शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

दारूबंदीसाठी विद्यार्थिनींसह महिला सरसावल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:35 IST

न्यायालयाच्या आदेशानुसार दारुची दुकाने  गेल्या अनेक दिवसांपासून बंद होती. त्यामुळे गावात  शांतता होती. दरम्यान दारुची दुकाने पुन्हा सुरु होत  असून, स्थानिक जुन्या बसस्थानकावरील दारुची  दुकाने कायमची बंद करावी, या मागणीसाठी विद्या र्थीनींसह महिला सरसावल्या आहेत. ६ सप्टेबर रोजी  उपविभागीय अधिकारी, पोलिस स्टेशन व नगर  पालीका यांना सदर महिलांनी निवेदन दिले आहे. तर  या ठिकाणावरची दारुची दुकाने बंद न झाल्यास यापुढे  तीव स्वरुपाची आंदालने करण्याचा इशाराही या   महिलांनी दिला आहे. 

ठळक मुद्देदारूची दुकाने बंद न झाल्यास तीव्र आंदोलन  करण्याचा इशारा दारू दुकानांना न.प.ची ‘एनओसी’ देणार नाही   - गवळी

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : न्यायालयाच्या आदेशानुसार दारुची दुकाने  गेल्या अनेक दिवसांपासून बंद होती. त्यामुळे गावात  शांतता होती. दरम्यान दारुची दुकाने पुन्हा सुरु होत  असून, स्थानिक जुन्या बसस्थानकावरील दारुची  दुकाने कायमची बंद करावी, या मागणीसाठी विद्या र्थीनींसह महिला सरसावल्या आहेत. ६ सप्टेबर रोजी  उपविभागीय अधिकारी, पोलिस स्टेशन व नगर  पालीका यांना सदर महिलांनी निवेदन दिले आहे. तर  या ठिकाणावरची दारुची दुकाने बंद न झाल्यास यापुढे  तीव स्वरुपाची आंदालने करण्याचा इशाराही या   महिलांनी दिला आहे. दारुमुळे गरीबांचे संसार उध्वस्त होत आहेत. अनेक  कुटूंब या दारुमुळे उघड्यावर आले आहेत.  न्यायालयाच्या आदेशावरुन गेल्या काही महिन्या पासून दारुची दुकाने बंद होती. परंतु सदर दुकाने  पुर्ववत सुरु होत असल्याने महिला वर्ग संतप्त झाला  आहे. मेहकर शहरामध्ये भरवस्तीत संतोषीमाता नगर  परिसरात अनेक दारुची दुकाने आहेत. या दारुच्या  दुकानांमुळे विद्यार्थीनी, महिला यांना दररोज त्रास  सहन करावा लागत आहे. मुलींना शाळेत, शिकवणी  वर्गाला तसेच महिलांना बाजारात जाण्यासाठी याच  दारुच्या दुकानाजवळून जावे लागते. याठिकाणी  अनेक लोक दारु पिवून अश्लील भाषेत बोलतात,  अश्लिल कृत्ये करतात. तर अनेक वेळा याठिकाणी  वाद होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हो तो. जिजामाता कन्या शाळा, जनता हायस्कूलला जा ताना याच रस्त्यावरुन जावे लागते. या दारुच्या  दुकानाच्या अगदी जवळ मॉ संतोषी माता मंदिर,  महादेव मंदिर, मारोती मंदिर, मदरसा, अशी धार्मिक  स्थळ आहेत. त्यामुळे भाविकांना याचा त्रास होतो.  सदर दुकाने कायमची बंद करावी, अशी मागणी  महिलांनी केली आहे.

दारू दुकानांना न.प.ची ‘एनओसी’ देणार नाही   - गवळीन्यायालयाने सर्वच दारूची दुकाने बंद करण्यासाठी  आदेश दिले होते, तर शहरात ५00 मीटरपर्यंत कोण त्याही दारूच्या दुकानांना न.प.ने परवानगी देऊ नये,  अशा सूचना आहेत; परंतु जेव्हापासून दारूची दुकाने  बंद झाली तेव्हापासून शहरात कोणतेही वादविवाद,  भांडण, तंटे झाले नाहीत, शहरात शांतता आहे.  दारूमुळे गरिबांचे संसार उद्ध्वस्त होतात. गरीब  कुटुंब उघड्यावर येतात. त्यामुळे शहरातून दारू  कायमची बंद झाली पाहिजे. यासाठी काँग्रेस,  शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांचा पाठिंबा आहे. दारू  बंद झाली पाहिजे, हा एक चांगला विषय आहे.  त्यामुळे न.प.कडून दारू दुकानांना एनओसी देणार  नाही, अशी ग्वाही नगराध्यक्ष कामसभाई गवळी यांनी  दिली. यावेळी मुख्याधिकारी अशोक सातपुते,  शिवसेना गटनेते संजय जाधव, काँग्रेसचे गटनेते  मो.अलीम मो.ताहेर, उपाध्यक्ष जयचंद बाठीया,  अँड.अनंत वानखेडे, आरोग्य सभापती मनोज  जाधव, शिक्षण सभापती रामेश्‍वर भिसे, पाणीपुरवठा  सभापती ओम सौभागे, विकास जोशी, समाधान सास् ते, रविराज रहाटे, ललित इन्नाणी, राजेश अंभोरे,  अलीयार खान आदी उपस्थित होते.