शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
4
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
5
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
6
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
7
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
8
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
9
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
10
कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
11
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
12
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
13
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
14
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
15
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
16
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
17
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
18
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास
19
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
20
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."

१५ नवीन पुलांमुळे रहदारीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 22:52 IST

तालुक्यातील अनेक रस्त्यांवर पुल नसल्यामुळे नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत होता. मात्र यावर्षी तब्बल १५ नवीन पुलांचे बांधकाम करण्यात आल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसातही रस्ते बंद न झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देपाच नवीन बंधारे होणार पूर्ण : सार्वजनिक बांधकाम विभागाचे नागरिकांनी मानले आभार

भोजराज गोवर्धन ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यातील अनेक रस्त्यांवर पुल नसल्यामुळे नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत होता. मात्र यावर्षी तब्बल १५ नवीन पुलांचे बांधकाम करण्यात आल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसातही रस्ते बंद न झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.राज्याचे अर्थ, नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तालुक्यातील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात होणार त्रास दूर करण्यासाठी अर्थसंकल्पात २६ नविन पुलांसाठी निधी मंजूर केला. यामधील हळदी ते नलेश्वर या मार्गावर तीन पुलांचे काम पूर्ण झाले आहे. चिचाळा ते कवळपेठ यामार्गावर दोन, जानाळा ते सुशी मार्गावर २, नवेगांव-कोरंबी-बेंबाळ मार्गावर तीन, मूल ते चार्मोशी एक, चिखली ते कन्हाळगांव मार्गावर एक तर पेठगांव भादुर्णी मार्गावर दोन पुलांचे काम पूर्ण झाले आहेत. काही पुलांचे काम अंतीम टप्प्यात आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रशांत वसुले यांनी संबंधित अभियंत्यांना मार्गदर्शन करून काम तत्काळ पूर्ण करण्यासाठी प् प्रयत्न केले. येणाऱ्या काही दिवसांत यामार्गावरून रूंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याने नागरिकांना ये-जा करणे सुलभ होणार आहे.मूल तालुक्यात पाच मोठे बंधारे मंजुर करून सार्वजनिक बांधकाम उपविभाग मूल येथे निधी उपलब्ध करून दिला आहे. तालुक्यातील चिरोली येथे एक कोटी ९१ लाख, ताडाळा येथे पुल आणि बंधाºयासाठी १४ कोटी ९० लाख, चिमढा येथे ९ कोटी ९० लाख, नलेश्वर येथे पुल आणि बंधाºयासाठी ६ कोटी, सिंतळा येथे पुल आणि बंधारा १७ कोटी ९० लाख रुपए निधी मंजुर करण्यात आले आहे. ना.मुनगंटीवार यांनी भुमीपूजन केलेल्या चिरोली येथील बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे.सदर बंधाऱ्यामुळे तालुक्यात जलसाठ्यामध्ये वाढ होणार असुन मच्छीमारी व्यवसायाला गती मिळण्याची शक्यता आहे. या बंधाऱ्यातील पाणी दोन ते अडीच किमीपर्यंत साठा राहणार असल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी महत्वाचे ठरणार आहे. बंधाऱ्यामुळे सुमारे दोनशे हेक्टर शेती सिंचनाखाली येऊ शकते. भविष्यात पाणी टंचाई भासु नये यासाठी लिफ्टच्या आधारे जवळपास असलेल्या मामा तलावात या बंधाºयांतील पाणी सोडण्यात येणार असल्याने चिरोली परिसरातील शेतकºयाांना याबंधाऱ्याचा चांगलाच फायदा होणार आहे.