शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

महाजल योजनेचे काम रखडले ; वळती ग्रामस्थांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 17:11 IST

योजनेचे काम तत्काळ मार्गी लावावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व ग्रामस्थांनी २८ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे.

ठळक मुद्दे वळती येथे नोव्हेंबर २०१४ मध्ये महाजल योजनेचे काम मंजूर झाले; मात्र चार वर्ष उलटले तरी काम पुर्णत्वास गेले नाही. काम पुर्ण करावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाºयांकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले.

बुलडाणा : चिखली तालुक्यातील वळती येथील महाजल योजनेचे काम गेल्या चार वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. योजनेचे काम तत्काळ मार्गी लावावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व ग्रामस्थांनी २८ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे. वळती येथे नोव्हेंबर २०१४ मध्ये महाजल योजनेचे काम मंजूर झाले. मात्र चार वर्ष उलटले तरी काम पुर्णत्वास गेले नाही. कामाची गती अत्यंत संथ असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळा सुरु होण्याआधीच काम पुर्ण करावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाºयांकडे पाठपुरावा करण्यात आला. तर काही दिवसांपूर्वी संघटनेने चिखली ग्रामिण पाणीपुरवठा कार्यालयात आंदोलन केले होते. याप्रकरणी १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आश्वासन उपअभियंता यांनी दिले होते. परंतू तीन महिने उलटले तरी चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. या आंदोलनात शेख मुख्तार, भगवानराव मोरे, सुनील कºहाडे, अशोक सुरडकर, अमोल तेलगुडे, दीपक धनवे, संतोष चिंचोले, गोपाल चिंचोले, पश्चिम विदर्भ संघटक बबनराव चेके, सुनील चिंचोले, शेख अकिल शेख शब्बीर, उध्वद धनवे, कचरु हिवाळे, शेख जाफर शेख रसूल, शेख एजाज शेख अकबर, गणेश शिंगणे, सिराज पटेल, कबीर पटेल, गजानन हिवाळे, वसीम खान, मोहसीन खान, शे. नईम शे. हशम, परमेश्वर जगताप, विशाल चिंचोले, विनोद धनवे, लियाकत असद यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagitationआंदोलन