शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

१५ नवीन पुलांमुळे रहदारीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 22:52 IST

तालुक्यातील अनेक रस्त्यांवर पुल नसल्यामुळे नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत होता. मात्र यावर्षी तब्बल १५ नवीन पुलांचे बांधकाम करण्यात आल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसातही रस्ते बंद न झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देपाच नवीन बंधारे होणार पूर्ण : सार्वजनिक बांधकाम विभागाचे नागरिकांनी मानले आभार

भोजराज गोवर्धन ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यातील अनेक रस्त्यांवर पुल नसल्यामुळे नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत होता. मात्र यावर्षी तब्बल १५ नवीन पुलांचे बांधकाम करण्यात आल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसातही रस्ते बंद न झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.राज्याचे अर्थ, नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तालुक्यातील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात होणार त्रास दूर करण्यासाठी अर्थसंकल्पात २६ नविन पुलांसाठी निधी मंजूर केला. यामधील हळदी ते नलेश्वर या मार्गावर तीन पुलांचे काम पूर्ण झाले आहे. चिचाळा ते कवळपेठ यामार्गावर दोन, जानाळा ते सुशी मार्गावर २, नवेगांव-कोरंबी-बेंबाळ मार्गावर तीन, मूल ते चार्मोशी एक, चिखली ते कन्हाळगांव मार्गावर एक तर पेठगांव भादुर्णी मार्गावर दोन पुलांचे काम पूर्ण झाले आहेत. काही पुलांचे काम अंतीम टप्प्यात आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रशांत वसुले यांनी संबंधित अभियंत्यांना मार्गदर्शन करून काम तत्काळ पूर्ण करण्यासाठी प् प्रयत्न केले. येणाऱ्या काही दिवसांत यामार्गावरून रूंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याने नागरिकांना ये-जा करणे सुलभ होणार आहे.मूल तालुक्यात पाच मोठे बंधारे मंजुर करून सार्वजनिक बांधकाम उपविभाग मूल येथे निधी उपलब्ध करून दिला आहे. तालुक्यातील चिरोली येथे एक कोटी ९१ लाख, ताडाळा येथे पुल आणि बंधाºयासाठी १४ कोटी ९० लाख, चिमढा येथे ९ कोटी ९० लाख, नलेश्वर येथे पुल आणि बंधाºयासाठी ६ कोटी, सिंतळा येथे पुल आणि बंधारा १७ कोटी ९० लाख रुपए निधी मंजुर करण्यात आले आहे. ना.मुनगंटीवार यांनी भुमीपूजन केलेल्या चिरोली येथील बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे.सदर बंधाऱ्यामुळे तालुक्यात जलसाठ्यामध्ये वाढ होणार असुन मच्छीमारी व्यवसायाला गती मिळण्याची शक्यता आहे. या बंधाऱ्यातील पाणी दोन ते अडीच किमीपर्यंत साठा राहणार असल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी महत्वाचे ठरणार आहे. बंधाऱ्यामुळे सुमारे दोनशे हेक्टर शेती सिंचनाखाली येऊ शकते. भविष्यात पाणी टंचाई भासु नये यासाठी लिफ्टच्या आधारे जवळपास असलेल्या मामा तलावात या बंधाºयांतील पाणी सोडण्यात येणार असल्याने चिरोली परिसरातील शेतकºयाांना याबंधाऱ्याचा चांगलाच फायदा होणार आहे.