शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सिंचन शाखेत १४ पैकी ११ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:24 IST

घोडाझरी सिंचन शाखा नवरगाव अंतर्गत विविध ११ पदे मागील दीड वर्षापासून रिक्त असून उपलब्ध असलेल्या कर्मचारी, अधिकाºयांच्या भरोशावर काम करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देकार्यालयाची इमारत जीर्ण : ताडपत्री टाकून चालतो कारभार

दिलीप मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : घोडाझरी सिंचन शाखा नवरगाव अंतर्गत विविध ११ पदे मागील दीड वर्षापासून रिक्त असून उपलब्ध असलेल्या कर्मचारी, अधिकाºयांच्या भरोशावर काम करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.सदर कार्यालयांतर्गत तीन हजार ८२४ हेक्टर शेती सिंचनाखाली येत असून एवढा मोठा पसारा सांभाळण्यासाठी शाखा अभियंता आवश्यक असताना मागील दीड वर्षापासून हे मुख्य पद प्रभारीच्या खांद्यावर आहे. शाखा अभियंता म्हणून काम पाहतात. त्यांच्याकडे नागभीड, नवरगाव आणि मेंडकी या तीन विभागाचा कारभार आहे. व्यक्ती एक आणि तीन ठिकाणाचा कारभार असल्याने ते एखादे वेळी नवरगावला भेट देतात. त्यामुळे पूर्णवेळ नवरगावला शाखा अभियंत्यांची गरज आहे.पाणी वाटपाच्या दृष्टीकोनातून चार बिट पाडले असून गिरगाव बिट क्रमांक एक व दोन, नवरगाव बिट क्रमांक तीन आणि गडबोरी बिट क्रमांक चार असे विभाग असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहा कालवे निरीक्षक आहेत. ही सहाही पदे रिक्त आहेत. कालवा चौकदार चार, दप्तर कारकून एक, मोजणीदार एक व शिपाई पदाची एक अशी एकूण १४ पदांची गरज असताना आजघडीला कालवा चौकीदार, दप्तर कारकून आणि मोजणीदार ही तीनच पदे कार्यरत आहेत. नवरगाव येथील कार्यालयाची दैनावस्था असून कवेलूचे छप्पर असलेला बंगला आहे. ऐन पावसाळ्यात वादळ आल्याने येथील दूरभाष केंद्राचे टॉवर कार्यालयावर कोसळले. मात्र ते पेंडींग सामानाच्या रूमच्या छतावर कोसळले. त्यामुळे कुठलीही जिवितहानी झाली नाही. मात्र त्यावरील कवेलूचे, टॉवरचे नुकसान झाले आहे. तसेच कार्यालयीन इमारत इंग्रजाच्या काळातील असून जिर्ण झालेली आहे. बरेच कवेलू माकडांच्या हैदोसाने फुटले आहेत. त्या ठिकाणी कामकाज करणे शक्य नसल्याने शाखा अभियंता यांचे क्वार्टर बाजूलाच पडित अवस्थेत होते. त्यावर ताडपत्री बांधून कार्यालयीन कामाचा डोलारा कसाबसा समोर रेटला जात आहे. त्यामुळे येथे कार्यालयीन कामासाठी नवीन इमारतीची व शाखा अभियंता यांना निवासी राहण्यासाठी नवीन वास्तु बांधण्याची गरज आहे. कार्यालयीन परिसर मोठा असला तरी त्या परिसराची साफसफाई करण्याची गरज आहे. पावसाळ्याच्या दिवसात या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा वाढलेला असतो. केवळ स्वातंत्र्य दिन आला की ज्या परिसरात झेंडा वंदन होते. त्याच ठिकाणचा परिसर स्वच्छ केला जातो.