शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अग्निवीर भरती संदर्भात आणखी एक आनंदाची बातमी! सरकारने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 14:49 IST

अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तरुणांना अर्ज शुल्काची संपूर्ण रक्कम भरावी लागणार नाही.

अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तरुणांना अर्ज शुल्काची संपूर्ण रक्कम भरावी लागणार नाही. अग्निवीर भरती दरम्यान भरल्या जाणार्‍या अर्जाच्या शुल्कापैकी अर्धी रक्कम भारतीय सैन्य उचलेल. आता अर्जाची निम्मी फी लष्कराकडून भरावी लागणार असून निम्मी फी उमेदवाराला भरावी लागणार आहे. भारतीय लष्करातील भरती प्रक्रियेशी संबंधित अधिकारी कर्नल जी. सुरेश यांनी याबाबत माहिती दिली आहे. सध्या उमेदवारांना अर्ज फी म्हणून ५०० रुपये भरावे लागत आहेत.

'जे तरुण दहावी उत्तीर्ण आहेत आणि पॉलिटेक्निक किंवा आयटीआय करत आहेत ते देखील अग्निवीरसाठी अर्ज करू शकतील. अग्निवीर भरती 2023 च्या प्रक्रियेत बदल केले जात आहेत,  अशी भारतीय लष्कराने घोषणा केली होती.

रक्त न घेता शुगर लेव्हल सांगणार घड्याळ; बऱ्याच प्रयत्नानंतर Apple ला आता मिळाले यश!

याअंतर्गत आता उमेदवारांना पहिल्यांदा लेखी परीक्षेत भाग घ्यावा लागणार असून त्यानंतर शारीरिक चाचणी अगोदर परीक्षा घेण्यात येणार आहेत. "पूर्वी भरती प्रक्रियेच्या शेवटी लेखी परीक्षा होत होती, पण आता पहिली गोष्ट म्हणजे भरती झालेले लोक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत आहेत. शारीरिक आणि वैद्यकीय तपासणीसारख्या इतर चाचण्या केल्या जातील, असंही कर्नल जी. सुरेश म्हणाले. 

कर्नल सुरेश यांनी अग्निवीर भरती प्रक्रियेतील आणखी एका मोठ्या बदलाबद्दलही सांगितले. 'अग्निवीर म्हणून भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षेला बसावे लागेल. यासाठी त्यांना अर्ज फी म्हणून ५०० रुपये भरावे लागतील, असंही ते म्हणाले, "या रकमेपैकी २५० रुपये भारतीय लष्कर उचलणार आहे, तर उमेदवाराला फक्त २५० रुपये भरावे लागतील." अग्निवीर भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. वर्षातून एकदाच नोंदणी करण्याची परवानगी आहे.

अग्निवीर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना आधी लेखी परीक्षेला बसावे लागणार आहे. अग्निवीर भरती तीन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात, उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. यानंतर संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल ज्यामध्ये उमेदवाराला हजर राहावे लागेल.

ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना संबंधित सैन्य भर्ती कार्यालयांनी ठरवलेल्या ठिकाणी भरती मेळाव्यासाठी बोलावले जाईल. येथे पोहोचल्यावर त्याची शारीरिक तंदुरुस्ती चाचणी करून त्याचे शारीरिक मोजमाप केले जाईल. तिसऱ्या टप्प्यांतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणी करावी लागेल.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान