नागभीड तहसील कार्यालयाची कारवाई : गौण खनिजाची अवैध वाहतूकलोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : विना परवाना आणि क्षमतेपेक्षा जास्त गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून येथील तहसील कार्यालयाने गेल्या वर्षभरात १७ लाख ८४ हजार ८४० रुपयांचा दंड वसूल केला आहे.वैनगंगा नदी ब्रह्मपुरी तालुक्याच्या सीमेवर असली तरी या नदीतून काढण्यात येणाऱ्या रेतीची नागभीड तालुक्यातूनच वाहतूक करण्यात येते. ब्रह्मपुरी-नागभीड राष्ट्रीय महामार्ग आणि पाहार्णी-बाम्हणी राज्य महामार्ग हे दोन प्रमुख रस्ते आहेत. या रस्त्यांनी रेतीची वाहतूक करताना वाहतुकदार कधी ती विनापरवाना करीत असतात तर कधी वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त करीत असतात. त्याचबरोबर या तालुक्यातून मुरूम आणि गिट्टीची सुद्धा वाहतूक होत असते. गिट्टी आणि मुरूमही रेतीप्रमाणेच विनापरवाना आणि क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करण्यात येत असते.या विनापरवाना आणि क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या नागभीड तहसील कार्यालयाने १ आॅगस्ट २०१६ ते जुलै १७ या कालावधीत ११७ वाहनांवर कारवाई केली. या वाहनांवर कारवाई करण्यात आल्यानंतर १७ लाख ८४ हजार ८४० रुपये दंड आकारण्यात आला. या वाहनात ट्रक, ट्रॅक्टर आणि हायवा आदी वाहने आहेत. वाहनांवर कारवाई करण्यात आल्यानंतर ही सर्व वाहने येथील पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली व दंड वसूल केल्यानंतर सोडण्यात आली.रस्त्यांची अवस्था दयनीयरेतीची ही वाहतूक वर्षभर होत असल्याने त्यातही रोजच शेकडो ट्रकने ही वाहतूक होते. त्यामुळे रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. पाहार्णी-काटेगाव - बाम्हणी रस्त्याची अवस्था पाहण्यासारखी आहे. स्थानिक नागरिकांना या रस्त्याने प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. तर ब्रह्मपुरी-नागभीड-कानपा हा राष्ट्रीय महामार्गही प्रभावित होत आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने पाळत ठेवावी.
११७ प्रकरणातून १८ लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:06 IST