शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

200 कोटींची ‘पाईप कन्व्हेअर सिस्टीम’ सहा महिन्यांपासून बंद; चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राला मोठा फटका

By राजेश भोजेकर | Updated: August 18, 2023 11:22 IST

साधारणत: पावणेदोन वर्षापूर्वी १४ नोव्हेंबर २०२१ रोजी भटाळी कोळसा खाणीतून चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन (सीएसटीपीएस) पर्यंत कोळशाच्या थेट वाहतुकीसाठी अत्याधुनिक पाईप कन्व्हेअर सिस्टीम ही नवीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.

चंद्रपूर : पर्यावरणपूरक वीज निर्मितीसाठी ऊर्जा मंत्रालयाने वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या भटाळी कोळसा खाणीतून चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन (सीएसटीपीएस) पर्यंत कोळशाच्या थेट वाहतुकीसाठी सुमारे २०० कोटींचा अवाढव्य खर्च करून ६ किलोमीटरच्या पाईप कन्व्हेअर सिस्टीम ही नवीन यंत्रणा पावणेदोन वर्षापूर्वी बसवली. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे सहा महिन्यांपासून पाईप कन्व्हेअर सिस्टीम बंद असल्याने वीज केंद्राला सहा हजार मेट्रिक टन कोळसा ट्रक वाहतुकीतून वीज केंद्रापर्यंत आणावा लागत आहे. यामुळे वीज केंद्राला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

साधारणत: पावणेदोन वर्षापूर्वी १४ नोव्हेंबर २०२१ रोजी भटाळी कोळसा खाणीतून चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन (सीएसटीपीएस) पर्यंत कोळशाच्या थेट वाहतुकीसाठी अत्याधुनिक पाईप कन्व्हेअर सिस्टीम ही नवीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. राज्याचे तत्कालीन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या सहा किलोमीटर लांबीच्या आधुनिक पाईप कन्व्हेअर सिस्टमचे लोकार्पण केले मोठा गाजावाजा करत केले होते. विशेष म्हणजे जवळपास २०० कोटींचा खर्च करून ही यंत्रणा उभारण्यात आली. या प्रकल्पाची प्रतिदिन ६ हजार मेट्रिक टन कोळसा वाहून नेण्याची क्षमता आहे. ‘पाईप कन्व्हेअर सिस्टीम’ ही खाणींपासून ऊर्जा प्रकल्पापर्यंत कोळसा वाहतुकीची आधुनिक, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक पद्धत आहे. महाराष्ट्रातील हा एकमेव प्रयोग होता.

कोळसा चोरी टाळण्यासाठी तसेच कमी वाहतूक खर्चात वीज प्रकल्पांना कोळशाची खात्रीशीर गुणवत्ता आणि प्रमाण सुलभ करण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाने २०० कोटींचा खर्च करून ही यंत्रणा उभी केली. मात्र, मागील सहा महिन्यांपासून पाईप कन्व्हेअर सिस्टीम तांत्रिक कारणांमुळे बंद आहे. त्याचा परिणाम वीज केंद्राला दररोज या माध्यमातून होणारा सहा हजार मेट्रिक टन कोळसा पुरवठा आता ट्रक वाहतुकीतून करावा लागत आहे. यामुळे वीज केंद्राला वाहतुकीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहे. दुसरीकडे संपूर्ण ‘पाईप कन्व्हेअर सिस्टीम’ बंद पडलेली असल्याने त्याची यंत्रसामुग्री खराब होत असल्याचा आरोप आता होत आहे. यासंदर्भात वीज केंद्राचे मुख्य अभियंता गिरीश कुमारवार यांना विचारणा केली असता, पाईप कन्व्हेअरमध्ये लाेखंडी वस्तू सापडल्याने सिस्टिम बंद पडली. तेव्हापासून ही यंत्रणा तांत्रिक कारणामुळे बंद आहे. यंत्रणा पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. येत्या काही महिन्यात ही सिस्टीम पूर्ववत सुरू होईल असेही कुमारवार यांनी सांगितले.

टॅग्स :electricityवीज