शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

पोलीस हवालदाराची पोरगी IAS झाली; सातारच्या बोरी गावच्या स्नेहल धायगुडेची आकाशाला गवसणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 15:52 IST

खंडाळा तालुक्यातील बोरी गावची मुलगी स्नेहल धायगुडे हिने वयाच्या २२ व्या वर्षी आयएएस परीक्षेत यश संपादन केले

ठळक मुद्देजिद्द आणि चिकाटीच्या बळावर २०१८ मध्ये स्नेहलने यूपीएसी परीक्षेत यश मिळवलं राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यात परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार हातीसातारच्या दुष्काळी भागातील बोरी गावची मुलगी सर्वात तरुण महिला अधिकारी बनली

प्रविण मरगळे

मुंबई – जिद्द आणि चिकाटी अंगात असली तर आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न पूर्ण करता येतं. सातारच्या बोरी गावातील मुलीने याच स्वप्नाचा पाठलाग करत आज राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या आहेत. पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल असणाऱ्या नानासाहेब धायगुडे यांची कन्या स्नेहलला मिळालेल्या यशाने अवघ्या बोरी गावात उत्साह पसरला आहे.

खंडाळा तालुक्यातील बोरी गावची मुलगी स्नेहल धायगुडे हिने वयाच्या २२ व्या वर्षी आयएएस परीक्षेत यश संपादन केले. २०१८ मध्ये स्नेहलचा देशात १०८ वा नंबर आला होता. त्यानंतर ट्रेनिंगनंतर अलीकडेच तिने राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यात परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार हाती घेतला आहे. एका लहानश्या कुटुंबात जन्मलेल्या या मुलीने साखरवाडी येथे मराठी माध्यमातून शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर बारामतीतल्या शारदा आश्रम येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण करुन पुण्यातील कृषी महाविद्यालयात बीएससी एग्रो ही पदवी मिळवली.

कॉलेज जीवनापासून स्नेहलने अपार मेहनत घेत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. २०१७ मध्ये अवघ्या २ महिन्याच्या कालावधीत तिने बेसिक तयारीच्या जोरावर यूपीएससी पूर्व परीक्षा दिली, दुर्दैवाने पहिल्या परीक्षेत तिला अपयश आलं. मात्र यातून मागे न हटता तिने आणखी अभ्यास केला. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर तिने २०१८ मध्ये पुन्हा यूपीएससीची परीक्षा दिली. या परीक्षेत देशात १०८ वा रॅँक मिळवत ती वयाच्या २२ व्या वर्षी आयएएस झाली. राज्यातील सर्वात तरुण महिला अधिकारी होण्याचा मान मिळवला.

स्नेहलचे वडील सातारा पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल म्हणून काम करतात तर आई गृहिणी आहे, गावाकडे शेती सांभाळत स्नेहलने शिक्षणाला सुरुवात केली. स्नेहलच्या या यशात सर्वाधिक वाटा आई-वडिलांचा असल्याचं ती सांगते. कारण मुलीने शिकलं पाहिजे यासाठी आई-वडिलांनी तिच्यासाठी मेहनत घेतली. तिच्या वयाच्या मुला-मुलींची लग्न झाली पण आपल्यावर कधीच घरच्यांनी दबाव टाकला नाही, आयुष्यात जे हवं ते करण्यासाठी पाठबळ दिलं. मुलीवरचा हाच विश्वास मी सार्थ केला असं स्नेहलने सांगितले.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीupscकेंद्रीय लोकसेवा आयोग