शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दहावी नापास विद्यार्थीही परदेशात नोकरी करू शकणार, भारतीयांसाठी खुशखबर; १८ देशांमध्ये मागणी वाढली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 10:55 IST

भारतातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग परदेशात नोकरीसाठी जात असतो. यामागची कारणं अनेक आहेत. सर्वात मोठं कारण पैसे हेच आहे. भारतीय कर्मचाऱ्यांना परदेशात मोठी मागणी आहे

नवी दिल्ली- 

भारतातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग परदेशात नोकरीसाठी जात असतो. यामागची कारणं अनेक आहेत. सर्वात मोठं कारण पैसे हेच आहे. भारतीय कर्मचाऱ्यांना परदेशात मोठी मागणी आहे आणि त्याचा मोबदला देखील चांगला मिळतो. यातच भारतीय कर्मचारी वर्गासाठी खुशखबर आहे. जगातील एकूण १८ देशांमध्ये भारतीय कामगारांची मागणी सातत्यानं वाढत आहे. महत्वाची बाब म्हणजे परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या भारतीयांचीही संख्या वाढली आहे. 

कोरोना काळाच्या आधी जितके भारतीय लोक परदेशात नोकरीसाठी गेलेले आता कोरोनानंतरच्या काळात त्यात दुपटीनं वाढ झाली आहे. कोरोनानंतर आता जग हळूहळू आर्थिक बाबतीत रुळावर येत असल्याची ही चिन्हं आहेत. जागतिक बाजार जसजसा उभारी घेत आहेत. तसं भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परदेशात काम करणाऱ्या भारतीयांचाही देशाला मोठा फायदा होतो, कारण त्यांनी पाठवलेल्या पैशातून सरकारला मदत होते. गेल्या वर्षी परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांनी देशात ८७ अब्ज डॉलर्स पाठवले होते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालात परदेशातून आपल्या नागरिकांनी पाठवलेल्या पैशाच्या बाबतीत भारत अव्वल स्थानी असल्याचं निष्पन्न झालं आहे. 

परदेशात जाणाऱ्या भारतीयांची संख्या किती?परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की कोविड महामारीपूर्वी 2019 मध्ये परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या भारतीयांची संख्या ९४ हजार होती. आता यात मोठी वाढ पाहायला मिळत आहे, कारण आता परदेशात जाणाऱ्या भारतीय कामगारांची संख्या १.९० लाखांवर गेली आहे. १८ देशांमध्ये भारतीय कामगारांची संख्या वाढली आहे. जिथं भारतीयांना प्रवास करण्यासाठी इमिग्रेशन चेक आवश्यक (ECR) पासपोर्ट आवश्यक आहे.

टॅग्स :jobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शनInternationalआंतरराष्ट्रीय