शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १६ भरारी पथकांची कृषी केंद्रांवर नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:01 IST

मान्सूनपूर्व पाऊस कोसळल्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी सुरु केली आहे. अशा परिस्थितीत बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करुन चढ्या दराने विक्री तसेच दर्जाहीन बियाणे विक्री करण्याचा प्रकार होऊ शकतो. हा धोका लक्षात घेऊन खत, बियाणे विक्रीवर सदर पथक नजर ठेवणार असून जिल्ह्यातील कोणत्याही केंद्रावर पथक अचानक भेट देऊन कृषी केंद्र तपासणार आहे.

ठळक मुद्देपरवाना होणार रद्द : अतिरिक्त शुल्क आकारल्यास कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी बी-बियाणे, खतांची खरेदी करीत आहे. याचाच फायदा घेत काही व्यावसायिक शेककऱ्यांची फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कृषी विभागाने जिल्ह्यात १६ भरारी पथकांची निर्मिती केली असून सदर पथक जिल्ह्यातील प्रत्येक कृषी केंद्रांवर लक्ष ठेवून राहणार आहे. शेतकऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क घेतल्यास तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.मान्सूनपूर्व पाऊस कोसळल्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी सुरु केली आहे. अशा परिस्थितीत बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करुन चढ्या दराने विक्री तसेच दर्जाहीन बियाणे विक्री करण्याचा प्रकार होऊ शकतो. हा धोका लक्षात घेऊन खत, बियाणे विक्रीवर सदर पथक नजर ठेवणार असून जिल्ह्यातील कोणत्याही केंद्रावर पथक अचानक भेट देऊन कृषी केंद्र तपासणार आहे.खरीप हंगाम सुरू झाला असून खत तसेच बियाण्याची कृषी विभागाकडून काही महिन्यापूर्वीच मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यानुसार मागील काही दिवसापासून विविध कंपन्याचे खत तसेच बियाणे जिल्ह्यात दाखल झाले असून ग्रामीण भागातील विक्रेत्यांना वितरित केले जात आहे. शेतकºयांची कोणत्याही परिस्थितीत फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाकडून कठोर पावले उचलण्यात आली आहे. कृषी केंद्रांना अचानक भेटी देऊन खत, बियाणे त्यासंबंधीची कागदपत्रे आदींची तपासणी करण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक तसेच जिल्हास्तरावर एक पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकात तालुका कृषी अधिकारी तसेच पाच विभागातील अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्ह्यातील कोणत्याही कृषी केंद्रात जाऊन तपासणी करण्याचा अधिकार या पथकाला आहे. तपासणीदरम्यान कृषी केंद्रात गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.जिल्ह्यात कापूस उत्पादक तालुक्यांमध्ये सध्या कपाशीची लागवड केली जात आहे. तर धान उत्पादक शेतकरीही शेतीच्या मशागतीच्या कामाला लागले आहे. विशेष म्हणजे, यावर्षी कपाशीऐवजी शेतकरी सोयाबीनला अधिक पसंती देतील, असे बोलल्या जात आहे.शेतकऱ्यांना करता येणार तक्रारपावसाळा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची बी-बियाणे घेण्यासाठी लगबस सुरू झाली आहे. याचाच फायदा घेत काही व्यावसायिक त्यांची फसवणूक करतात. फसवणूक होत असेल तर शेतकºयांनी थेट कृषी विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.शेतकºयांना आपली फसगत झाल्याची तक्रार करता यावी यासाठी तालुकास्तरावर तकार निवारण केंद्राची स्थापनाही कृषी विभागाने केली आहे.एक आणि प्रत्येक तालुक्याक एक असे १६ पथक जिल्ह्यात राहणार असून शेतकºयांनी तक्रार केल्यास तत्काळ कार्यवाही केली जाणार असून कृषी केंद्राची तपासणी करण्याचे पूर्ण अधिकार सदर पथकांना देण्यात आले आहे.पावसाळ्याच्या तोंडावर काही कृषी केंद्र संचालक शेतकºयांची फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या केंद्रावर वॉच ठेवण्यासाठी कृषी विभागाने पथकांची नेमणूक केली आहे. सदर पथक कृषी केंद्रांची तपासणी करणार आहे. गैरप्रकार आढळल्यास शेतकºयांनी तक्रार करावी.-उदय पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 

टॅग्स :Farmerशेतकरी