शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

निवडणूक कामासाठी १८० बसगाड्या

By admin | Updated: October 3, 2014 01:18 IST

१५ आॅक्टोबरला होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील चिमूर, राजुरा, वरोरा, चंद्रपूर या चार एसटी आगारातील १८० बसगाड्या अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

चंद्रपूर : १५ आॅक्टोबरला होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील चिमूर, राजुरा, वरोरा, चंद्रपूर या चार एसटी आगारातील १८० बसगाड्या अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रावर पोलींग पार्ट्या पोहचविणे व आणण्याचे काम बसगाड्याव्दारे करण्यात येणार आहे. त्यामुळे या १५ व १६ आॅक्टोबरला ग्रामीण भागातील काही बसफेऱ्या बंद राहण्याची शक्यता आहे. निवणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. दुर्गम भागातील गावांमध्ये मतदान केंद्रावर ईव्हीम मशीन तसेच कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहचविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्याचा तसेच खाजगी वाहनांचा वापर होणार आहे. बसगाड्या अधिग्रहीत करण्याचे पत्र आगार प्रमुखांना पाठविण्यात आले असून, खाजगी वाहनेही अधिग्रहीत करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरु आहे.निवडणूकीच्या कामासाठी प्रशासनाला शेकडो बसगाड्यांची गरज पडते. दुर्गम भागात रस्त्यांअभावी अनेक अडचणी येतात. वेळेत मतदान साहित्य पोहचवून मतदान प्रक्रिया पार पाडणे, त्यानंतर साहित्य सुरक्षितरित्या जिल्हा किंवा तालुका मुख्यालयात आणण्यासाठी प्रशासनाची धावपळ असते. मतदान केंद्रावर कार्यरत कर्मचारी, पोलीस कर्मचारी, ईव्हीम मशीन पोहचविण्याचे काम वाहनांव्दारे होणार आहे. जिल्ह्यात १९०५ मतदान केंद्र असून निवणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पाच हजार जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी व तीन हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त मतदान केंद्रावर राहणार आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या दिमतील गृहरक्षक दलाचे ८०० जवान कार्यरत राहणार आहेत. तर पाच सीआरपीएफ कंपन्या बंदोबस्तात कार्यरत राहणार आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)