शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
4
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
5
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
6
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
7
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
8
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
9
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
11
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
12
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
13
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
14
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
15
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
16
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
17
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
18
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
19
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
20
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या

१० हजार टेलिफोनची खणखण मंदावली

By admin | Updated: May 16, 2015 01:34 IST

बीएसएनएल या शासकीय कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे गेल्या चार वर्षांत दहा हजारांहून अधिक टेलिफोेन ग्राहकांची संख्या कमी झाली आहे.

मंगेश भांडेकर चंद्रपूर बीएसएनएल या शासकीय कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे गेल्या चार वर्षांत दहा हजारांहून अधिक टेलिफोेन ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. तर याच कालावधीत जिल्ह्यातील तब्बल ३७ हजार मोबाईल ग्राहकांनी खासगी सेवेचा मार्ग अवलंबिला आहे. बीएसएनएल सेवेत वारंवार येत असलेला बिघाड हे या मागचे मुख्य कारण असून अनेक ग्राहक बीएसएनएलच्या सेवेला कंटाळले असल्याचे यावरून दिसून येते.भारतात दूरसंचार सेवेला सुरूवात झाली तेव्हा टेलीफोन ग्राहकांची संख्या अधिक होती. बीएसएनएल ही शासकीय कंपनी म्हणून या कंपनीकडे अनेक टेलीफोनधारकांचा कल होता. त्यामुळे जिल्हाभरात बीएसएनएलचे लाखो ग्राहक निर्माण झाले. मात्र या सेवेला आता ग्रहण लागल्याचे चित्र ग्राहकांची संख्या कमी होण्यावरून दिसून येत आहे. २०११-१२ या वर्षात जिल्ह्यात बीएसएनएलचे टेलीफोनधारक ग्राहक ३२ हजार ३८४ होते. तर मोबाईल ग्राहक १ लाख ४० हजार ७७८ होते. तर चालू वर्षात टेलीफोनधारक ग्राहक २२ हजार १४२ तर मोबाईलधारक ग्राहक १ लाख ३ हजार ६९४ एवढे आहेत. यात गेल्या चार वर्षांत १० हजार २४२ टेलीफोनधारक तर ३७ हजार ८४ मोबाईलधारक ग्राहक कमी झाले आहेत. बीएसएनएलच्या भ्रमनध्वनी सेवेत बिघाड हा नित्याचाच झाला असल्याचे अनेक ग्राहकांचे म्हणणे आहे. शहरी भागापासून तर ग्रामीण भागापर्यंत भ्रमणध्वनी सेवेचे जाळे विणणाचे काम बीएसएनएल कंपनीकडून झाले आहे. अनेक गावात भ्रमनध्वनी सेवा बीएसएनएलच्या माध्यमातून पोहचली आहे. मात्र सेवेत येत असलेला बिघाड ग्राहकांच्या डोकेदुखीचा विषय बनला आहे. त्यातच अनेक खासगी कंपन्या गावागावत पोहचल्या असून विविध योजना राबवून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षीत करून घेत आहेत. मात्र त्या तुलनेत बीएसएनएल कंपनी मागे पडत असल्याने ग्राहक खासगी कंपनीकडे वळले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. भविष्यात आणखी काही ग्राहक कमी होण्याची शक्यता आहे. खासगी कंपन्या पडताहेत भारीदूरसंचार क्षेत्रात विविध खासगी कंपन्या उतरल्या असून या कंपन्यांच्या स्पर्धेत बीएसएनएल कंपनी मागे पडत असल्याचे दिसून येत आहे. इंटरनेट सेवा, एसएमएस सेवा, रोमींग, कॉलींग दर हे विविध कंपन्यांचे वेगवेगळे आहेत. या तुलनेत बीएसएनएलचे दर अधिक असल्याचे ग्राहक सांगतात.टॉवर उभारण्यास दिरंगाई दूरसंचार क्षेत्रात बीएसएनएल ही एकच शासकीय कार्यरत असताना भविष्यातील विचार करून अनेक गावात टॉवर उभारणीसाठी रस्त्यात केबल टाकण्यात आले. मात्र आधुनीकरणात नव्याने रस्ते तयार झाले आहेत. यात बीएसएनएलने रस्त्यात टाकलेले केबल तुटले असून आता नव्याने केबल टाकण्यास दिरंगाई होत आहे. तर दुसरीकडे खासगी कंपन्या अतिरीक्त पैसा मोजून केबल टाकण्यासाठी पाऊले उचलतात. त्यामुळे ग्रामीण भागातही खासगी सेवेचे ग्राहक वाढले आहेत. परवानगीसाठी अडकतात कामेएखाद्या गावात टॉवर उभारणी किंवा केबल टाकण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागत असते. यात वरिष्ठांकडून दिरंगाई केली जाते. तर खासगी कंपन्या यात सरस ठरतात. त्यामुळे ग्राहकांचा कल खासगी सेवेकडे वळला असल्याचे खुद्द बीएसएनएलच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.