शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

दहावीची परीक्षा रद्द केली ; परीक्षा शुल्क कधी परत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:32 IST

बुलडाणा : काेराेना संसर्ग वाढत असल्याने यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलेला आहे. परीक्षा रद्द ...

बुलडाणा : काेराेना संसर्ग वाढत असल्याने यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलेला आहे. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणे अपेक्षित असून, जिल्ह्यातील ४५ हजार ६८ विद्यार्थ्यांना १़ ८७ काेटी रुपये परीक्षा शुल्क परत कधी मिळणार? याची प्रतीक्षा लागून आहे.

कोरोनामुळे गत दीड वर्षापासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. गतवर्षी पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यंदाही पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सीबीएसई बोर्डाने इयत्ता दहावीच्या परीक्षा देखील रद्द केल्या. याच धर्तीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने देखील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा एकूण ६६१ आहेत. यामध्ये एकूण ४५ हजार ६८ विद्यार्थी आहेत. दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने जिल्ह्यातील सरसकट ४५ हजार ६८ विद्यार्थी पास झाले आहेत. दहावी परीक्षेचे शुल्क ४१५ रुपये असून, ४५ हजार ६८ विद्यार्थ्यांनी एकूण एक काेटी ८७ लाख ३ हजार २२० रुपये परीक्षा शुल्क भरले आहे. परीक्षाच रद्द झाल्याने शुल्क परत मिळणे अपेक्षित असून, शुल्क परत केव्हा मिळणार? याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे.

अशी आहे जिल्ह्यातील शाळा व विद्यार्थी संख्या

जिल्ह्यातील एकूण माध्यमिक शाळा -६६१

दहावीतील एकूण विद्यार्थी : ४५०६८

प्रती विद्यार्थी परीक्षा शुल्क - ४१५

एकूण परीक्षा शुल्काची रक्कम -१़ ८७ काेटी

कोट

शासनाच्या निर्णयानुसार दहावीची वार्षिक परीक्षा रद्द झालेली आहे. परीक्षा शुल्क परत करण्यासंदर्भात अद्याप वरिष्ठ स्तरावरून कोणत्याही सूचना नाहीत. वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बुलडाणा

...................

कोट

कोरोनामुळे दहावीच्या शाळा जवळपास १ महिनाभर सुरू होत्या. त्यानंतर शाळाही बंद होत्या. ऑनलाईन पद्धतीने शिकवणी झाली. दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने शुल्क परत मिळेल की नाही याबाबत संभ्रम आहे. शुल्क परत मिळणे विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे.

- पायल वानखडे, विद्यार्थिनी

कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या. त्यामुळे परीक्षा शुल्क परत मिळणे विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे. आतापर्यंत परीक्षा शुल्क परत मिळायला हवे होते.

- सतीश इंगळे, विद्यार्थी

दहावीच्या परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे़ मात्र, अकरावी, आयटीआय प्रवेश कसे हाेणार याविषयी संभ्रम आहे़ तसेच परीक्षा शुल्क कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे़

राेहित गवई, विद्यार्थी