शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
3
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
4
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
5
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
6
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
7
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
9
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
10
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
11
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
12
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
13
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
14
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
15
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
16
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
17
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
18
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
19
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
20
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात 5,159 जागांसाठी 12,677 नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 05:00 IST

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून नामांकन अर्ज दाखल करणे सुरू झाले आहे. त्यानंतर तीन दिवस शासकीय सुटी असल्याने मागील आठवड्यात हे काम थांबले होते. त्यानंतर उमेदवारांची नामांकन दाखल करण्यासाठी एकच गर्दी उसळली.  जिल्ह्यात ६२९ ग्रामपंचायतींच्या एक हजार १८१ प्रभागातून पाच हजार १५९ सदस्य निवडून द्यायचे आहेत. यासाठी दोन हजार १२८ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : गावागावात मोर्चेबांधणीला वेग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. जिल्ह्यात ६२९ ग्रामपंचायत निवडणुकीतील पाच हजार १५९ जागांसाठी तब्बल १२ हजार ६७७ उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत छाननीचे काम सुरू राहणार आहे. त्यानंतर छाननीत जिल्ह्यात एकूण किती उमेदवारांचे अर्ज बाद होतात, हे कळू शकणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून नामांकन अर्ज दाखल करणे सुरू झाले आहे. त्यानंतर तीन दिवस शासकीय सुटी असल्याने मागील आठवड्यात हे काम थांबले होते. त्यानंतर उमेदवारांची नामांकन दाखल करण्यासाठी एकच गर्दी उसळली.  जिल्ह्यात ६२९ ग्रामपंचायतींच्या एक हजार १८१ प्रभागातून पाच हजार १५९ सदस्य निवडून द्यायचे आहेत. यासाठी दोन हजार १२८ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, या निवडणुकांसाठी जिल्हाभरातील एक लाख ३५ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कोरोना संसर्गामुळे यावर्षी ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या सूचना निवडणूक विभागाने दिल्या. मात्र अनेकदा लिंक जुळत असल्याने नामांकन अर्ज सादर करताना अडचणी निर्माण होत होत्या. याबाबतच्या तक्रारी वाढल्यानंतर मंगळवारी म्हणजे अखेरच्या दिवशी नामांकन अर्ज ऑफलाईन सादर करण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यानंतर इच्छुक उमेदवारांची अर्ज सादर करण्यासाठी अचानक गर्दी उसळली. मंगळवारी एकाच दिवशी तब्बल नऊ हजार ६९० उमेदवारांनी आपले नामांकन सादर केले. सोमवारपर्यंत एकूण दोन हजार ९८७ नामांकन दाखल झाले  होते. 

गावांमध्ये निवडणुकीच्याच चर्चाग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावांमध्ये राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. प्रत्येक उमेदवारांनी आपापली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र असे करताना त्यांना कोरोना नियमांचेही पालन करावे लागणार आहे. गावांमधील चौकाचौकात, रात्री शेकोटी पेटवून बसलेले असताना निवडणुकीच्याच चर्चा रंगताना दिसत आहे. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक