शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

खडकपूर्णा पाण्याचा वाद सामंजस्याने सोडविणार-मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 19:24 IST

बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाण्यावर निर्माण झालेला प्रादेशिक वाद सामंजस्याने सोडविण्यास प्राधान्य देणार आहे.

- नीलेश जोशीसिंदखेड राजा: बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाण्यावर निर्माण झालेला प्रादेशिक वाद सामंजस्याने सोडविण्यास प्राधान्य देणार असून लवकरच यासंदर्भात पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि सिंदखेड राजाचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यासह उभय बाजूंच्या नेत्यांची एक बैठक घेण्यात येणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंदखेड राजा येथे केले.सिंदखेड राजा विकास आराखड्यातील १३ कोटी रुपयांच्या विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते सिंदखेड राजामध्ये आले होते. यावेळी स्थानिक जिजामाता विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित जाहीर सभेत १४ फेब्रुवारी रोजी दुपारी ते बोलत होते. खडकपूर्णा प्रकल्पावरून जालना जिल्ह्यातीलल परतूर, मंठा आणि जालना  या तीन तालुक्यातील ९२ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी देण्यावरून उभय बाजूने वाद आहे. सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यातून या योजनेला पाणी देण्यास विरोध आहे. या प्रश्नी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे प्रजासत्ताक दिनी जवळपास २२ गावात प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले होते. तर जालना तालुका भाजपने या प्रश्नी बुलडाणा जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाण्यावर हक्क सांगत प्रसंगी विरोध झाल्यास जशास तसे उत्तर देऊ अशी भूमिका स्वीकारली होती. सप्टेंबर २०१८ पासून हा वाद उफाळला आहे. या प्रश्नी देऊळगाव राजा तालुक्यात आंदोलनेही झाली होती. सिंदखेड राजा येथील जाहीर सभेत प्रास्ताविकास जालना ९२ गावे पाणीपुरवठा योजनेला स्थगिती देऊन लोअर दुधना प्रकल्पावरून त्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली होती.  त्यानुषंगाने आपल्या भाषणात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सूतोवाच केले. दरम्यान, पिण्याच्या पाण्याच्या मुद्द्यावर भांडण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, ज्या नदी खोऱ्यात जादा पाणी आहे अशा खोऱ्यातील पाणी हे तुटीच्या नदीखोऱ्यात वळविण्यात येणार असून त्यासंदर्भातील राज्याचा एकात्मिक जल आराखड्यास नुकतीच मान्यता देण्यात आली असून महाराष्ट्र हे असा आराखडा करणारे देशातील पहिले राज्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान वैनगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भातील वर्धा, अकोला, वाशिम, बुलडाण्यासह सहा जिल्हे आणि मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना लाभ होणार असल्याचे खा. प्रतापराव जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले असता त्या संदर्भात बोलताना  मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त बाब स्पष्ट केली.