शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

वर्षभरात नागभीड तालुक्यात वन्यप्राण्यांचे १९२ जनावरांवर हल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 14:31 IST

Chandrapur : नागभीड वनपरिक्षेत्रात मानव वन्यप्राणी संघर्ष

घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : नागभीड तालुक्यात मानव वन्य प्राणी यांच्यातील संघर्ष नवा नाही. या वन्यप्राण्यांनी वर्षभरात पशू आणि मानवावर हल्ला केल्याच्या वर्षभरात २१३ घटना नागभीड वनपरिक्षेत्रात घडल्या आहेत. तळोधी वनपरिक्षेत्राची आकडेवारी वेगळीच आहे.

नागभीड तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ५१ हजार ६६०.४५ हेक्टरमध्ये विस्तारले आहे. यापैकी १४ हजार २९७.२५ हेक्टर क्षेत्र जंगलव्याप्त आहे. तालुक्यातील जंगलक्षेत्र लक्षात घेऊन काही वर्षांपूर्वी तळोधी (बाळापूर) येथे स्वतंत्र वनपरिक्षेत्र कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. तालुक्यातील गोविंदपूर, कचेपार, गिरगाव, सोनापूर, वाढोणा, गंगासागर हेटी, जनकापूर, बाळापूर, देवपायली, बोंड, मिंडाळा, कोसंबी गवळी, मिंडाळा, नवेगाव हुंडेश्वरी, मौशी, ढोरपा, बालापूर खुर्द, पाहार्णी, म्हसली, कोरंबी, डोंगरगाव, नवखळा आदी परिसर तर चांगलाच जंगलव्याप्त आहे. या जंगल परिसरात अनेकदा लोकांना वाघ, बिबट व अन्य जंगली प्राण्यांचे दिवसाढवळ्या दर्शन होत असते. उल्लेखनीय बाब ही की, या व याशिवाय अन्य अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेती या जंगलाला लागून आहेत. शेती आणि पशुधनाच्या निमित्ताने या गावांचा आणि शेतकऱ्यांचा रोजच जंगलाशी संबंध येतो. यातूनच वन्यप्राणी शेतकरी आणि पशुधनावर हल्ले करीत आहेत. 

वर्षभरात २१ जणांना केले जखमीनागभीड वनपरिक्षेत्रात १ जानेवारी ते डिसेंबर २०२४ या काळात २१ व्यक्तींवर वन्य प्राण्यांनी हल्ले केले आहेत. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. यातील १० प्रकरणे निकाली निघाली आहेत. तर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात १९२ जनावरे मृत्युमुखी पडली असल्याची माहिती आहे. यातील १५६ अर्जदारांच्या अर्जाचा निपटारा करण्यात आला आहे. तर ३६ प्रकरणे तपासणीसाठी ठेवली आहेत.

नागरिकांमध्ये दहशतहिंस्त्र प्राणी वन्य प्राण्यांना आपली शिकार बनवत असतात. तर काही नाग- रिकांवरसुद्धा हल्ला केला आहे. या घटनांचा परिणाम शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. दहशतीमुळे शेतकऱ्यांचे शेतीकडे दुर्लक्ष होते. त्याचा परिणाम उत्पादनावर होतो.वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पशुधन मृत्युमुखी पडत असल्याने किंवा जखमी होत असल्याने त्या शेतकऱ्याचा वा त्याचा जो रोजचा व्यवहार आहे तो थांबत असतो. हे होऊ नये, यासाठी शासनाने काहीतरी उपाययोजना करायला हव्यात.

टॅग्स :Tigerवाघchandrapur-acचंद्रपूर