शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

२४ किमी रस्त्यावर १२ स्पीड ब्रेकर

By admin | Updated: October 9, 2014 22:59 IST

रस्ता अपघातावर आळा घालण्यासाठी रस्त्यावर स्पिड ब्रेकर लावण्यात येतात. मात्र स्पीड ब्रेकर नियमानुसार बनविण्यात आले नसल्याने आणि प्रमाणापेक्षा जास्त असल्याने अपघात टळण्याऐवजी

चंद्रपूर: रस्ता अपघातावर आळा घालण्यासाठी रस्त्यावर स्पिड ब्रेकर लावण्यात येतात. मात्र स्पीड ब्रेकर नियमानुसार बनविण्यात आले नसल्याने आणि प्रमाणापेक्षा जास्त असल्याने अपघात टळण्याऐवजी अपघात होत आहे. यामुळे अनेकांना विविध आजारांनाही समोर जावे लागत आहे. रस्त्यावरील स्पीड ब्रेकरची संख्या कमी करावी, नियमानुसार बांधावे तसेच पांढरे पट्टे मारावे, अशी मागणी आता वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. चंद्रपूर ते भद्रावती या २४ कि.मी.च्या रस्त्यावर तब्बल १२ स्पीड ब्रेकर आहे. तर चंद्रपूर शहरात वाट्टेल तिथे ब्रेकर असल्याने वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.औद्योगिकरण आणि वाढत्या लोकसंख्येमुळे दिवसेंदिवस वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे अपघाताच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. भद्रावती ते चंद्रपूर या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. सारखी वर्दळ असलेल्या या रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहने जातात. यामुळे अनेकवेळा अपघात झाले आहे. सदर अपघातावर आळा घालण्यासाठी प्रशासनाने रस्त्यावरील काही गावांजवळ, शाळेजवळ स्पीड ब्रेकर लावले आहे. मात्र या स्पीड ब्रेकरची संख्या जास्त आहे. विशेष म्हणजे नियमानुसार ते तयार करण्यात आले नसल्याने आणि पांढरे पट्टे लावण्यात आले नसल्याने वाहनधारकांच्या लक्षात येत नसल्याने अपघाताची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे वाहनधारक आजाराने त्रस्त होत आहे. जेथे गरज आहे तिथेच स्पिड ब्रेकर लावावे, अन्य ठिकाणचे ब्रेकर काढावे, अशी मागणी आता वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. चंद्रपूर ते भद्रावती दरम्यान २४ कि.मी. अंतर आहे. यात १२ स्पीड ब्रेकर आहे. यामुळे महामार्गावरील वाहनधारक अक्षरश: त्रस्त झाले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांमध्ये नागरिकांना विविध आजारांना समोर जावे लागत आहे. सदर स्पिड ब्रेकरसंदर्भात ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. (नगर प्रतिनिधी)