शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अग्निवीर भरती संदर्भात आणखी एक आनंदाची बातमी! सरकारने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 14:49 IST

अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तरुणांना अर्ज शुल्काची संपूर्ण रक्कम भरावी लागणार नाही.

अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तरुणांना अर्ज शुल्काची संपूर्ण रक्कम भरावी लागणार नाही. अग्निवीर भरती दरम्यान भरल्या जाणार्‍या अर्जाच्या शुल्कापैकी अर्धी रक्कम भारतीय सैन्य उचलेल. आता अर्जाची निम्मी फी लष्कराकडून भरावी लागणार असून निम्मी फी उमेदवाराला भरावी लागणार आहे. भारतीय लष्करातील भरती प्रक्रियेशी संबंधित अधिकारी कर्नल जी. सुरेश यांनी याबाबत माहिती दिली आहे. सध्या उमेदवारांना अर्ज फी म्हणून ५०० रुपये भरावे लागत आहेत.

'जे तरुण दहावी उत्तीर्ण आहेत आणि पॉलिटेक्निक किंवा आयटीआय करत आहेत ते देखील अग्निवीरसाठी अर्ज करू शकतील. अग्निवीर भरती 2023 च्या प्रक्रियेत बदल केले जात आहेत,  अशी भारतीय लष्कराने घोषणा केली होती.

रक्त न घेता शुगर लेव्हल सांगणार घड्याळ; बऱ्याच प्रयत्नानंतर Apple ला आता मिळाले यश!

याअंतर्गत आता उमेदवारांना पहिल्यांदा लेखी परीक्षेत भाग घ्यावा लागणार असून त्यानंतर शारीरिक चाचणी अगोदर परीक्षा घेण्यात येणार आहेत. "पूर्वी भरती प्रक्रियेच्या शेवटी लेखी परीक्षा होत होती, पण आता पहिली गोष्ट म्हणजे भरती झालेले लोक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत आहेत. शारीरिक आणि वैद्यकीय तपासणीसारख्या इतर चाचण्या केल्या जातील, असंही कर्नल जी. सुरेश म्हणाले. 

कर्नल सुरेश यांनी अग्निवीर भरती प्रक्रियेतील आणखी एका मोठ्या बदलाबद्दलही सांगितले. 'अग्निवीर म्हणून भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षेला बसावे लागेल. यासाठी त्यांना अर्ज फी म्हणून ५०० रुपये भरावे लागतील, असंही ते म्हणाले, "या रकमेपैकी २५० रुपये भारतीय लष्कर उचलणार आहे, तर उमेदवाराला फक्त २५० रुपये भरावे लागतील." अग्निवीर भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. वर्षातून एकदाच नोंदणी करण्याची परवानगी आहे.

अग्निवीर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना आधी लेखी परीक्षेला बसावे लागणार आहे. अग्निवीर भरती तीन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात, उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. यानंतर संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल ज्यामध्ये उमेदवाराला हजर राहावे लागेल.

ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना संबंधित सैन्य भर्ती कार्यालयांनी ठरवलेल्या ठिकाणी भरती मेळाव्यासाठी बोलावले जाईल. येथे पोहोचल्यावर त्याची शारीरिक तंदुरुस्ती चाचणी करून त्याचे शारीरिक मोजमाप केले जाईल. तिसऱ्या टप्प्यांतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणी करावी लागेल.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान