शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात ६५ हजार पदांची होणार भरती; कौशल्य विकास विभाग करणार १९७ कंपन्यांसोबत एमओयू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 10:28 IST

कौशल्य विकास विभागाच्या वतीने दरवर्षी रोजगार मेळावे घेऊन बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या जातात.

लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : वर्षभरात औरंगाबाद आणि नाशिक विभागातील उद्योगांना सुमारे ६५ हजार कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. हे मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या वतीने औरंगाबाद आणि नाशिक विभागातील १९७ कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले जाणार आहेत. याकरिता १८ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये इंडस्ट्रियल मीटचे आयोजन करण्यात आले आहे.

कौशल्य विकास विभागाच्या वतीने दरवर्षी रोजगार मेळावे घेऊन बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या जातात. या मेळाव्याला उपस्थित विविध उद्योजक कुशल मनुष्यबळाच्या शोधात असतात. बऱ्याचदा त्यांना हवे तसे मनुष्यबळ मिळत नाही, तसेच उमेदवारही मिळणाऱ्या वेतनावर खुश नसतात. परिणामी मेळाव्याला नुसतीच गर्दी होते. ही बाब लक्षात घेऊन उद्योगांना कुठल्या प्रकारचे कुशल मनुष्यबळ हवे आहे, तसेच आगामी वर्षभरात त्यांच्या कंपन्यांमध्ये साधारणतः किती रोजगार उपलब्ध होऊ शकतो, याबाबतची माहिती कौशल्य विकास विभागाने नुकतीच गोळा केली. त्यातून औरंगाबाद आणि नाशिक विभागामध्ये वर्षभरात सुमारे ६५ हजार रिक्त पदे असल्याचे समोर आले.

१८ ऑगस्ट रोजी इंडस्ट्रियल मीट 

१८ ऑगस्ट रोजी चिकलठाणा एमआयडीसीतील मसिआच्या सभागृहात इंडस्ट्रियल मीटचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त सुनील सैंदाणे यांनी दिली. ते म्हणाले की, या इंडस्ट्रियल मीटकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा आणि सचिव यांची उपस्थिती असेल. त्यांच्या उपस्थितीत उद्योजकांसोबत एमओयू करण्यात येईल.

 

टॅग्स :jobनोकरी