शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

मनरेगाच्या माध्यमातून भरीव काम करावे- पुलकुंडवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 00:22 IST

यंत्रणेतील घटकांनी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये गंभीरपणे काम करावे. या योजनेतून जलसंधारणाची कामे करता येतात. त्यामुळे मनरेगामधून विकासात्मक भरीव कामे करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

ठळक मुद्देसक्षम मनरेगा कार्यशाळेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना शासनाची अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून समाजातील शेवटचा घटक असलेल्या गरीब, आर्थिक दुर्बलांच्या आयुष्यात संपन्नता आणता येणे शक्य आहे. यंत्रणेतील घटकांनी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये गंभीरपणे काम करावे. या योजनेतून जलसंधारणाची कामे करता येतात. त्यामुळे मनरेगामधून विकासात्मक भरीव कामे करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सक्षम मनरेगा या कार्यशाळेचे आयोजन बुधवारला करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटनीय कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेंद्र देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय चोपडे, अमरावतीचे कार्यकारी अभियंता असलम खान, कृषी सहसंचालक कार्यालयाचे भौगोलिक माहिती प्रणाली सहायक किशोर चावंदे, नरेगा गटविकास अधिकारी चंदनसिंग राजपूत आदी उपस्थित होते. सक्षम मनुष्यबळाचा उपयोग करून ‘माथा ते पायथा’ जलसंधारण कामांचा अवलंब करण्याच्या सूचना करीत जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार  म्हणाले की, मनरेगामधून पाणी अडविता येण्याजोग्या ठिकाणांचा शोध घेऊन त्याठिकाणी जलसंधारणाची कामे घ्यावीत.  हवामान बदलाचे वारे वाहत आहेत. आपल्याला या बदलाची जाणीवसुद्धा होत आहे. अशा परिस्थितीत पावसाळा अनियमित स्वरूपाचा होत आहे. या परिणामांपासून समाजाचा बचाव करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. मनरेगामधून ही कामे करता येणार आहेत. याप्रसंगी दीप प्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्यशाळेला उपस्थित तज्ज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी रोहयो  देशमुख यांनी केले. कार्यशाळेला तहसीलदार, रोहयो विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.