शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

निवडणूक कामासाठी १८० बसगाड्या

By admin | Updated: October 3, 2014 01:18 IST

१५ आॅक्टोबरला होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील चिमूर, राजुरा, वरोरा, चंद्रपूर या चार एसटी आगारातील १८० बसगाड्या अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

चंद्रपूर : १५ आॅक्टोबरला होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील चिमूर, राजुरा, वरोरा, चंद्रपूर या चार एसटी आगारातील १८० बसगाड्या अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रावर पोलींग पार्ट्या पोहचविणे व आणण्याचे काम बसगाड्याव्दारे करण्यात येणार आहे. त्यामुळे या १५ व १६ आॅक्टोबरला ग्रामीण भागातील काही बसफेऱ्या बंद राहण्याची शक्यता आहे. निवणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. दुर्गम भागातील गावांमध्ये मतदान केंद्रावर ईव्हीम मशीन तसेच कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहचविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्याचा तसेच खाजगी वाहनांचा वापर होणार आहे. बसगाड्या अधिग्रहीत करण्याचे पत्र आगार प्रमुखांना पाठविण्यात आले असून, खाजगी वाहनेही अधिग्रहीत करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरु आहे.निवडणूकीच्या कामासाठी प्रशासनाला शेकडो बसगाड्यांची गरज पडते. दुर्गम भागात रस्त्यांअभावी अनेक अडचणी येतात. वेळेत मतदान साहित्य पोहचवून मतदान प्रक्रिया पार पाडणे, त्यानंतर साहित्य सुरक्षितरित्या जिल्हा किंवा तालुका मुख्यालयात आणण्यासाठी प्रशासनाची धावपळ असते. मतदान केंद्रावर कार्यरत कर्मचारी, पोलीस कर्मचारी, ईव्हीम मशीन पोहचविण्याचे काम वाहनांव्दारे होणार आहे. जिल्ह्यात १९०५ मतदान केंद्र असून निवणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पाच हजार जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी व तीन हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त मतदान केंद्रावर राहणार आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या दिमतील गृहरक्षक दलाचे ८०० जवान कार्यरत राहणार आहेत. तर पाच सीआरपीएफ कंपन्या बंदोबस्तात कार्यरत राहणार आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)