शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

अग्निवीर भरती संदर्भात आणखी एक आनंदाची बातमी! सरकारने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 14:49 IST

अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तरुणांना अर्ज शुल्काची संपूर्ण रक्कम भरावी लागणार नाही.

अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तरुणांना अर्ज शुल्काची संपूर्ण रक्कम भरावी लागणार नाही. अग्निवीर भरती दरम्यान भरल्या जाणार्‍या अर्जाच्या शुल्कापैकी अर्धी रक्कम भारतीय सैन्य उचलेल. आता अर्जाची निम्मी फी लष्कराकडून भरावी लागणार असून निम्मी फी उमेदवाराला भरावी लागणार आहे. भारतीय लष्करातील भरती प्रक्रियेशी संबंधित अधिकारी कर्नल जी. सुरेश यांनी याबाबत माहिती दिली आहे. सध्या उमेदवारांना अर्ज फी म्हणून ५०० रुपये भरावे लागत आहेत.

'जे तरुण दहावी उत्तीर्ण आहेत आणि पॉलिटेक्निक किंवा आयटीआय करत आहेत ते देखील अग्निवीरसाठी अर्ज करू शकतील. अग्निवीर भरती 2023 च्या प्रक्रियेत बदल केले जात आहेत,  अशी भारतीय लष्कराने घोषणा केली होती.

रक्त न घेता शुगर लेव्हल सांगणार घड्याळ; बऱ्याच प्रयत्नानंतर Apple ला आता मिळाले यश!

याअंतर्गत आता उमेदवारांना पहिल्यांदा लेखी परीक्षेत भाग घ्यावा लागणार असून त्यानंतर शारीरिक चाचणी अगोदर परीक्षा घेण्यात येणार आहेत. "पूर्वी भरती प्रक्रियेच्या शेवटी लेखी परीक्षा होत होती, पण आता पहिली गोष्ट म्हणजे भरती झालेले लोक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत आहेत. शारीरिक आणि वैद्यकीय तपासणीसारख्या इतर चाचण्या केल्या जातील, असंही कर्नल जी. सुरेश म्हणाले. 

कर्नल सुरेश यांनी अग्निवीर भरती प्रक्रियेतील आणखी एका मोठ्या बदलाबद्दलही सांगितले. 'अग्निवीर म्हणून भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षेला बसावे लागेल. यासाठी त्यांना अर्ज फी म्हणून ५०० रुपये भरावे लागतील, असंही ते म्हणाले, "या रकमेपैकी २५० रुपये भारतीय लष्कर उचलणार आहे, तर उमेदवाराला फक्त २५० रुपये भरावे लागतील." अग्निवीर भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. वर्षातून एकदाच नोंदणी करण्याची परवानगी आहे.

अग्निवीर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना आधी लेखी परीक्षेला बसावे लागणार आहे. अग्निवीर भरती तीन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात, उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. यानंतर संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल ज्यामध्ये उमेदवाराला हजर राहावे लागेल.

ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना संबंधित सैन्य भर्ती कार्यालयांनी ठरवलेल्या ठिकाणी भरती मेळाव्यासाठी बोलावले जाईल. येथे पोहोचल्यावर त्याची शारीरिक तंदुरुस्ती चाचणी करून त्याचे शारीरिक मोजमाप केले जाईल. तिसऱ्या टप्प्यांतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणी करावी लागेल.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान