शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

१५ नवीन पुलांमुळे रहदारीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 22:52 IST

तालुक्यातील अनेक रस्त्यांवर पुल नसल्यामुळे नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत होता. मात्र यावर्षी तब्बल १५ नवीन पुलांचे बांधकाम करण्यात आल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसातही रस्ते बंद न झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देपाच नवीन बंधारे होणार पूर्ण : सार्वजनिक बांधकाम विभागाचे नागरिकांनी मानले आभार

भोजराज गोवर्धन ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यातील अनेक रस्त्यांवर पुल नसल्यामुळे नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत होता. मात्र यावर्षी तब्बल १५ नवीन पुलांचे बांधकाम करण्यात आल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसातही रस्ते बंद न झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.राज्याचे अर्थ, नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तालुक्यातील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात होणार त्रास दूर करण्यासाठी अर्थसंकल्पात २६ नविन पुलांसाठी निधी मंजूर केला. यामधील हळदी ते नलेश्वर या मार्गावर तीन पुलांचे काम पूर्ण झाले आहे. चिचाळा ते कवळपेठ यामार्गावर दोन, जानाळा ते सुशी मार्गावर २, नवेगांव-कोरंबी-बेंबाळ मार्गावर तीन, मूल ते चार्मोशी एक, चिखली ते कन्हाळगांव मार्गावर एक तर पेठगांव भादुर्णी मार्गावर दोन पुलांचे काम पूर्ण झाले आहेत. काही पुलांचे काम अंतीम टप्प्यात आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रशांत वसुले यांनी संबंधित अभियंत्यांना मार्गदर्शन करून काम तत्काळ पूर्ण करण्यासाठी प् प्रयत्न केले. येणाऱ्या काही दिवसांत यामार्गावरून रूंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याने नागरिकांना ये-जा करणे सुलभ होणार आहे.मूल तालुक्यात पाच मोठे बंधारे मंजुर करून सार्वजनिक बांधकाम उपविभाग मूल येथे निधी उपलब्ध करून दिला आहे. तालुक्यातील चिरोली येथे एक कोटी ९१ लाख, ताडाळा येथे पुल आणि बंधाºयासाठी १४ कोटी ९० लाख, चिमढा येथे ९ कोटी ९० लाख, नलेश्वर येथे पुल आणि बंधाºयासाठी ६ कोटी, सिंतळा येथे पुल आणि बंधारा १७ कोटी ९० लाख रुपए निधी मंजुर करण्यात आले आहे. ना.मुनगंटीवार यांनी भुमीपूजन केलेल्या चिरोली येथील बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे.सदर बंधाऱ्यामुळे तालुक्यात जलसाठ्यामध्ये वाढ होणार असुन मच्छीमारी व्यवसायाला गती मिळण्याची शक्यता आहे. या बंधाऱ्यातील पाणी दोन ते अडीच किमीपर्यंत साठा राहणार असल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी महत्वाचे ठरणार आहे. बंधाऱ्यामुळे सुमारे दोनशे हेक्टर शेती सिंचनाखाली येऊ शकते. भविष्यात पाणी टंचाई भासु नये यासाठी लिफ्टच्या आधारे जवळपास असलेल्या मामा तलावात या बंधाºयांतील पाणी सोडण्यात येणार असल्याने चिरोली परिसरातील शेतकºयाांना याबंधाऱ्याचा चांगलाच फायदा होणार आहे.