शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

200 कोटींची ‘पाईप कन्व्हेअर सिस्टीम’ सहा महिन्यांपासून बंद; चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राला मोठा फटका

By राजेश भोजेकर | Updated: August 18, 2023 11:22 IST

साधारणत: पावणेदोन वर्षापूर्वी १४ नोव्हेंबर २०२१ रोजी भटाळी कोळसा खाणीतून चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन (सीएसटीपीएस) पर्यंत कोळशाच्या थेट वाहतुकीसाठी अत्याधुनिक पाईप कन्व्हेअर सिस्टीम ही नवीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.

चंद्रपूर : पर्यावरणपूरक वीज निर्मितीसाठी ऊर्जा मंत्रालयाने वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या भटाळी कोळसा खाणीतून चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन (सीएसटीपीएस) पर्यंत कोळशाच्या थेट वाहतुकीसाठी सुमारे २०० कोटींचा अवाढव्य खर्च करून ६ किलोमीटरच्या पाईप कन्व्हेअर सिस्टीम ही नवीन यंत्रणा पावणेदोन वर्षापूर्वी बसवली. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे सहा महिन्यांपासून पाईप कन्व्हेअर सिस्टीम बंद असल्याने वीज केंद्राला सहा हजार मेट्रिक टन कोळसा ट्रक वाहतुकीतून वीज केंद्रापर्यंत आणावा लागत आहे. यामुळे वीज केंद्राला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

साधारणत: पावणेदोन वर्षापूर्वी १४ नोव्हेंबर २०२१ रोजी भटाळी कोळसा खाणीतून चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन (सीएसटीपीएस) पर्यंत कोळशाच्या थेट वाहतुकीसाठी अत्याधुनिक पाईप कन्व्हेअर सिस्टीम ही नवीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. राज्याचे तत्कालीन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या सहा किलोमीटर लांबीच्या आधुनिक पाईप कन्व्हेअर सिस्टमचे लोकार्पण केले मोठा गाजावाजा करत केले होते. विशेष म्हणजे जवळपास २०० कोटींचा खर्च करून ही यंत्रणा उभारण्यात आली. या प्रकल्पाची प्रतिदिन ६ हजार मेट्रिक टन कोळसा वाहून नेण्याची क्षमता आहे. ‘पाईप कन्व्हेअर सिस्टीम’ ही खाणींपासून ऊर्जा प्रकल्पापर्यंत कोळसा वाहतुकीची आधुनिक, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक पद्धत आहे. महाराष्ट्रातील हा एकमेव प्रयोग होता.

कोळसा चोरी टाळण्यासाठी तसेच कमी वाहतूक खर्चात वीज प्रकल्पांना कोळशाची खात्रीशीर गुणवत्ता आणि प्रमाण सुलभ करण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाने २०० कोटींचा खर्च करून ही यंत्रणा उभी केली. मात्र, मागील सहा महिन्यांपासून पाईप कन्व्हेअर सिस्टीम तांत्रिक कारणांमुळे बंद आहे. त्याचा परिणाम वीज केंद्राला दररोज या माध्यमातून होणारा सहा हजार मेट्रिक टन कोळसा पुरवठा आता ट्रक वाहतुकीतून करावा लागत आहे. यामुळे वीज केंद्राला वाहतुकीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहे. दुसरीकडे संपूर्ण ‘पाईप कन्व्हेअर सिस्टीम’ बंद पडलेली असल्याने त्याची यंत्रसामुग्री खराब होत असल्याचा आरोप आता होत आहे. यासंदर्भात वीज केंद्राचे मुख्य अभियंता गिरीश कुमारवार यांना विचारणा केली असता, पाईप कन्व्हेअरमध्ये लाेखंडी वस्तू सापडल्याने सिस्टिम बंद पडली. तेव्हापासून ही यंत्रणा तांत्रिक कारणामुळे बंद आहे. यंत्रणा पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. येत्या काही महिन्यात ही सिस्टीम पूर्ववत सुरू होईल असेही कुमारवार यांनी सांगितले.

टॅग्स :electricityवीज