शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वर्षभरात ६५ हजार पदांची होणार भरती; कौशल्य विकास विभाग करणार १९७ कंपन्यांसोबत एमओयू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 10:28 IST

कौशल्य विकास विभागाच्या वतीने दरवर्षी रोजगार मेळावे घेऊन बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या जातात.

लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : वर्षभरात औरंगाबाद आणि नाशिक विभागातील उद्योगांना सुमारे ६५ हजार कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. हे मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या वतीने औरंगाबाद आणि नाशिक विभागातील १९७ कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले जाणार आहेत. याकरिता १८ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये इंडस्ट्रियल मीटचे आयोजन करण्यात आले आहे.

कौशल्य विकास विभागाच्या वतीने दरवर्षी रोजगार मेळावे घेऊन बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या जातात. या मेळाव्याला उपस्थित विविध उद्योजक कुशल मनुष्यबळाच्या शोधात असतात. बऱ्याचदा त्यांना हवे तसे मनुष्यबळ मिळत नाही, तसेच उमेदवारही मिळणाऱ्या वेतनावर खुश नसतात. परिणामी मेळाव्याला नुसतीच गर्दी होते. ही बाब लक्षात घेऊन उद्योगांना कुठल्या प्रकारचे कुशल मनुष्यबळ हवे आहे, तसेच आगामी वर्षभरात त्यांच्या कंपन्यांमध्ये साधारणतः किती रोजगार उपलब्ध होऊ शकतो, याबाबतची माहिती कौशल्य विकास विभागाने नुकतीच गोळा केली. त्यातून औरंगाबाद आणि नाशिक विभागामध्ये वर्षभरात सुमारे ६५ हजार रिक्त पदे असल्याचे समोर आले.

१८ ऑगस्ट रोजी इंडस्ट्रियल मीट 

१८ ऑगस्ट रोजी चिकलठाणा एमआयडीसीतील मसिआच्या सभागृहात इंडस्ट्रियल मीटचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त सुनील सैंदाणे यांनी दिली. ते म्हणाले की, या इंडस्ट्रियल मीटकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा आणि सचिव यांची उपस्थिती असेल. त्यांच्या उपस्थितीत उद्योजकांसोबत एमओयू करण्यात येईल.

 

टॅग्स :jobनोकरी