शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात ६५ हजार पदांची होणार भरती; कौशल्य विकास विभाग करणार १९७ कंपन्यांसोबत एमओयू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 10:28 IST

कौशल्य विकास विभागाच्या वतीने दरवर्षी रोजगार मेळावे घेऊन बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या जातात.

लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : वर्षभरात औरंगाबाद आणि नाशिक विभागातील उद्योगांना सुमारे ६५ हजार कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. हे मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या वतीने औरंगाबाद आणि नाशिक विभागातील १९७ कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले जाणार आहेत. याकरिता १८ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये इंडस्ट्रियल मीटचे आयोजन करण्यात आले आहे.

कौशल्य विकास विभागाच्या वतीने दरवर्षी रोजगार मेळावे घेऊन बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या जातात. या मेळाव्याला उपस्थित विविध उद्योजक कुशल मनुष्यबळाच्या शोधात असतात. बऱ्याचदा त्यांना हवे तसे मनुष्यबळ मिळत नाही, तसेच उमेदवारही मिळणाऱ्या वेतनावर खुश नसतात. परिणामी मेळाव्याला नुसतीच गर्दी होते. ही बाब लक्षात घेऊन उद्योगांना कुठल्या प्रकारचे कुशल मनुष्यबळ हवे आहे, तसेच आगामी वर्षभरात त्यांच्या कंपन्यांमध्ये साधारणतः किती रोजगार उपलब्ध होऊ शकतो, याबाबतची माहिती कौशल्य विकास विभागाने नुकतीच गोळा केली. त्यातून औरंगाबाद आणि नाशिक विभागामध्ये वर्षभरात सुमारे ६५ हजार रिक्त पदे असल्याचे समोर आले.

१८ ऑगस्ट रोजी इंडस्ट्रियल मीट 

१८ ऑगस्ट रोजी चिकलठाणा एमआयडीसीतील मसिआच्या सभागृहात इंडस्ट्रियल मीटचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त सुनील सैंदाणे यांनी दिली. ते म्हणाले की, या इंडस्ट्रियल मीटकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा आणि सचिव यांची उपस्थिती असेल. त्यांच्या उपस्थितीत उद्योजकांसोबत एमओयू करण्यात येईल.

 

टॅग्स :jobनोकरी