शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

आमडी उपसा सिंचन योजनेचा २० वर्षांचा वनवास संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:18 IST

१० गावांतील शेतकऱ्यांची जमीन येणार सिंचनाखाली : २० वर्षात १९.३९ कोटींची योजना पोहचली ९९ कोटींवर मंगल जीवने बल्लारपूर : ...

१० गावांतील शेतकऱ्यांची जमीन येणार सिंचनाखाली : २० वर्षात १९.३९ कोटींची योजना पोहचली ९९ कोटींवर

मंगल जीवने

बल्लारपूर : मागील २० वर्षांपासून तांत्रिक कारणाने अडकलेली बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव आमडी उपसा सिंचन योजनेचे काम प्रगतीपथावर असून आता ही योजना पूर्णत्वाच्या टप्प्यावर आली आहे. यामुळे बल्लारपूर तालुक्यातील १० गावांतील अंदाजे एक हजार ८८६ शेतकऱ्यांच्या २ हजार ४६२ हेक्टर शेतींना सिंचनाची सोय होणार आहे.

याबाबतची नुकतीच तहसील कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक झाल्याची माहिती आहे. बल्लारपूर तालुक्यातील कोरडी पडत असलेली जमीन पाण्याखाली येणार की नाही या विचारात गुरफटलेल्या शेतकऱ्यांची भावना ओळखून राज्य शासनाने २००१ मध्ये आमडी पळसगाव उपसा सिंचन योजना मंजूर करून बळीराजाच्या आशा पल्लवित केल्या. यामुळे पळसगाव, आमडी, कळमना, किन्ही, केमतुकूम, दहेली, बामणी, दुधोली, कोर्टी मक्ता,कवडजई या दहा गावांतील १ हजार ८८६ शेतकऱ्यांची २ हजार ४६२ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे.

मागील काही वर्षांपासून सतत होणाऱ्या नापिकीमुळे त्रस्त झालेले तालुक्यातील शेतकरी शेती विकू लागले आहे. अशात उपसा सिंचन योजनेच्या पूर्णत्वाने बळीराजाला बळ मिळणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १० वर्षाआधी तत्कालीन राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष प्रमोद शेंडे व सिंचन राज्यमंत्री डॉ.अनिल देशमुख यांनी आमडी पळसगाव उपसा सिंचन योजना प्रकल्प त्वरित सुरू करण्याचे फर्मान काढले होते. त्यावेळेस या योजनेला १९.३९ कोटींचा निधी लागणार होता. आजघडीला मात्र हा खर्च वाढून ९९ कोटीपर्यंत गेला आहे. ॲड. बाबासाहेब वासाडे यांनीही हा प्रकल्प पूर्णत्वास यावा यासाठी २००६ मध्ये भरपूर प्रयत्न केले. परंतु हा प्रकल्प मधेच अडगळीत पडला व पूर्णत्वास येण्यासाठी १० गावांतील शेतकऱ्यांना २० वर्ष वाट पाहावी लागली आहे.

बॉक्स

अडथळा झाला दूर

एका व्यक्तीने आमडी येथील शेतातून जाणारी पाईप लाईन टाकण्यास अडथळा आणून काम थांबविण्याचा प्रयत्न केला. याची तक्रार पाटबंधारे विभागाने बल्लारपूरचे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली. ही तक्रार तहसीलदार संजय राईंचवार यांच्याकडे येताच त्यांनी मध्यस्थीने तोडगा काढला व उपसा सिंचन योजनाचे काम सुरू झाले आहे. आता ही योजना येत्या दिवाळीपर्यंत सुरू होण्याची शक्यता लघु पाटबंधारे विभागाने वर्तविली आहे.

कोट

हा प्रकल्प तालुक्यातील आमडी जवळून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या काठी आहे. ही योजना लवकरात सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नदीवर पंप बसवले आहे. परंतु नदीमधील अप्रोचचे काम व्हायचे आहे. पाईपमध्ये गाळ येऊ नये म्हणून स्ट्रक्चर बांधायचे आहे. बंद नलिका वितरण प्रणालीचा वापर करून शेतात पाणीपुरवठा होणार आहे. सध्या काम प्रगतीपथावर आहे.

-प्रमोदकुमार वाकुडे,अधीक्षक अभियंता,पाटबंधारे विभाग,चंद्रपूर.

कोट

तालुक्यात कृषी विकासाची गती वाढवायची असेल तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना बळ दिले पाहिजे. त्यांच्या मनात आत्मविश्वास तेव्हाच जागेल, जेव्हा बहुप्रतीक्षित उपसा सिंचन योजना प्रत्यक्ष सुरू होईल.

-

संदीप वेटे, सरपंच, ग्रामपंचायत, पळसगाव.

कोट

आमडी उपसा सिंचन योजना बळीराजाच्या हितासाठी आहे. तालुक्यात बारमाही पाण्याची सोय नाही, सिंचनाची व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. या प्रकल्पाचा बामणीच्या शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे.

-सुभाष ताजने,सरपंच, ग्रामपंचायत बामणी, दुधोली