शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वाढत्या प्रवासीसंख्येमुळे विमान उद्योगात भरतीचे जोरदार वारे; १२२२ पदे भरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 06:32 IST

विमानांच्या संख्येत दशकभरात किमान ५० टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणत मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे.

मुंबई : देशांतर्गत विमान प्रवासी संख्येत घसघशीत होत असलेली वाढ, विमानांची वाढती संख्या आणि देशात आगामी काळात वाढणारी विमानतळांची संख्या या पार्श्वभूमीवर विमान उद्योगाशी संबंधित सरकारी यंत्रणेत १२२२ जणांची नवी भरती केली जाणार आहे. ही भरती प्रामुख्याने नागरी विमान महासंचालनालय (डीजीसीए), एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया (एएआय) आणि एअरपोर्ट्स इकोनॉमिक रेग्युलेटरी ऑथोरिटी (एईआरए) या तीन यंत्रणांमध्ये होणार आहे.

विमान प्रवासाशी निगडित या तीनही प्रमुख यंत्रणा आहेत. यांच्या माध्यमातून विमानतळाच्या पायाभूत सुविधा देखभाल, विमानतळावरील विमानांची ये जा, एअर ट्रैफिक कन्ट्रोल विमानतळाचे व्यवस्थापन, आर्थिक व्यवहार अशा महत्त्वपूर्ण बाबी हाताळल्या जातात. आगामी काळात देशात आणखी नवीन २०० विमानतळ उभारण्यात येत आहेत. तसेच विमानांच्या संख्येत दशकभरात किमान ५० टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणत मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे.

नव्याने विकसित होणाऱ्या विमानतळांसाठी सरकारी पातळीवरूनही हालचाली सुरू झाल्या असून, ही नवी भरतीप्रक्रिया हा त्याचाच एक भाग आहे. ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात त्या अगोदरच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत विमान प्रवाशांच्या संख्येत तब्बल ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीमध्ये देशात व भारतातून परदेशात गेलेल्या प्रवाशांची संख्या तब्बल १३ कोटी ६० लाख इतकी आहे.

टॅग्स :jobनोकरी