शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
6
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
7
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
8
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
9
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
10
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
11
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
12
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
13
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
14
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
15
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
16
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
17
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
18
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
19
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
20
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

जिल्ह्यात 5,159 जागांसाठी 12,677 नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 05:00 IST

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून नामांकन अर्ज दाखल करणे सुरू झाले आहे. त्यानंतर तीन दिवस शासकीय सुटी असल्याने मागील आठवड्यात हे काम थांबले होते. त्यानंतर उमेदवारांची नामांकन दाखल करण्यासाठी एकच गर्दी उसळली.  जिल्ह्यात ६२९ ग्रामपंचायतींच्या एक हजार १८१ प्रभागातून पाच हजार १५९ सदस्य निवडून द्यायचे आहेत. यासाठी दोन हजार १२८ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : गावागावात मोर्चेबांधणीला वेग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. जिल्ह्यात ६२९ ग्रामपंचायत निवडणुकीतील पाच हजार १५९ जागांसाठी तब्बल १२ हजार ६७७ उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत छाननीचे काम सुरू राहणार आहे. त्यानंतर छाननीत जिल्ह्यात एकूण किती उमेदवारांचे अर्ज बाद होतात, हे कळू शकणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून नामांकन अर्ज दाखल करणे सुरू झाले आहे. त्यानंतर तीन दिवस शासकीय सुटी असल्याने मागील आठवड्यात हे काम थांबले होते. त्यानंतर उमेदवारांची नामांकन दाखल करण्यासाठी एकच गर्दी उसळली.  जिल्ह्यात ६२९ ग्रामपंचायतींच्या एक हजार १८१ प्रभागातून पाच हजार १५९ सदस्य निवडून द्यायचे आहेत. यासाठी दोन हजार १२८ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, या निवडणुकांसाठी जिल्हाभरातील एक लाख ३५ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कोरोना संसर्गामुळे यावर्षी ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या सूचना निवडणूक विभागाने दिल्या. मात्र अनेकदा लिंक जुळत असल्याने नामांकन अर्ज सादर करताना अडचणी निर्माण होत होत्या. याबाबतच्या तक्रारी वाढल्यानंतर मंगळवारी म्हणजे अखेरच्या दिवशी नामांकन अर्ज ऑफलाईन सादर करण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यानंतर इच्छुक उमेदवारांची अर्ज सादर करण्यासाठी अचानक गर्दी उसळली. मंगळवारी एकाच दिवशी तब्बल नऊ हजार ६९० उमेदवारांनी आपले नामांकन सादर केले. सोमवारपर्यंत एकूण दोन हजार ९८७ नामांकन दाखल झाले  होते. 

गावांमध्ये निवडणुकीच्याच चर्चाग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावांमध्ये राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. प्रत्येक उमेदवारांनी आपापली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र असे करताना त्यांना कोरोना नियमांचेही पालन करावे लागणार आहे. गावांमधील चौकाचौकात, रात्री शेकोटी पेटवून बसलेले असताना निवडणुकीच्याच चर्चा रंगताना दिसत आहे. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक