शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
4
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
5
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
6
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
7
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
8
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
9
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
10
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
11
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
12
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
13
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
14
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
15
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
16
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
17
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
18
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
19
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
20
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले

काय करणार निर्णयच घेता येत नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 16:21 IST

अनेक जणांना छोटे छोटे निर्णयही घेता येत नाहीत, लोक काय म्हणतील याचाच ते जास्त विचार करतात.

ठळक मुद्देआपल्याला काय हवं आहे याचा नेमका विचार करा.रिस्क घ्या.मनानं निर्णय घेत असाल तर त्याला बुद्धीची जोड द्या.

-योगिता तोडकर

रोज आपण अनेक निर्णय घेत असतो, अगदी आत्ता चहा घेऊ कि खाऊ इथेपासून ते आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टींना कलाटणी  देणार्‍या निर्णयांर्पयत.

निर्णय घेताना अनेक घटक कार्यरत असतात. पण थोडक्यात त्याचे वर्गीकरण करायचे झाले तर आंतरिक आणि बाह्य घटक असे ढोबळमानाने आपण करू शकू.

आपल्या आंतरिक घटकांमध्ये भावना, विचार, अनुभव असे अनेक खेळाडू असतात. पण त्यात चौकार न षटकार मारणारे दोनच. मन काय सांगतंय (इंटय़ुशन) आणि विचार करायला लावणारी बुद्धी.

आता या दोनपैकी महत्वाचं कोण? 

काही निर्णय आपल्याला खूप जलद घ्यावे लागतात, त्यावेळेस बहुतांशपणे मन काय कौल देतंय याचाच आधार घेतला जातो. पण काही वेळेस आपण घेतलेल्या निर्णयांचा खूप जास्त काळापर्यंत आपल्या आयुष्याच्या वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक, अशा एक ना अनेक स्तरांवर होणार असेल तर उत्तम मार्ग म्हणजे मन काय सांगतंय याला बुद्धीची जोड देणं.

असे निर्णय घेताना सर्व प्रथम  मला काय हवं आहे याचा विचार करावा. एक समुपदेशक म्हणून जेंव्हा मी पाहते तेंव्हा मला असे दिसून आलं कि आपण लहानपणापासून मुलांना निर्णय घ्यायला शिकूच देत नाही. एकतर त्याच्या वतीने पालकच निर्णय घेत असतात. अथवा जेंव्हा मुलं निर्णय घ्यायचा प्रयत्न करतो तेंव्हा सगळ्यात पहिले त्याला समाजाचे भय दाखवतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना मला काय वाटतं, मला काय हवं यापेक्षा लोक काय म्हणतील याचा पगडा जास्त असतो. त्यामुळे समाज या पगड्याला काही वेळासाठी दूर ठेऊन स्वतर्‍च्या विचारांचा, आवडीचा नेमका शोध घ्यावा. कारण जेंव्हा माणूस स्वतर्‍च्या मनाला मारून निर्णय घेतो तेंव्हा तो निर्णय त्याच्या आयुष्यावर तितक्याच वाईट पद्धतीने परिणाम करतो जेवढा मनाप्रमाणे निर्णय घेतल्यानं होण्याची शक्यता असते. किमान जेंव्हा माणूस नेमका मार्ग शोधून निर्णय घेतो, तेंव्हा त्याची कामिगरी लक्षणीय असते. कारण त्याचा निर्णय त्याची जबाबदारी असते. 

पण  स्वतर्‍ला जे हवं आहे त्याप्रमाणे जर निर्णय घेतला तर त्यामुळे होणारं नुकसान व लाभ लक्षात घ्यावा. जो निर्णय आपण घेऊ इच्छितो त्याला समाजाची जोड कशी मिळू शकते याचा पूरक विचार करावा. आपल्या निर्णयासाठी थोडीशी लवचिकता व त्यासाठीची योग्य वेळ हे एकत्न आणलं तर समाजाची साथ नक्कीच मिळू शकते. निश्चितच निर्णय घेतल्यानंतर आयुष्यच्या ज्या स्तरावर बदल व नुकसान होणार आहे त्यासाठी विचार करून नेमके मार्ग काढता येऊ शकतात. फक्त कोणताही निर्णय घेताना साहस हवं. ते सर्व गुणांची जबाबदारी घेतं.

निर्णय घेताना परिस्थिती आपल्या हातात असो वा नसो, जर आपण आपले मन व विचार यांची अशा पद्धतीने योग्य सांगड घातली तर निश्चितच योग्य ते व योग्य पद्धतीने निर्णय आपण घेऊ शकतो.

( लेखिका समुपदेशक आहे.)