शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दहा दिवसांत 2 हजार 604 वनराई बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 05:00 IST

जिल्ह्यात पाच हजार बंधाऱ्यांचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक दिवशी सरासरी २६० प्रमाणे दहा दिवसांत २ हजार ६०४ बंधारे बांधण्यात आले. लोकसहभागातून ही मोहीम सुरू झाली आहे. यात स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी नागरिक, विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता पाहून प्रति बंधारा कमीत कमी ५ ते जास्तीत जास्त २५ एकरांपर्यंत सिंचनाची सोय होऊ शकते. वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून ४० ते ४५ हजार एकरवर सिंचन निर्मिती होण्यास मदत होईल.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरिपासोबत रब्बी व उन्हाळी पिके घेण्याची सोय झाली तर उत्पन्न वाढून शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचविण्यास मदत होईल, या हेतूने जिल्ह्याधिकारी अजय गुल्हाने यांच्या अभिनव संकल्पनेतून वनराई बंधाराची मोहीम हाती घेण्यात आली. या अंतर्गत १० दिवसांत २ हजार ६०४ वनराई बंधारे बांधण्यात आले.जिल्ह्यात पाच हजार बंधाऱ्यांचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक दिवशी सरासरी २६० प्रमाणे दहा दिवसांत २ हजार ६०४ बंधारे बांधण्यात आले. लोकसहभागातून ही मोहीम सुरू झाली आहे. यात स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी नागरिक, विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता पाहून प्रति बंधारा कमीत कमी ५ ते जास्तीत जास्त २५ एकरांपर्यंत सिंचनाची सोय होऊ शकते. वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून ४० ते ४५ हजार एकरवर सिंचन निर्मिती होण्यास मदत होईल. जिल्ह्यात विहिरींची संख्या कमी व बोरवेलसाठी मर्यादा आहेत. ठिबक सिंचनाचा लाभ पुरेशा प्रमाणात देता येत नाही. त्यामुळे वनराई बंधाऱ्याचा पाण्याचा स्त्रोत असेल तर शेतकरी गटांना ठिबक सिंचनाचा लाभ देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीने घेतला आहे.असा बांधता येतो वनराई बंधारा  १२ मीटर पर्यंतचा वनराई बंधारा बांधण्यासाठी ७०० ते ८०० रिकामी पोती, घमेली, पावडा व प्रवाहाच्या आजूबाजूच्या मातीची गरज असते. बांधकाम करताना भरलेल्या मातीच्या पिशव्या दोरीने शिवून तयार कराव्यात. जागेची निवड करताना ओढ्याची रुंदी कमी असावी. 

बंधारा बांधण्यापूर्वी प्रवाहावरील दगड व गाळ काढून स्वच्छ करावा. बंधाऱ्याच्या खालील मोकळ्या जागेतून पाणी वाहू नये. ०.६० मीटर रुंदीच्या पोत्याच्या दोन रांगा प्रथम तयार कराव्यात. त्यात ०.३० मीटरचा गॅप ठेवावा. काही उंचीपर्यंत पोत्याचे तीन थर तयार करावे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बंधारे बांधण्यात आले आहे.-भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प