शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

२ हजार १८१ शेतकरी मारताहेत पिकविम्यासाठी चकरा; विमा कंपन्यांचं अक्षम्य दुर्लक्ष

By राजेश मडावी | Updated: May 11, 2023 14:52 IST

६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला असेल, अशावेळी पीक विमा काढला असल्यास त्याची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना कंपनीच्या वतीने दिली जाते.

चंद्रपूर : मागील हंगामात सहा हजार ४४२ शेतकऱ्यांनी पिकाचा विमा काढला होता. त्यातील दोन हजार १८१ शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान होऊनही अद्याप पीक विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळाली नाही. येत्या काही दिवसांत शेतीचा नवीन हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे मागील हंगामातील पीक विम्याचे पैसे मिळावे याकरिता शेतकरी कृषी कार्यालयात चकरा मारत असल्याचे दिसून येत आहे.

६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला असेल, अशावेळी पीक विमा काढला असल्यास त्याची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना कंपनीच्या वतीने दिली जाते. पिकाची कापणी केल्यानंतर पाऊस येऊन नुकसान झाल्यास व पीकविमा काढला असल्यास पीकविमा कंपनी नुकसानभरपाई देत असते. नुकसान झाल्यापासून ४८ तासांच्या आत शेतकऱ्याने विमा कंपनीकडे तक्रार करणे गरजेचे आहे. त्यानंतर विमा कंपनी प्रतिनिधी व कृषी सहायक संयुक्त सर्व्हे करून नुकसानीचा अहवाल विमा कंपनीकडे पाठवीत असतात. 

विमा काढणारे अन् भरपाई मिळणारे शेतकरी

मागील हंगामात सोयाबीन पिकाचा चार हजार २५८ शेतकऱ्यांनी विमा काढला. त्यात दोन हजार ६४४ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली. कापूस पिकाचा विमा एक हजार ४८६ शेतकऱ्यांनी काढला. त्यातील एक हजार ३३४ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली. तूर पिकाचा विमा ४८३ शेतकऱ्यांनी काढला. त्यात २८३ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली. भात पिकाचा विमा २०९ शेतकऱ्यांनी काढला. ज्वारी पिकाचा विमा सहा शेतकऱ्यांनी काढला. नवीन हंगामाला येत्या काही दिवसांत सुरुवात होणार आहे. मात्र, दोन हजार १८१ शेतकऱ्यांना मागील वर्षातील पीक विमा अद्याप मिळाला नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला आहे.

पीक नुकसानीचा अहवाल पाठविण्यात आला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू आहे.-गजानन भोयर तालुका कृषी अधिकारी, वरोरा

टॅग्स :Farmerशेतकरीchandrapur-acचंद्रपूर