शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १६ भरारी पथकांची कृषी केंद्रांवर नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:01 IST

मान्सूनपूर्व पाऊस कोसळल्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी सुरु केली आहे. अशा परिस्थितीत बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करुन चढ्या दराने विक्री तसेच दर्जाहीन बियाणे विक्री करण्याचा प्रकार होऊ शकतो. हा धोका लक्षात घेऊन खत, बियाणे विक्रीवर सदर पथक नजर ठेवणार असून जिल्ह्यातील कोणत्याही केंद्रावर पथक अचानक भेट देऊन कृषी केंद्र तपासणार आहे.

ठळक मुद्देपरवाना होणार रद्द : अतिरिक्त शुल्क आकारल्यास कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी बी-बियाणे, खतांची खरेदी करीत आहे. याचाच फायदा घेत काही व्यावसायिक शेककऱ्यांची फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कृषी विभागाने जिल्ह्यात १६ भरारी पथकांची निर्मिती केली असून सदर पथक जिल्ह्यातील प्रत्येक कृषी केंद्रांवर लक्ष ठेवून राहणार आहे. शेतकऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क घेतल्यास तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.मान्सूनपूर्व पाऊस कोसळल्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी सुरु केली आहे. अशा परिस्थितीत बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करुन चढ्या दराने विक्री तसेच दर्जाहीन बियाणे विक्री करण्याचा प्रकार होऊ शकतो. हा धोका लक्षात घेऊन खत, बियाणे विक्रीवर सदर पथक नजर ठेवणार असून जिल्ह्यातील कोणत्याही केंद्रावर पथक अचानक भेट देऊन कृषी केंद्र तपासणार आहे.खरीप हंगाम सुरू झाला असून खत तसेच बियाण्याची कृषी विभागाकडून काही महिन्यापूर्वीच मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यानुसार मागील काही दिवसापासून विविध कंपन्याचे खत तसेच बियाणे जिल्ह्यात दाखल झाले असून ग्रामीण भागातील विक्रेत्यांना वितरित केले जात आहे. शेतकºयांची कोणत्याही परिस्थितीत फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाकडून कठोर पावले उचलण्यात आली आहे. कृषी केंद्रांना अचानक भेटी देऊन खत, बियाणे त्यासंबंधीची कागदपत्रे आदींची तपासणी करण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक तसेच जिल्हास्तरावर एक पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकात तालुका कृषी अधिकारी तसेच पाच विभागातील अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्ह्यातील कोणत्याही कृषी केंद्रात जाऊन तपासणी करण्याचा अधिकार या पथकाला आहे. तपासणीदरम्यान कृषी केंद्रात गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.जिल्ह्यात कापूस उत्पादक तालुक्यांमध्ये सध्या कपाशीची लागवड केली जात आहे. तर धान उत्पादक शेतकरीही शेतीच्या मशागतीच्या कामाला लागले आहे. विशेष म्हणजे, यावर्षी कपाशीऐवजी शेतकरी सोयाबीनला अधिक पसंती देतील, असे बोलल्या जात आहे.शेतकऱ्यांना करता येणार तक्रारपावसाळा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची बी-बियाणे घेण्यासाठी लगबस सुरू झाली आहे. याचाच फायदा घेत काही व्यावसायिक त्यांची फसवणूक करतात. फसवणूक होत असेल तर शेतकºयांनी थेट कृषी विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.शेतकºयांना आपली फसगत झाल्याची तक्रार करता यावी यासाठी तालुकास्तरावर तकार निवारण केंद्राची स्थापनाही कृषी विभागाने केली आहे.एक आणि प्रत्येक तालुक्याक एक असे १६ पथक जिल्ह्यात राहणार असून शेतकºयांनी तक्रार केल्यास तत्काळ कार्यवाही केली जाणार असून कृषी केंद्राची तपासणी करण्याचे पूर्ण अधिकार सदर पथकांना देण्यात आले आहे.पावसाळ्याच्या तोंडावर काही कृषी केंद्र संचालक शेतकºयांची फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या केंद्रावर वॉच ठेवण्यासाठी कृषी विभागाने पथकांची नेमणूक केली आहे. सदर पथक कृषी केंद्रांची तपासणी करणार आहे. गैरप्रकार आढळल्यास शेतकºयांनी तक्रार करावी.-उदय पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 

टॅग्स :Farmerशेतकरी