शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

तरूणांनी संभाजी महाराजांचा आदर्श जोपासावा-गजानन शास्त्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2017 18:23 IST

गजाननदादा शास्त्री यांनी धाडमध्ये आयोजित संभाजी राजे जयंती निमित्त व्याख्यानात प्रबोधन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कधाड : छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या संपूर्ण जीवनात सतत संघर्ष करून धर्मरक्षण आणि स्वराज्यासाठी बलीदान दिले. राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीमुळे संभाजी राजे घडले. त्यांचे चरित्राचा सखोल अभ्यासासह त्यांचा आदर्श आजच्या तरूणांनी घेण्याचे आवाहन प्रसिध्द व्याख्याते गजाननदादा शास्त्री यांनी धाडमध्ये आयोजित संभाजी राजे जयंती निमित्त व्याख्यानात प्रबोधन करताना केले.छत्रपती संभाजी महाराजांच्या ३६० व्या जयंती पर्वावर धाडमध्ये बोराडे नगरात राजे संभाजी मित्र मंडळाच्या तरूण कार्यकर्त्यांनी जाहीर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी पोलिस ठाणेदार संग्राम पाटील यांची उपस्थिती होती. गजानन दादा शास्त्री यांनी आपल्या कणखर आवाजात सुरूवातीला संभाजीमहाराजांचा पोवाडा सादर करून तरूणांना मंत्रमुग्ध केले. आपल्या व्याख्यानात बोलताना ते म्हणाले की, आपल्या बालवयातच स्वराज्याची आणि धर्माची धुरा संभाजी महाराजांनी सांभाळत अनेक शत्रुंशी ते एकाचवेळी सतत लढा दिला. सोबतच धर्म, सामाजिक, सांस्कृतिक, राजकारण, युध्द या चौफेरविषयावर गाढा अभ्यास करून प्रत्येक क्षेत्रावर त्यांची पकड होती. विपरीत परिस्थितीत रयतेची त्यांनी काळजी घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचा विस्तार करून गोरगरीब जनतेला न्याय दिला. यावेळी ठाणेदार संग्राम पाटील यांनी आपल्या मनोगतातून तरूणांनी व्यसनाधिनता सोडून शरीरबळकट बनवून समाजसेवा करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी शाहीर प्रमोद दांडगे व सहकाऱ्यांनी पोवाडा सादर केला. यावेळी गावातील महिला व नागरिकांची उपस्थिती होती. याप्रसंगी अनेक तरूणांनी व्यसन न करण्याची शपथ घेतली.संभाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष उबाळे व सहका-यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक सर्जेराव देशमुख तर आभार तायडे गुरूजी यांनी केले.