शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

१५ नवीन पुलांमुळे रहदारीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 22:52 IST

तालुक्यातील अनेक रस्त्यांवर पुल नसल्यामुळे नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत होता. मात्र यावर्षी तब्बल १५ नवीन पुलांचे बांधकाम करण्यात आल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसातही रस्ते बंद न झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देपाच नवीन बंधारे होणार पूर्ण : सार्वजनिक बांधकाम विभागाचे नागरिकांनी मानले आभार

भोजराज गोवर्धन ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यातील अनेक रस्त्यांवर पुल नसल्यामुळे नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत होता. मात्र यावर्षी तब्बल १५ नवीन पुलांचे बांधकाम करण्यात आल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसातही रस्ते बंद न झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.राज्याचे अर्थ, नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तालुक्यातील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात होणार त्रास दूर करण्यासाठी अर्थसंकल्पात २६ नविन पुलांसाठी निधी मंजूर केला. यामधील हळदी ते नलेश्वर या मार्गावर तीन पुलांचे काम पूर्ण झाले आहे. चिचाळा ते कवळपेठ यामार्गावर दोन, जानाळा ते सुशी मार्गावर २, नवेगांव-कोरंबी-बेंबाळ मार्गावर तीन, मूल ते चार्मोशी एक, चिखली ते कन्हाळगांव मार्गावर एक तर पेठगांव भादुर्णी मार्गावर दोन पुलांचे काम पूर्ण झाले आहेत. काही पुलांचे काम अंतीम टप्प्यात आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रशांत वसुले यांनी संबंधित अभियंत्यांना मार्गदर्शन करून काम तत्काळ पूर्ण करण्यासाठी प् प्रयत्न केले. येणाऱ्या काही दिवसांत यामार्गावरून रूंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याने नागरिकांना ये-जा करणे सुलभ होणार आहे.मूल तालुक्यात पाच मोठे बंधारे मंजुर करून सार्वजनिक बांधकाम उपविभाग मूल येथे निधी उपलब्ध करून दिला आहे. तालुक्यातील चिरोली येथे एक कोटी ९१ लाख, ताडाळा येथे पुल आणि बंधाºयासाठी १४ कोटी ९० लाख, चिमढा येथे ९ कोटी ९० लाख, नलेश्वर येथे पुल आणि बंधाºयासाठी ६ कोटी, सिंतळा येथे पुल आणि बंधारा १७ कोटी ९० लाख रुपए निधी मंजुर करण्यात आले आहे. ना.मुनगंटीवार यांनी भुमीपूजन केलेल्या चिरोली येथील बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे.सदर बंधाऱ्यामुळे तालुक्यात जलसाठ्यामध्ये वाढ होणार असुन मच्छीमारी व्यवसायाला गती मिळण्याची शक्यता आहे. या बंधाऱ्यातील पाणी दोन ते अडीच किमीपर्यंत साठा राहणार असल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी महत्वाचे ठरणार आहे. बंधाऱ्यामुळे सुमारे दोनशे हेक्टर शेती सिंचनाखाली येऊ शकते. भविष्यात पाणी टंचाई भासु नये यासाठी लिफ्टच्या आधारे जवळपास असलेल्या मामा तलावात या बंधाºयांतील पाणी सोडण्यात येणार असल्याने चिरोली परिसरातील शेतकºयाांना याबंधाऱ्याचा चांगलाच फायदा होणार आहे.