिदिन ६ हजार मेट्रिक टन कोळसा वाहून नेण्याची क्षमता आहे. ‘पाईप कन्व्हेअर सिस्टीम’ ही खाणींपासून ऊर्जा प्रकल्पापर्यंत कोळसा वाहतुकीची आधुनिक, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक पद्धत आहे. महाराष्ट्रातील हा एकमेव प्रयोग होता.

कोळसा चोरी टाळण्यासाठी तसेच कमी वाहतूक खर्चात वीज प्रकल्पांना कोळशाची खात्रीशीर गुणवत्ता आणि प्रमाण सुलभ करण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाने २०० कोटींचा खर्च करून ही यंत्रणा उभी केली. मात्र, मागील सहा महिन्यांपासून पाईप कन्व्हेअर सिस्टीम तांत्रिक कारणांमुळे बंद आहे. त्याचा परिणाम वीज केंद्राला दररोज या माध्यमातून होणारा सहा हजार मेट्रिक टन कोळसा पुरवठा आता ट्रक वाहतुकीतून करावा लागत आहे. यामुळे वीज केंद्राला वाहतुकीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहे. दुसरीकडे संपूर्ण ‘पाईप कन्व्हेअर सिस्टीम’ बंद पडलेली असल्याने त्याची यंत्रसामुग्री खराब होत असल्याचा आरोप आता होत आहे. यासंदर्भात वीज केंद्राचे मुख्य अभियंता गिरीश कुमारवार यांना विचारणा केली असता, पाईप कन्व्हेअरमध्ये लाेखंडी वस्तू सापडल्याने सिस्टिम बंद पडली. तेव्हापासून ही यंत्रणा तांत्रिक कारणामुळे बंद आहे. यंत्रणा पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. येत्या काही महिन्यात ही सिस्टीम पूर्ववत सुरू होईल असेही कुमारवार यांनी सांगितले.

टॅग्स :electricityवीज