शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

जिल्ह्यात १६ भरारी पथकांची कृषी केंद्रांवर नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:01 IST

मान्सूनपूर्व पाऊस कोसळल्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी सुरु केली आहे. अशा परिस्थितीत बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करुन चढ्या दराने विक्री तसेच दर्जाहीन बियाणे विक्री करण्याचा प्रकार होऊ शकतो. हा धोका लक्षात घेऊन खत, बियाणे विक्रीवर सदर पथक नजर ठेवणार असून जिल्ह्यातील कोणत्याही केंद्रावर पथक अचानक भेट देऊन कृषी केंद्र तपासणार आहे.

ठळक मुद्देपरवाना होणार रद्द : अतिरिक्त शुल्क आकारल्यास कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी बी-बियाणे, खतांची खरेदी करीत आहे. याचाच फायदा घेत काही व्यावसायिक शेककऱ्यांची फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कृषी विभागाने जिल्ह्यात १६ भरारी पथकांची निर्मिती केली असून सदर पथक जिल्ह्यातील प्रत्येक कृषी केंद्रांवर लक्ष ठेवून राहणार आहे. शेतकऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क घेतल्यास तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.मान्सूनपूर्व पाऊस कोसळल्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी सुरु केली आहे. अशा परिस्थितीत बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करुन चढ्या दराने विक्री तसेच दर्जाहीन बियाणे विक्री करण्याचा प्रकार होऊ शकतो. हा धोका लक्षात घेऊन खत, बियाणे विक्रीवर सदर पथक नजर ठेवणार असून जिल्ह्यातील कोणत्याही केंद्रावर पथक अचानक भेट देऊन कृषी केंद्र तपासणार आहे.खरीप हंगाम सुरू झाला असून खत तसेच बियाण्याची कृषी विभागाकडून काही महिन्यापूर्वीच मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यानुसार मागील काही दिवसापासून विविध कंपन्याचे खत तसेच बियाणे जिल्ह्यात दाखल झाले असून ग्रामीण भागातील विक्रेत्यांना वितरित केले जात आहे. शेतकºयांची कोणत्याही परिस्थितीत फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाकडून कठोर पावले उचलण्यात आली आहे. कृषी केंद्रांना अचानक भेटी देऊन खत, बियाणे त्यासंबंधीची कागदपत्रे आदींची तपासणी करण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक तसेच जिल्हास्तरावर एक पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकात तालुका कृषी अधिकारी तसेच पाच विभागातील अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्ह्यातील कोणत्याही कृषी केंद्रात जाऊन तपासणी करण्याचा अधिकार या पथकाला आहे. तपासणीदरम्यान कृषी केंद्रात गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.जिल्ह्यात कापूस उत्पादक तालुक्यांमध्ये सध्या कपाशीची लागवड केली जात आहे. तर धान उत्पादक शेतकरीही शेतीच्या मशागतीच्या कामाला लागले आहे. विशेष म्हणजे, यावर्षी कपाशीऐवजी शेतकरी सोयाबीनला अधिक पसंती देतील, असे बोलल्या जात आहे.शेतकऱ्यांना करता येणार तक्रारपावसाळा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची बी-बियाणे घेण्यासाठी लगबस सुरू झाली आहे. याचाच फायदा घेत काही व्यावसायिक त्यांची फसवणूक करतात. फसवणूक होत असेल तर शेतकºयांनी थेट कृषी विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.शेतकºयांना आपली फसगत झाल्याची तक्रार करता यावी यासाठी तालुकास्तरावर तकार निवारण केंद्राची स्थापनाही कृषी विभागाने केली आहे.एक आणि प्रत्येक तालुक्याक एक असे १६ पथक जिल्ह्यात राहणार असून शेतकºयांनी तक्रार केल्यास तत्काळ कार्यवाही केली जाणार असून कृषी केंद्राची तपासणी करण्याचे पूर्ण अधिकार सदर पथकांना देण्यात आले आहे.पावसाळ्याच्या तोंडावर काही कृषी केंद्र संचालक शेतकºयांची फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या केंद्रावर वॉच ठेवण्यासाठी कृषी विभागाने पथकांची नेमणूक केली आहे. सदर पथक कृषी केंद्रांची तपासणी करणार आहे. गैरप्रकार आढळल्यास शेतकºयांनी तक्रार करावी.-उदय पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 

टॅग्स :Farmerशेतकरी