शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

दुसर्‍याच्या नाही, पण तुमच्या स्वभावाला औषध आहे, ते घेऊन पहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 14:03 IST

संशाधन म्हणतं की, माणसाचा मेंदू आयुष्यभर बदलत असतो, त्या बदलाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे.

ठळक मुद्देसजगता ध्यान हा माईण्डफुलनेसचा एक भाग, तो शिकायला हवा.

-डॉ. यश वेलणकर

आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून मेंदूचे संशोधन होत आहे. त्यावरून मेंदूसंबंधी पूर्वी आपल्या अनेक जुन्या समजुती चुकीच्या होत्या असे लक्षात येते आहे। त्यातले काही गैरसमज समजून घेऊन स्वतःच्याच  मेंदूकडे नव्यानं पाहिलं, तर आपलं आयुष्य अधिक सुकर होऊ शकेल.

पहिला गैरसमज 

ठराविक वय झाले की मेंदूत बदल होणे थांबते।

सत्य

मेंदू आयुष्यभर सतत बदलत असतो।याला न्यूरॉप्लॅस्टिसटी म्हणतात. माणूस जे अनुभव घेत असतो त्यानुसार त्याच्या मेंदूत नवीन कनेक्शन तयार होत असतात. माणसाला एखादे काम सतत करावे लागले तर मेंदूतील त्या कृतीशी निगिडत भाग सक्रिय राहतो ।उदाहरणार्थ माणूस कॉम्प्युटर वर टाईप करीत असतो, त्यावेळी मेंदूतील ठराविक भाग सक्रिय असतो. हे काम सरावाचे होते त्यावेळी मेंदूच्या ते काम करणार्‍या भागात नवीन पेशी तयार होतात किंवा अशा पेशी तयार होतात त्याचवेळी ते काम सरावाचे झाले असे आपण म्हणतो।नियमित ड्रायव्हींग करणार्‍या आणि त्यासाठी दिशा लक्षात ठेवणार्‍या माणसांच्या मेंदूतील दिशांची जाणीव करून देणारा भाग विकिसत होतो असे संशोधनात दिसून आले आहे. एखादे कौशल्य वाढते त्याचे प्रत्यंतर प्रत्यक्ष मेंदूत दिसून येते. त्यामुळे जे कौशल्य आत्मसात करायचे आहे त्याचा नियमित सराव आवश्यक आहे।

दुसरा  गैरसमज

स्वभावाला औषध नाही कारण तो मेंदुत जन्मजात असतो.

सत्य 

वरील वाक्य अर्धसत्य आहे. दुसर्‍याच्या स्वभावाला औषध नाही, पण स्वतर्‍ चा स्वभाव बदलता येतो।स्वभाव म्हणजे मेंदूतील ठराविक पाथवे, एक घटना घडली की मेंदूत ठराविक भाग ,एक ठरलेला मार्ग सक्रिय होतो, त्यानुसार आपली प्रतिक्रिया असते. या प्रतिक्रि या करण्याच्या पॅटर्न ला आपण स्वभाव म्हणतो. तो बदलता येतो. निसर्गतर्‍ मेंदूत अमायगडाला नावाचा भाग सतत प्रतिक्रिया करत असतो. ही प्रतिक्रि या तीव्र असेल तर राग,चिंता,नैराश्य या भावना तीव्र असतात।माणसाचे अवधान असेल तर तो ही प्रतिक्रि या देण्याची  सवय बदलवू शकतो. माईंडफूलनेस मेडिटेशनमध्ये ही सवय बदलायची असते। शरीरावरील संवेदना जाणल्या जात आहेत पण त्यांना प्रतिक्रि या दिली जात नाही. या स्थितीत मेंदूचे परीक्षण केले असता  मेंदूतील भाविनक मेंदू म्हणजेच अमायगडाला शांत असतो आणि वैचारिक मेंदू म्हणजेच प्रीफ्रंटल कोरटेक्स मधील भावना नियंत्नण करणारा भाग अधिक सक्रिय असतो.अशी प्रतिक्रि या करण्याची सवय कमी केली की हळूहळू स्वभाव बदलतो. पण हे बदल दुसर्‍या  माणसात करणे शक्य नसते कारण त्यासाठी मेंदूतील ही जडणघडण बदलणे गरजेचे असते,म्हणून दुसर्‍याच्या  स्वभावाला औषध नाही।मेंदूतील ज्या पेशी एकाच वेळी सक्रिय असतात. त्या एकमेकांना जोडल्या जातात. त्यामुळे एखाद्या घटनेला ठराविक प्रतिक्रिया न करता माणूस वेगळा प्रतिसाद निवडतो त्यावेळी नवीन पाथवे तयार होतात, ते पाथवे दृढ झाले की स्वभाव बदलतो।मात्न केवळ बुद्धीच्या पातळीवर हे समजून उपयोग होत नाही. कारण मेंदूचे प्रोग्रामिंग बदलणे गरजेचे असते आणि ते सजगता ध्यानाच्या नियमति अभ्यासाने होते.माणूस जे काही शरीराने ,मनाने करीत असेल , मेंदूतील तो भाग त्यावेळी सक्रिय असतोच,पण ही सक्रियता तात्पुरती असते. मेंदूत रचनात्मक बदल दिसण्यासाठी ही सक्रियता अधिकाधिक वेळ राहावी लागते. याचे संशोधन झाले आहे, त्यानुसार रोज वीस मिनिटे असे दोन महिने सजगता ध्यान केले, म्हणजेच प्रतिक्रि या न करता संवेदना जाणण्याचा सराव केला की मेंदूतील भावना नियंत्नण करणारी केंद्रे विकिसत होतात हे दिसून आले आहे.