शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

काय करणार निर्णयच घेता येत नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 16:21 IST

अनेक जणांना छोटे छोटे निर्णयही घेता येत नाहीत, लोक काय म्हणतील याचाच ते जास्त विचार करतात.

ठळक मुद्देआपल्याला काय हवं आहे याचा नेमका विचार करा.रिस्क घ्या.मनानं निर्णय घेत असाल तर त्याला बुद्धीची जोड द्या.

-योगिता तोडकर

रोज आपण अनेक निर्णय घेत असतो, अगदी आत्ता चहा घेऊ कि खाऊ इथेपासून ते आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टींना कलाटणी  देणार्‍या निर्णयांर्पयत.

निर्णय घेताना अनेक घटक कार्यरत असतात. पण थोडक्यात त्याचे वर्गीकरण करायचे झाले तर आंतरिक आणि बाह्य घटक असे ढोबळमानाने आपण करू शकू.

आपल्या आंतरिक घटकांमध्ये भावना, विचार, अनुभव असे अनेक खेळाडू असतात. पण त्यात चौकार न षटकार मारणारे दोनच. मन काय सांगतंय (इंटय़ुशन) आणि विचार करायला लावणारी बुद्धी.

आता या दोनपैकी महत्वाचं कोण? 

काही निर्णय आपल्याला खूप जलद घ्यावे लागतात, त्यावेळेस बहुतांशपणे मन काय कौल देतंय याचाच आधार घेतला जातो. पण काही वेळेस आपण घेतलेल्या निर्णयांचा खूप जास्त काळापर्यंत आपल्या आयुष्याच्या वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक, अशा एक ना अनेक स्तरांवर होणार असेल तर उत्तम मार्ग म्हणजे मन काय सांगतंय याला बुद्धीची जोड देणं.

असे निर्णय घेताना सर्व प्रथम  मला काय हवं आहे याचा विचार करावा. एक समुपदेशक म्हणून जेंव्हा मी पाहते तेंव्हा मला असे दिसून आलं कि आपण लहानपणापासून मुलांना निर्णय घ्यायला शिकूच देत नाही. एकतर त्याच्या वतीने पालकच निर्णय घेत असतात. अथवा जेंव्हा मुलं निर्णय घ्यायचा प्रयत्न करतो तेंव्हा सगळ्यात पहिले त्याला समाजाचे भय दाखवतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना मला काय वाटतं, मला काय हवं यापेक्षा लोक काय म्हणतील याचा पगडा जास्त असतो. त्यामुळे समाज या पगड्याला काही वेळासाठी दूर ठेऊन स्वतर्‍च्या विचारांचा, आवडीचा नेमका शोध घ्यावा. कारण जेंव्हा माणूस स्वतर्‍च्या मनाला मारून निर्णय घेतो तेंव्हा तो निर्णय त्याच्या आयुष्यावर तितक्याच वाईट पद्धतीने परिणाम करतो जेवढा मनाप्रमाणे निर्णय घेतल्यानं होण्याची शक्यता असते. किमान जेंव्हा माणूस नेमका मार्ग शोधून निर्णय घेतो, तेंव्हा त्याची कामिगरी लक्षणीय असते. कारण त्याचा निर्णय त्याची जबाबदारी असते. 

पण  स्वतर्‍ला जे हवं आहे त्याप्रमाणे जर निर्णय घेतला तर त्यामुळे होणारं नुकसान व लाभ लक्षात घ्यावा. जो निर्णय आपण घेऊ इच्छितो त्याला समाजाची जोड कशी मिळू शकते याचा पूरक विचार करावा. आपल्या निर्णयासाठी थोडीशी लवचिकता व त्यासाठीची योग्य वेळ हे एकत्न आणलं तर समाजाची साथ नक्कीच मिळू शकते. निश्चितच निर्णय घेतल्यानंतर आयुष्यच्या ज्या स्तरावर बदल व नुकसान होणार आहे त्यासाठी विचार करून नेमके मार्ग काढता येऊ शकतात. फक्त कोणताही निर्णय घेताना साहस हवं. ते सर्व गुणांची जबाबदारी घेतं.

निर्णय घेताना परिस्थिती आपल्या हातात असो वा नसो, जर आपण आपले मन व विचार यांची अशा पद्धतीने योग्य सांगड घातली तर निश्चितच योग्य ते व योग्य पद्धतीने निर्णय आपण घेऊ शकतो.

( लेखिका समुपदेशक आहे.)