शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

तुम्ही पदवीधर आहात? सरकारी नोकरीची सुवर्ण संधी; गृह मंत्रालयात भरती, ६० हजारापर्यंत पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 13:34 IST

गृह मंत्रालयात कोणत्या पदावर किती जागांवर भरती केली जातेय? शेवटची तारीख काय? जाणून घ्या...

नवी दिल्ली: अलीकडेच केंद्रातील मोदी सरकारने पुढील जवळपास १८ महिन्यात १० लाख पदे भरणार असल्याची घोषणा केली आहे. पदवीधर असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने विभागातील विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली असून, निवडलेल्या उमेदवारांना ६० हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. 

गृह मंत्रालयाअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार असून यासाठी ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. २४ जून ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

गृह मंत्रालयाअंतर्गत कायदा अधिकारी ग्रेड I (सल्लागार) (उपसचिव/संचालक) ची २ पदे, कायदा अधिकारी ग्रेड II (सल्लागार) ची २ पदे, प्रशासकीय अधिकारीचे १ पद, मुख्य पर्यवेक्षक/सल्लागारची ३ पदे, पर्यवेक्षक/सल्लागारची ३ पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

लीगल ऑफिसर ग्रेड १ या पदासाठी आवश्यक कागदपत्रे

लीगल ऑफिसर ग्रेड १ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शिक्षणसंस्थेतून लॉची पदवी (५ वर्ष प्रॅक्टीससह) पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांकडे संबंधित कामाचा किमान अनुभव असावा. उमेदवाराला कॉम्प्युटरची माहिती असणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ६० हजार रुपये पगार दिला जाणार आहे.

लीगल ऑफिसर ग्रेड २ या पदासाठी आवश्यक कागदपत्रे

लीगल ऑफिसर ग्रेड २ या पदासाठी शासकीय पदावरून निवृत्त झालेले उमेदवारा अर्ज करु शकतात. त्यांच्याकडे प्रशासन आणि लेखाविषयक बाबींचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३५ हजार रुपये पगार दिला जाणार आहे. प्रशासकीय अधिकारी पदासाठी उमेदवाराकडे संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ४५ हजार रुपये पगार दिला जाणार आहे.

मुख्य पर्यवेक्षक/सल्लागार पदासाठी अर्ज करताय?

मुख्य पर्यवेक्षक/सल्लागार पदासाठी उमेदवाराकडे संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ६० हजार रुपये पगार दिला जाणार आहे. पर्यवेक्षक/सल्लागार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एमबीए किंवा बीबीए पूर्ण केलेले असावे. या पदासाठी निवड झालेल्या उमदेवारांना दरमहा ४० हजार रुपयांपर्यंत पगार मिळेल.

सर्वेक्षक या पदासाठी काय करावे?

सर्वेक्षक या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार बारावी सायन्समधून ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराला संबंधित कामाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमदेवारांना दरमहा २५ हजार रुपयांपर्यंत पगार मिळेल. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. 

टॅग्स :Home Ministryगृह मंत्रालयCareer Guidanceकरिअर मार्गदर्शनjobनोकरी