शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मालगुजारी तलावांच्या नूतनीकरणासाठी १५० कोटी

By admin | Updated: March 12, 2017 01:25 IST

सिंचन वाढविण्यासाठी मालगुजारी तलावाचे नूतनीकरण केले जात आहे. त्यासाठी १५० कोटी रुपये आपण देतो आहे.

सुधीर मुनगंटीवार : कृषी भवनाचे उद्घाटन चंद्र्रपूर : सिंचन वाढविण्यासाठी मालगुजारी तलावाचे नूतनीकरण केले जात आहे. त्यासाठी १५० कोटी रुपये आपण देतो आहे. शेतकऱ्यांसाठी तरतूद करताना कुठेही आखडता हात घेतला जाणार नाही. शेतकरी समृध्द झाला पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. उदघाटन झालेले कृषी भवन शेतकऱ्यांच्या क्रांतीचे मंदिर व्हावे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले कृषी भवनाच्या नवीन इमारतीचे लोर्कापण पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांच्या करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यमक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर होते. तर प्रमुख पाहुणे आमदार नाना शामकुळे, आ. अ‍ॅड.संजय धोटे, महापौर राखी कंचलार्वार, उपमहौपार वसंता देशमुख, प्रभारी जिल्हाधिकारी संजय धिवरे, बांधकामचे अधिक्षक अभियंता डी.के.बालपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. ए. आर. हसनाबादे आदी उपस्थित होते. ना. मुनगंटीवार म्हणाले की, शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्यास तो स्वत:च्या बळावर आर्थिक क्रांती घडवू शकतो. त्यामुळे सिंचन सुविधा पुरविणाऱ्या कोणत्याही बाबींची आर्थिक कपात केली नाही, असे त्यांनी यावेळी दिली. अर्धवट सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर भर असून २०२२ मध्ये नव्हे तर २०२१ पर्यंतच जिल्हयाचे कृषी उत्पादन दुप्पट करु. विषमुक्त शेतीचा प्रयत्न करु. त्यासाठी नवीन कृषी भवन शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीची इमारत बनली पाहिजे. कृषि भवनास वालकंपाऊड व इतर कामासाठी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करुन देवू, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आ.नाना शामकुळे यांचेही भाषण झाले. प्रस्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. हसनाबादे यांनी केले. प्रारंभी फीत कापून इमारतीचे उद्घाटन केले. (प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या विकासासाठी कार्यक्रम राबवा -अहीर केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले की, केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवित आहे. या योजनांचा शेतकऱ्यांच्या विविकासाठी सकारात्मक दृष्टीने पाठपुरावा करुन राबवा, पंतप्रधान सिंचन योजना केंद्राची महत्वाकांक्षी योजना असून ती उत्तमपणे राबविली गेली पाहिजे. युरियाचे भाव वाढविणार नाही, असा संकल्प शासनाने केला होता. गेले तिन वर्षदर वाढविले नाही. पुढेही वाढणार नाही. बीटी बियाने, मिश्र खते, डीएपी या खतांचेही भाव कमी केले असल्याचे ना. अहीर यांनी सांगितले.