शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

सिंचन शाखेत १४ पैकी ११ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:24 IST

घोडाझरी सिंचन शाखा नवरगाव अंतर्गत विविध ११ पदे मागील दीड वर्षापासून रिक्त असून उपलब्ध असलेल्या कर्मचारी, अधिकाºयांच्या भरोशावर काम करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देकार्यालयाची इमारत जीर्ण : ताडपत्री टाकून चालतो कारभार

दिलीप मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : घोडाझरी सिंचन शाखा नवरगाव अंतर्गत विविध ११ पदे मागील दीड वर्षापासून रिक्त असून उपलब्ध असलेल्या कर्मचारी, अधिकाºयांच्या भरोशावर काम करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.सदर कार्यालयांतर्गत तीन हजार ८२४ हेक्टर शेती सिंचनाखाली येत असून एवढा मोठा पसारा सांभाळण्यासाठी शाखा अभियंता आवश्यक असताना मागील दीड वर्षापासून हे मुख्य पद प्रभारीच्या खांद्यावर आहे. शाखा अभियंता म्हणून काम पाहतात. त्यांच्याकडे नागभीड, नवरगाव आणि मेंडकी या तीन विभागाचा कारभार आहे. व्यक्ती एक आणि तीन ठिकाणाचा कारभार असल्याने ते एखादे वेळी नवरगावला भेट देतात. त्यामुळे पूर्णवेळ नवरगावला शाखा अभियंत्यांची गरज आहे.पाणी वाटपाच्या दृष्टीकोनातून चार बिट पाडले असून गिरगाव बिट क्रमांक एक व दोन, नवरगाव बिट क्रमांक तीन आणि गडबोरी बिट क्रमांक चार असे विभाग असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहा कालवे निरीक्षक आहेत. ही सहाही पदे रिक्त आहेत. कालवा चौकदार चार, दप्तर कारकून एक, मोजणीदार एक व शिपाई पदाची एक अशी एकूण १४ पदांची गरज असताना आजघडीला कालवा चौकीदार, दप्तर कारकून आणि मोजणीदार ही तीनच पदे कार्यरत आहेत. नवरगाव येथील कार्यालयाची दैनावस्था असून कवेलूचे छप्पर असलेला बंगला आहे. ऐन पावसाळ्यात वादळ आल्याने येथील दूरभाष केंद्राचे टॉवर कार्यालयावर कोसळले. मात्र ते पेंडींग सामानाच्या रूमच्या छतावर कोसळले. त्यामुळे कुठलीही जिवितहानी झाली नाही. मात्र त्यावरील कवेलूचे, टॉवरचे नुकसान झाले आहे. तसेच कार्यालयीन इमारत इंग्रजाच्या काळातील असून जिर्ण झालेली आहे. बरेच कवेलू माकडांच्या हैदोसाने फुटले आहेत. त्या ठिकाणी कामकाज करणे शक्य नसल्याने शाखा अभियंता यांचे क्वार्टर बाजूलाच पडित अवस्थेत होते. त्यावर ताडपत्री बांधून कार्यालयीन कामाचा डोलारा कसाबसा समोर रेटला जात आहे. त्यामुळे येथे कार्यालयीन कामासाठी नवीन इमारतीची व शाखा अभियंता यांना निवासी राहण्यासाठी नवीन वास्तु बांधण्याची गरज आहे. कार्यालयीन परिसर मोठा असला तरी त्या परिसराची साफसफाई करण्याची गरज आहे. पावसाळ्याच्या दिवसात या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा वाढलेला असतो. केवळ स्वातंत्र्य दिन आला की ज्या परिसरात झेंडा वंदन होते. त्याच ठिकाणचा परिसर स्वच्छ केला जातो.