शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

क्लास परवडेना! इंटरनेटवरुन अभ्यास करत UPSC क्रॅक; जिद्दी तरुणाचा प्रेरणादायी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 12:21 IST

या तरुणाने इंटरनेटलाच आपले गुरु बनविले. मेहनतीवर विश्वास ठेवला अन् UPSC परीक्षेत वरचे रँकिंग मिळवले.

नवी दिल्ली: UPSC ची परीक्षा देशातील अतिशय कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. UPSC ची परीक्षा क्रॅक करणे ही अजिबात सोपी गोष्ट नाही. सातत्य, चातुर्य, चिकाटी, मेहनत, परिश्रम आणि अपार अभ्यास यांच्या जोरावरच यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होता येते. त्यात रँकिंगमध्ये येणे ही त्यातून अवघड गोष्ट. मात्र, एका जिद्दी तरुणाने ही किमया साकार केली आहे. महागडे कोचिंग क्लासेस परवडत नाही म्हणून चक्क इंटरनेटवरून अभ्यास करून या तरुणाने UPSC ची परीक्षा केवळ उत्तीर्ण केली नाही. तर, संपूर्ण देशात ३४० वा रँकही मिळवला.

यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रत्येकाची कहाणी प्रेरणादायी आहे. आयएएस होण्यापूर्वीचे प्रशिक्षण अधिक कठोर मानले जाते. पण तुमचे शारीरिक व्यंग, दुर्बलता, आर्थिक परिस्थिती या गोष्टी यशाच्या आड येत नाहीत. हे निकालातून स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील संत नगरच्या राघवेंद्र शर्मा याची कहाणी देखील अशीच प्रेरणादायी आहे. तुमच्या मनातील जिद्द पक्की असेल आणि मेहनत घेण्याची तयारी असेल तर यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही, हेच राघवेंद्र शर्मा याच्या उदाहरणावरून अधिक स्पष्ट होते. 

इंटरनेटलाच आपले गुरु बनविले

इंटरनेट हे दुधारी शस्त्रासारखे आहे. त्याचे जितके चांगले परिणाम आहेत, तितके वाईटही असल्याचे सांगितले जाते. आजच्या काळात जगातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर इंटरनेटकडे आहे, अशी मान्यता आहे. इंटरनेटचा चांगला उपयोग फारच कमीजण करतात. या कमी जणांमध्ये राघवेंद्र शर्मा याचा नंबर लागतो. त्याने इंटरनेटच्या मदतीन यूपीएससी क्रॅक केली. पैशाच्या कमतरतेमुळे राघवेंद्रला यूपीएससीच्या प्रत्येक कोर्सचे कोचिंग घेता आले नाही. असे असताना हार न मानता त्याने इंटरनेटलाच आपले गुरु बनविले आणि आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवून त्याने अभ्यास सुरु ठेवला. आणि याचे फळ त्याला यूपीएससी निकालात मिळाले.

अपयशाने पाठ सोडली नव्हती

यूपीएससीच्या तयारीसाठी कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही. जीएसची तयारी मित्रांकडून नोट्स मागवून केल्याचे राघवेंद्र शर्मा याने सांगितले. सोशल मीडियावर एक ग्रुप तयार करून इतर इच्छुकांसह त्याने नोट्स शेअरिंग केले. यूपीएससी कोचिंग खूप महाग असल्याने आर्थिकदृष्ट्या परवडणार नसल्याने राघवेंद्रने हा मार्ग निवडला. राघवेंद्र पहिल्याच प्रयत्नात मुलाखतीपर्यंत पोहोचला. मात्र अंतिम गुणवत्तेतमध्ये २ गुण कमी पडले. अपयशाने त्याची पाठ सोडली नव्हती. 

निराशा बाजूला सारुन मेहनतीने परीक्षा दिली

दुसऱ्या प्रयत्नात राघवेंद्रने सर्व प्रयत्न केले आणि यूपीएससीमध्ये ऑल इंडिया ३४० क्रमांक मिळाला. अंतिम निकाल लागल्यानंतर पुढील प्रिलिम्स परीक्षा अवघ्या १४ दिवसांवर होती. पहिल्याच प्रयत्नात आपण यशस्वी होऊ याची खात्री त्याला होती. यामुळे वर्षभराची मेहनत व्यर्थ गेली आणि राघवेंद्रने पुन्हा नव्याने तयारी केली. ही निराश होण्याची वेळ नाही, हे त्याला समजले होते. अशा परिस्थितीत तो निराशा बाजूला सारुन मेहनतीने परीक्षेला सामोरा गेला आणि यावेळी त्याने यूपीएससी क्रॅक केली. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षाNew Delhiनवी दिल्ली