शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

भाषांतरकार : नोकरीच्या संधीचे नवे भांडार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 02:46 IST

जागतिकीकरणामुळे संपूर्ण जग कवेत आले आहे. त्यामुळे सध्याच्या काळात भाषांतराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

जागतिकीकरणामुळे संपूर्ण जग कवेत आले आहे. त्यामुळे सध्याच्या काळात भाषांतराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. वेगवेगळ्या देशांच्या संस्कृतीच्या किंवा सामाजिकतेच्या सीमा ओलांडून नवनवीन ज्ञान प्राप्त करणे, हा कुठेतरी सर्वांसाठी उत्सुकतेचा किंवा ज्ञानाचा विषय ठरला आहे. एखाद्या विशिष्ट भाषेमधून दुसऱ्या भाषेमध्ये जो काही आशय किंवा मजकूर असेल, त्याला त्या विशिष्ट भाषेतील लोकांना कळेल, अशा शब्दांमध्ये गुंफून त्या आशयाची बांधणी करणे, म्हणजेच भाषांतर होय. एका भाषेमधून दुसºया भाषेमधील आशय किंवा मजकूर, त्याच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता दुसºया भाषेत अनुवादित करणे, म्हणजेच भाषांतर होय. मात्र, यासाठी दोन्ही भाषांचे सर्वांगीण ज्ञान भाषांतरकाराला असायला हवे. यामध्ये जर तुम्ही प्रावीण्य मिळवले तर तुमच्यासाठी संधीचे भांडार खुले आहे.भाषांतरामधील संधीविविध दस्तावेज किंवाकागदपत्रांचे भाषांतर :प्रशासकीय कार्य हे एका विशिष्ट भाषेतून चालते. मात्र, इतर भाषांमध्येसुद्धा त्याचे भाषांतर करण्याची गरज भासते. भारताचाच विचार केला, तर भारतात विभिन्न राज्यांमध्ये भिन्न भिन्न भाषा बोलल्या जातात आणि त्या त्या राज्याचे कार्य त्या त्या भाषेतून होत असते. केंद्र सरकारचे काम हिंदी किंवा इंग्रजी या भाषांमधून होते, तर राज्य सरकारचे काम स्थानिक भाषेमधून होते (उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर शासकीय कार्य हे मराठीतून होते). मग अशा वेळेला वेगवेगळे कागदपत्र, दस्तावेज यांचे भाषांतर करण्याची गरज भासते. अनेक वेळा सरकारी कचेरीमधून म्हणजेच कोर्टकचेरीमधूनही भाषांतराची गरज भासत असते.विविध कायद्यांची अंमलबजावणी करत असताना त्या कायद्यांचे रूपांतर त्या विशिष्ट भाषेमध्ये करून मगच ते लोकांपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे शासकीय अनुवाद हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याला प्रशासकीय अनुवादाची जोड आहे.जाहिरातीचे भाषांतरबहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतामध्ये प्रवेश केल्यापासून त्यांच्यासाठी बाजारपेठ विस्तारण्यासाठी किंवा स्वत:चे उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचे एक महत्त्वाचे माध्यम म्हणजे जाहिरात होय. त्यामुळे जाहिरातींमध्ये सुद्धा भाषांतराची नवीन संधी उपलब्ध झाली आहे. जाहिरातींचे भाषांतर करत असताना त्यात त्या त्या कल्पना म्हणजे जाहिरात जशी मुळात सर्जनात्मक असते, ती सर्जनशीलता दुसºया भाषेमध्ये जशीच्या तशी येणे आवश्यक असते. त्यामुळे पटकन लोकांच्या मनाचा ठाव घेणारी, लोकांना चटकन उच्चारता येणारी, त्यांना पाठ होणारी अशी जाहिरात तयार करावी लागते.वेगवेगळ्या जाहिरातींच्या टॅगलाइन किंवा कॅचलाइन यांचे इतर भाषांमध्ये भाषांतर करत असताना खूप कसरत करावी लागते. एखाद्या जाहिरातीसाठी जे काही मसुदा लेखन केले जाते. त्या मसुदा लेखनाचे भाषांतर आजकाल आवश्यक झाले आहे.हे भाषांतर करत असताना त्यामध्ये खूप जास्त सावध राहणे आवश्यक आहे. भारताचा विचार केला तर इंग्रजीमधील जाहिराती या मराठी, गुजराथी, हिंदी, पंजाबी, तामिळ, बंगाली, कानडी ,तेलुगू, मल्याळम, ओरिया अशा भाषांमध्ये भाषांतरीत कराव्या लागतात, त्यामुळे भाषांतरकाराला मसुदा लेखनाचे भाषांतर हे एक महत्त्वाचा पर्याय उपलब्ध आहे. विभिन्न प्रादेशिक भाषांमध्ये ज्यांनी आपली पदवी घेतली आहे. त्यांना भाषांतराची संधी उपलब्ध असते, अर्थात त्यासाठी त्यांना ज्या भाषेतून भाषांतर करायचे ती भाषा आणि ज्या भाषेत भाषांतर करायची ती भाषा, यावर प्रभुत्त्व असणे आवश्यक असते. महाराष्ट्राचाच विचार केला तर मराठीतून बीए, बीएमएम करणारे अशा पदवीधारकांना भाषांतराचे हे माध्यम उपलब्ध आहे. इतर भाषांवर असलेले प्रभुत्त्व, संगणकीय ज्ञान, इतर कौशल्य, इतर भाषांमधील पुस्तकांचे वाचन हे जर व्यवस्थित असेल, तर ती व्यक्ती आणखीन जास्त चांगल्यापद्धतीने भाषांतर करू शकते. एकूणच भाषांतरासाठी अशी बरीचशी दालने आता उपलब्ध आहेत.>पुस्तकाचे भाषांतरभाषांतरामधला सर्वात जास्त चर्चित व लोकांना माहीत असलेले भाषांतर म्हणजे पुस्तकांचे भाषांतर होय. गेल्या दोन दशकांमध्ये विभिन्न देशांतल्या गाजलेल्या पुस्तकांचे किंवा गाजलेल्या लेखकांच्या प्रसिद्ध साहित्यकृतींचे भाषांतर करण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे. असे बाजारात असलेल्या एकूण पुस्तकांमधून दिसते. भारताचा विचार केला तर अमेरिका, युरोप, रशिया, जर्मनी इथल्या पुस्तकांचे अनुवाद आपल्याकडे उपलब्ध होताना दिसतात. याखेरीज भारतीय भाषांमधले भिन्न भिन्न भाषांमधल्या गाजलेल्या कादंबºया, कथासंग्रह, कविता यांचेसुद्धा भाषांतर होताना आपल्याला दिसते. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त पुस्तकांचे भाषांतर तर हमखासच होते. याखेरीज अत्यंत गाजलेल्या आणि चर्चेत असलेल्या पुस्तकांचेसुद्धा भाषांतर होताना आपल्याला दिसते आणि त्यामुळे भाषेची मर्यादा ओलांडून त्या त्या विषयातील साहित्यप्रेमींना हा पुस्तकांचा ठेवा प्राप्त होतो. यात वेगवेगळ्या प्रकाशन संस्था लेखकाला मानधन देतात. विविध माध्यमे लोकरुचीनुसार त्यांना मजकूर पुरवीत असतात. यामध्ये वृत्तपत्रे, सिनेमा, रेडिओ , टेलिव्हिजन या सर्वच माध्यमांचा समावेश होतो. यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आशय, त्याचे बिनचूक भाषांतर करावे लागते. मात्र, त्याच बरोबर त्या त्या मालिका किंवा चित्रपटाप्रमाणे त्यात काही बदल केले जातात, म्हणजेच मूळ इंग्रजीतल्या किंवा दक्षिण भारतीय भाषेतल्या चित्रपटांसाठी सबटायटल्स किंवा डबिंग ज्या वेळेला हिंदीमध्ये केले जाते, तेव्हा त्यात हिंदीतील काही गाजलेली उदाहरणे टाकावी लागतात, हा याच्यातील फरक आहे.