शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरून शिक्षकांचे मूल्यमापन होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:27 IST

बुलडाणा : विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील गुणवत्तेनुसार शिक्षकांच्या कामांचे मूल्यमापन करण्याच्या हालचाली शिक्षण विभागात सुरू आहेत. त्यासाठी शिक्षक प्रशिक्षण प्रणाली तयार ...

बुलडाणा : विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील गुणवत्तेनुसार शिक्षकांच्या कामांचे मूल्यमापन करण्याच्या हालचाली शिक्षण विभागात सुरू आहेत. त्यासाठी शिक्षक प्रशिक्षण प्रणाली तयार करण्याच्या निविदा विभागाकडून मागविण्यात आल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरून शिक्षकांचे मूल्यमापन होणार का? याबाबत शिक्षकांमध्येही सध्या संभ्रम निर्माण झालेला आहे.

कोरोनामुळे वर्षभरापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेवरून वारंवार गोंधळ निर्माण होत आहे. त्यात आता भरीसभर शिक्षकांच्या मूल्यमापनाचा प्रश्नही समोर आलेला आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा किंवा चाचणीतील कामगिरीनुसार शिक्षकांचे मूल्यमापन करण्याबाबतच्या हालचाली शिक्षण विभागात सुरू आहेत. शिक्षकांचे मूल्यमापन करण्याची ही योजना राबविण्यासाठी शिक्षक प्रशिक्षण प्रणालीची ३० कोटींची निविदा काढल्याने शिक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. दरम्यान, यासंदर्भात शिक्षकांचे व्हॉट्सॲप ग्रुप व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती पसरल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील कामगिरीनुसार शिक्षकांचे मूल्यांकन कसे होणार? याबाबतचे अनेक प्रश्न शिक्षकांमधून उपस्थित होत आहेत.

--विविध संघटनांचा विरोध --

शिक्षण विभागाने शिक्षकांच्या प्रशिक्षण आणि मूल्यांकनासाठी स्वतंत्र प्रणाली तयार करण्याचे नियोजन केलेले आहे. त्यासाठी निविदा मागविल्या आहेत. शिक्षक, विद्यार्थी, शाळा यांची माहिती संकलित करणाऱ्या ‘सरल’ प्रणालीतील माहितीशी ही नवी प्रणाली जोडण्यात येईल. विद्यार्थिसंख्या, विद्यार्थ्यांचे गुण यांची नोंद नव्या प्रणालीत होईल. त्यानुसार त्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन केले जाईल. त्यादृष्टीने प्रशिक्षण प्रणालीत विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचीही यंत्रणा असावी, अशी गरज निविदेत स्पष्ट करण्यात आली आहे. परंतु शिक्षण विभागाच्या या धोरणाला विविध संघटनांकडून विरोध होत आहे.

--कोट--

गुणवत्तेचा निकष लावायचे ठरले, तर सर्वच खात्यांना तो लावला पाहिजे. यात केवळ शिक्षकांनाच वेठीस धरण्यात येऊ नये. विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील कामगिरीवरून शिक्षकांच्या मूल्यमापनाचे हे धोरण शिक्षण विभागाने तातडीने मागे घ्यावे. या धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

-डी. डी. वायाळ, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती बुलडाणा.

--कोट--

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला शिक्षक हा एकच घटक जबाबदार नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक, पालकाची परिस्थिती, भौतिक सुविधा असे अनेक घटक कारणीभूत असतात. केवळ विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या माध्यमातून वेतनवाढ थांबविणे किंवा शिक्षकांचे मूल्यांकन करणे योग्य नाही. शासनाने हे धोरण मागे घ्यावे, अशी संघटनांची आग्रही भूमिका आहे.

-सुनील मगर, जिल्हा सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती.

--कोट--

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरून शिक्षकांच्या मूल्यमापनाबाबतचे कुठलेही आदेश जिल्हा परिषद शिक्षण विभागाला प्राप्त झालेले नाहीत. हा राज्य पातळीवरचा विषय आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून येणाऱ्या सूचनानुसारच अंमलबजावणी होईल.

-सचिन जगताप, शिक्षणाधिकारी, बुलडाणा.

---

जिल्ह्यातील एकूण शिक्षक- १७९३३

जिल्हा परिषद शिक्षक- ६८७२

नगर पालिका शिक्षक - ७१३

खासगी अनुदानित - ५५८४