शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

मालगुजारी तलावांच्या नूतनीकरणासाठी १५० कोटी

By admin | Updated: March 12, 2017 01:25 IST

सिंचन वाढविण्यासाठी मालगुजारी तलावाचे नूतनीकरण केले जात आहे. त्यासाठी १५० कोटी रुपये आपण देतो आहे.

सुधीर मुनगंटीवार : कृषी भवनाचे उद्घाटन चंद्र्रपूर : सिंचन वाढविण्यासाठी मालगुजारी तलावाचे नूतनीकरण केले जात आहे. त्यासाठी १५० कोटी रुपये आपण देतो आहे. शेतकऱ्यांसाठी तरतूद करताना कुठेही आखडता हात घेतला जाणार नाही. शेतकरी समृध्द झाला पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. उदघाटन झालेले कृषी भवन शेतकऱ्यांच्या क्रांतीचे मंदिर व्हावे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले कृषी भवनाच्या नवीन इमारतीचे लोर्कापण पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांच्या करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यमक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर होते. तर प्रमुख पाहुणे आमदार नाना शामकुळे, आ. अ‍ॅड.संजय धोटे, महापौर राखी कंचलार्वार, उपमहौपार वसंता देशमुख, प्रभारी जिल्हाधिकारी संजय धिवरे, बांधकामचे अधिक्षक अभियंता डी.के.बालपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. ए. आर. हसनाबादे आदी उपस्थित होते. ना. मुनगंटीवार म्हणाले की, शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्यास तो स्वत:च्या बळावर आर्थिक क्रांती घडवू शकतो. त्यामुळे सिंचन सुविधा पुरविणाऱ्या कोणत्याही बाबींची आर्थिक कपात केली नाही, असे त्यांनी यावेळी दिली. अर्धवट सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर भर असून २०२२ मध्ये नव्हे तर २०२१ पर्यंतच जिल्हयाचे कृषी उत्पादन दुप्पट करु. विषमुक्त शेतीचा प्रयत्न करु. त्यासाठी नवीन कृषी भवन शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीची इमारत बनली पाहिजे. कृषि भवनास वालकंपाऊड व इतर कामासाठी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करुन देवू, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आ.नाना शामकुळे यांचेही भाषण झाले. प्रस्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. हसनाबादे यांनी केले. प्रारंभी फीत कापून इमारतीचे उद्घाटन केले. (प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या विकासासाठी कार्यक्रम राबवा -अहीर केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले की, केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवित आहे. या योजनांचा शेतकऱ्यांच्या विविकासाठी सकारात्मक दृष्टीने पाठपुरावा करुन राबवा, पंतप्रधान सिंचन योजना केंद्राची महत्वाकांक्षी योजना असून ती उत्तमपणे राबविली गेली पाहिजे. युरियाचे भाव वाढविणार नाही, असा संकल्प शासनाने केला होता. गेले तिन वर्षदर वाढविले नाही. पुढेही वाढणार नाही. बीटी बियाने, मिश्र खते, डीएपी या खतांचेही भाव कमी केले असल्याचे ना. अहीर यांनी सांगितले.