शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

दुसर्‍याच्या नाही, पण तुमच्या स्वभावाला औषध आहे, ते घेऊन पहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 14:03 IST

संशाधन म्हणतं की, माणसाचा मेंदू आयुष्यभर बदलत असतो, त्या बदलाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे.

ठळक मुद्देसजगता ध्यान हा माईण्डफुलनेसचा एक भाग, तो शिकायला हवा.

-डॉ. यश वेलणकर

आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून मेंदूचे संशोधन होत आहे. त्यावरून मेंदूसंबंधी पूर्वी आपल्या अनेक जुन्या समजुती चुकीच्या होत्या असे लक्षात येते आहे। त्यातले काही गैरसमज समजून घेऊन स्वतःच्याच  मेंदूकडे नव्यानं पाहिलं, तर आपलं आयुष्य अधिक सुकर होऊ शकेल.

पहिला गैरसमज 

ठराविक वय झाले की मेंदूत बदल होणे थांबते।

सत्य

मेंदू आयुष्यभर सतत बदलत असतो।याला न्यूरॉप्लॅस्टिसटी म्हणतात. माणूस जे अनुभव घेत असतो त्यानुसार त्याच्या मेंदूत नवीन कनेक्शन तयार होत असतात. माणसाला एखादे काम सतत करावे लागले तर मेंदूतील त्या कृतीशी निगिडत भाग सक्रिय राहतो ।उदाहरणार्थ माणूस कॉम्प्युटर वर टाईप करीत असतो, त्यावेळी मेंदूतील ठराविक भाग सक्रिय असतो. हे काम सरावाचे होते त्यावेळी मेंदूच्या ते काम करणार्‍या भागात नवीन पेशी तयार होतात किंवा अशा पेशी तयार होतात त्याचवेळी ते काम सरावाचे झाले असे आपण म्हणतो।नियमित ड्रायव्हींग करणार्‍या आणि त्यासाठी दिशा लक्षात ठेवणार्‍या माणसांच्या मेंदूतील दिशांची जाणीव करून देणारा भाग विकिसत होतो असे संशोधनात दिसून आले आहे. एखादे कौशल्य वाढते त्याचे प्रत्यंतर प्रत्यक्ष मेंदूत दिसून येते. त्यामुळे जे कौशल्य आत्मसात करायचे आहे त्याचा नियमित सराव आवश्यक आहे।

दुसरा  गैरसमज

स्वभावाला औषध नाही कारण तो मेंदुत जन्मजात असतो.

सत्य 

वरील वाक्य अर्धसत्य आहे. दुसर्‍याच्या स्वभावाला औषध नाही, पण स्वतर्‍ चा स्वभाव बदलता येतो।स्वभाव म्हणजे मेंदूतील ठराविक पाथवे, एक घटना घडली की मेंदूत ठराविक भाग ,एक ठरलेला मार्ग सक्रिय होतो, त्यानुसार आपली प्रतिक्रिया असते. या प्रतिक्रि या करण्याच्या पॅटर्न ला आपण स्वभाव म्हणतो. तो बदलता येतो. निसर्गतर्‍ मेंदूत अमायगडाला नावाचा भाग सतत प्रतिक्रिया करत असतो. ही प्रतिक्रि या तीव्र असेल तर राग,चिंता,नैराश्य या भावना तीव्र असतात।माणसाचे अवधान असेल तर तो ही प्रतिक्रि या देण्याची  सवय बदलवू शकतो. माईंडफूलनेस मेडिटेशनमध्ये ही सवय बदलायची असते। शरीरावरील संवेदना जाणल्या जात आहेत पण त्यांना प्रतिक्रि या दिली जात नाही. या स्थितीत मेंदूचे परीक्षण केले असता  मेंदूतील भाविनक मेंदू म्हणजेच अमायगडाला शांत असतो आणि वैचारिक मेंदू म्हणजेच प्रीफ्रंटल कोरटेक्स मधील भावना नियंत्नण करणारा भाग अधिक सक्रिय असतो.अशी प्रतिक्रि या करण्याची सवय कमी केली की हळूहळू स्वभाव बदलतो. पण हे बदल दुसर्‍या  माणसात करणे शक्य नसते कारण त्यासाठी मेंदूतील ही जडणघडण बदलणे गरजेचे असते,म्हणून दुसर्‍याच्या  स्वभावाला औषध नाही।मेंदूतील ज्या पेशी एकाच वेळी सक्रिय असतात. त्या एकमेकांना जोडल्या जातात. त्यामुळे एखाद्या घटनेला ठराविक प्रतिक्रिया न करता माणूस वेगळा प्रतिसाद निवडतो त्यावेळी नवीन पाथवे तयार होतात, ते पाथवे दृढ झाले की स्वभाव बदलतो।मात्न केवळ बुद्धीच्या पातळीवर हे समजून उपयोग होत नाही. कारण मेंदूचे प्रोग्रामिंग बदलणे गरजेचे असते आणि ते सजगता ध्यानाच्या नियमति अभ्यासाने होते.माणूस जे काही शरीराने ,मनाने करीत असेल , मेंदूतील तो भाग त्यावेळी सक्रिय असतोच,पण ही सक्रियता तात्पुरती असते. मेंदूत रचनात्मक बदल दिसण्यासाठी ही सक्रियता अधिकाधिक वेळ राहावी लागते. याचे संशोधन झाले आहे, त्यानुसार रोज वीस मिनिटे असे दोन महिने सजगता ध्यान केले, म्हणजेच प्रतिक्रि या न करता संवेदना जाणण्याचा सराव केला की मेंदूतील भावना नियंत्नण करणारी केंद्रे विकिसत होतात हे दिसून आले आहे.