शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

जिल्हा परिषदेच्या शाळा ‘क्वारंटीन मुक्त’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 12:21 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांचा क्वारंटीन सेंटर म्हणून उपयोग केला जाणार नसून, शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

- विवेक चांदुरकरलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोनामुळे संशयीत किंवा बाहेर राज्यातून आलेल्या नागरिकांना क्वारंटीन करण्याकरिता जिल्हा परिषदेच्या शाळा ताब्यात घेण्यात आल्या होत्या. मात्र, आता शाळा क्वारंटीनमुक्त करण्यात आल्या असून, यामध्ये कुणालाही क्वारंटीन करण्यात येणार नाही.मार्च महिन्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार राज्यात व्हायला लागला. त्यामुळे बाहेर राज्यातून किंवा बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांना १४ दिवस कुणाच्याही संपर्कात न येऊ देता क्वारंटीन करण्यात येत होते. या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना क्वारंटीन करण्याकरिता जिल्हा परिषद व नगर पालिकेच्या शाळा उपयोगात आणण्यात येत होत्या. गावांमध्ये असलेल्या अनेक शाळांमध्ये बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांना क्वारंटीन करण्यात आले होते. प्रशासनाच्यावतीने त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली होती. खामगाव तालुक्यात १८ शाळांमध्ये बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांना ठेवण्यात आले होते.पाच महिन्यानंतर आता लॉकडाऊन उघडल्यामुळे बाहेर जिल्ह्यातून येणाºया नागरिकांना क्वारंटीन करण्यात येत नाही. तसेच १ सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षणाधिकाºयांच्या झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळांचा क्वारंटीन सेंटर म्हणून उपयोग केला जाणार नसून, शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.शाळांमध्ये स्वच्छता व निर्जंतुकीकरण सुरूजिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये बाहेर राज्यातून तसेच जिल्ह्यातून आलेल्यांना क्वारंटीन करण्यात आले होते. यापैकी काही नागरिक तपासणीनंतर कोरोना पॉझिटीव्हही आढळले होते. त्यामुळे या शाळांची आता स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. शासनाचे आदेश आल्यावर शाळा सुरू करण्यात येणार आहे. तालुक्यातील १८ शाळांमध्ये नागरिकांना क्वारंटीन करण्यात आले होते. आता यापुढे शाळांमध्ये क्वारंटीन करण्यात येणार नाही.- गजानन गायकवाडशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावcorona virusकोरोना वायरस बातम्या