शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
3
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
4
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
5
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
6
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
7
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
8
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
9
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
10
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
11
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
12
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
13
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
14
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा
15
वयाच्या ७० व्या वर्षी पिता बनला हा अभिनेता, पत्नीसह केलं आठव्या मुलाचं स्वागत
16
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
17
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
18
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
19
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
20
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी

सिंचन शाखेत १४ पैकी ११ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:24 IST

घोडाझरी सिंचन शाखा नवरगाव अंतर्गत विविध ११ पदे मागील दीड वर्षापासून रिक्त असून उपलब्ध असलेल्या कर्मचारी, अधिकाºयांच्या भरोशावर काम करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देकार्यालयाची इमारत जीर्ण : ताडपत्री टाकून चालतो कारभार

दिलीप मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : घोडाझरी सिंचन शाखा नवरगाव अंतर्गत विविध ११ पदे मागील दीड वर्षापासून रिक्त असून उपलब्ध असलेल्या कर्मचारी, अधिकाºयांच्या भरोशावर काम करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.सदर कार्यालयांतर्गत तीन हजार ८२४ हेक्टर शेती सिंचनाखाली येत असून एवढा मोठा पसारा सांभाळण्यासाठी शाखा अभियंता आवश्यक असताना मागील दीड वर्षापासून हे मुख्य पद प्रभारीच्या खांद्यावर आहे. शाखा अभियंता म्हणून काम पाहतात. त्यांच्याकडे नागभीड, नवरगाव आणि मेंडकी या तीन विभागाचा कारभार आहे. व्यक्ती एक आणि तीन ठिकाणाचा कारभार असल्याने ते एखादे वेळी नवरगावला भेट देतात. त्यामुळे पूर्णवेळ नवरगावला शाखा अभियंत्यांची गरज आहे.पाणी वाटपाच्या दृष्टीकोनातून चार बिट पाडले असून गिरगाव बिट क्रमांक एक व दोन, नवरगाव बिट क्रमांक तीन आणि गडबोरी बिट क्रमांक चार असे विभाग असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहा कालवे निरीक्षक आहेत. ही सहाही पदे रिक्त आहेत. कालवा चौकदार चार, दप्तर कारकून एक, मोजणीदार एक व शिपाई पदाची एक अशी एकूण १४ पदांची गरज असताना आजघडीला कालवा चौकीदार, दप्तर कारकून आणि मोजणीदार ही तीनच पदे कार्यरत आहेत. नवरगाव येथील कार्यालयाची दैनावस्था असून कवेलूचे छप्पर असलेला बंगला आहे. ऐन पावसाळ्यात वादळ आल्याने येथील दूरभाष केंद्राचे टॉवर कार्यालयावर कोसळले. मात्र ते पेंडींग सामानाच्या रूमच्या छतावर कोसळले. त्यामुळे कुठलीही जिवितहानी झाली नाही. मात्र त्यावरील कवेलूचे, टॉवरचे नुकसान झाले आहे. तसेच कार्यालयीन इमारत इंग्रजाच्या काळातील असून जिर्ण झालेली आहे. बरेच कवेलू माकडांच्या हैदोसाने फुटले आहेत. त्या ठिकाणी कामकाज करणे शक्य नसल्याने शाखा अभियंता यांचे क्वार्टर बाजूलाच पडित अवस्थेत होते. त्यावर ताडपत्री बांधून कार्यालयीन कामाचा डोलारा कसाबसा समोर रेटला जात आहे. त्यामुळे येथे कार्यालयीन कामासाठी नवीन इमारतीची व शाखा अभियंता यांना निवासी राहण्यासाठी नवीन वास्तु बांधण्याची गरज आहे. कार्यालयीन परिसर मोठा असला तरी त्या परिसराची साफसफाई करण्याची गरज आहे. पावसाळ्याच्या दिवसात या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा वाढलेला असतो. केवळ स्वातंत्र्य दिन आला की ज्या परिसरात झेंडा वंदन होते. त्याच ठिकाणचा परिसर स्वच्छ केला जातो.