शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

२ हजार १८१ शेतकरी मारताहेत पिकविम्यासाठी चकरा; विमा कंपन्यांचं अक्षम्य दुर्लक्ष

By राजेश मडावी | Updated: May 11, 2023 14:52 IST

६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला असेल, अशावेळी पीक विमा काढला असल्यास त्याची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना कंपनीच्या वतीने दिली जाते.

चंद्रपूर : मागील हंगामात सहा हजार ४४२ शेतकऱ्यांनी पिकाचा विमा काढला होता. त्यातील दोन हजार १८१ शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान होऊनही अद्याप पीक विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळाली नाही. येत्या काही दिवसांत शेतीचा नवीन हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे मागील हंगामातील पीक विम्याचे पैसे मिळावे याकरिता शेतकरी कृषी कार्यालयात चकरा मारत असल्याचे दिसून येत आहे.

६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला असेल, अशावेळी पीक विमा काढला असल्यास त्याची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना कंपनीच्या वतीने दिली जाते. पिकाची कापणी केल्यानंतर पाऊस येऊन नुकसान झाल्यास व पीकविमा काढला असल्यास पीकविमा कंपनी नुकसानभरपाई देत असते. नुकसान झाल्यापासून ४८ तासांच्या आत शेतकऱ्याने विमा कंपनीकडे तक्रार करणे गरजेचे आहे. त्यानंतर विमा कंपनी प्रतिनिधी व कृषी सहायक संयुक्त सर्व्हे करून नुकसानीचा अहवाल विमा कंपनीकडे पाठवीत असतात. 

विमा काढणारे अन् भरपाई मिळणारे शेतकरी

मागील हंगामात सोयाबीन पिकाचा चार हजार २५८ शेतकऱ्यांनी विमा काढला. त्यात दोन हजार ६४४ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली. कापूस पिकाचा विमा एक हजार ४८६ शेतकऱ्यांनी काढला. त्यातील एक हजार ३३४ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली. तूर पिकाचा विमा ४८३ शेतकऱ्यांनी काढला. त्यात २८३ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली. भात पिकाचा विमा २०९ शेतकऱ्यांनी काढला. ज्वारी पिकाचा विमा सहा शेतकऱ्यांनी काढला. नवीन हंगामाला येत्या काही दिवसांत सुरुवात होणार आहे. मात्र, दोन हजार १८१ शेतकऱ्यांना मागील वर्षातील पीक विमा अद्याप मिळाला नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला आहे.

पीक नुकसानीचा अहवाल पाठविण्यात आला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू आहे.-गजानन भोयर तालुका कृषी अधिकारी, वरोरा

टॅग्स :Farmerशेतकरीchandrapur-acचंद्रपूर