शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

बुलडाणा जिल्हावासियांची अपेक्षापूर्ती होईल का?

By admin | Updated: June 25, 2014 00:01 IST

रेल्वे अर्थ संकल्पापासून बुलडाणा जिल्ह्याच्या अपेक्षा

राजेश शेगोकार / बुलडाणाखामगाव- जालना रेल्वेमार्गाबाबत शासनाची कमालीची उदासिनता प्रत्येक वेळी दिसून आली आहे. सन १९१0 मध्ये इंग्रजांनी प्रस्तावित केलेला हा रेल्वेमार्ग ११४ वष्रे उलटली तरीही अजून कागदावरून ट्रॅकवर आलाच नाही. प्रत्येक रेल्वेअर्थसंकल्पात या मार्गाबाबत जिल्हावासियांना आशा असते. प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीत हा मार्ग निवडणुकीचा मुद्दा असतो. नंतर मात्र हा मार्ग कागदावरच राहतो. सन १९१२ मध्ये इंग्रजांनी या मार्गाला मान्यता दिल्यानंतर भुसंपादन झाले व १९२९ मध्ये चिखली तालुक्यातील उंद्री येथे जीआयपी रेल्वे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट केसी रेल्वे कॅम्प या नावाने एक कार्यालय सुरू झाले. स्टेशनची गावे निश्‍चित झाली. शेतकर्‍यांच्या जमीनी पडीत टाकण्याचे आवाहन झाले. इतकेच नव्हे तर पिकांचा मोबदला म्हणून शेतकर्‍यांना पैसेही देण्यात आले. मात्र त्याच वेळी दुसरे महायुध्द सुरू झाल्याने हे काम थंडबस्त्यात पडले ते आजतागायत. इंग्रजांनी दुसर्‍या महायुध्दाकडे विशेष लक्ष दिल्याने या रेल्वेमार्गाला पुढे गती मिळाली नाही. स्वातंत्र्यानंतर ही मागणी सातत्याने लावून धरण्यात आली. १९६३ च्या रेल्वे अर्थसंकल्पात या मार्गाच्या सर्व्हेक्षणाची घोषणा झाली. ३६८ कोटी ८१ लाखाचा हा मार्ग होईल असा अंदाजही व्यक्त करण्यात आला. मात्र दरम्यानच्या काळात १९९४ च्या सर्व्हेक्षणात हा मार्ग फिजीबल नसल्याचा शेरा अधिकार्‍यांनी मारला व या मार्गाला कायमचा लाल सिग्नल बसला आहे. दरम्यान खामगाव जालना या १५५.४ कि.मी. मार्गाऐवजी बर्‍हाणपूर-सोलापूर या ४५0 कि.मी. मार्गाची मागणीही समोर आली. असे झाले तर खामगाव-चिखली-जालना असा ६0 कि.मी.चा रेल्वेमार्ग तयार करण्याची गरज भासणार नव्हती. या दोन्ही मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, रेल्वे आंदोलन समिती, सामान्य नागरिक यांनी पाठपुरावा केला. प्रत्यक्षात मात्र हा मार्ग पुढे सरकला नाही. मुकुल वासनिक, आनंदराव अडसूळ असे हेवीवेट खासदार व केंद्रात मंत्रीपदी राहूनही या मार्गाबाबत शासनाची उदासिनता दूर झाली नाही. आता मोदी सरकारच्या काळात खामगाव-जालना रेल्वेमार्गाची शतकोत्तर प्रतिक्षा संपेल काय? हा जिल्हावासियांचा सवाल आहे.  

          त्याच प्रमाणे शेगाव, नांदुरा व मलकापूर रेल्वे स्थानकाच्या समस्या देखील दुर्लक्षीत आहेत.

* शेगाव हे सर्वात महत्वाचे व सर्वाधीक उत्पन्न देणारे स्थानक आहे मात्र मॉडेल स्थानकाचा दर्जा अजूनही प्रत्यक्षात आला नाही.* नांदुरा रेल्वे स्थानकाचे ४ कोटी पेक्षा जास्त उत्पन्न असुनही हे स्थानक ह्यबह्ण दर्जामध्ये आले नाही ह्यडह्ण दर्जामध्येच आहे, त्यामुळे स्थानकाचा दर्जा वाढणे गरजेच आहे. * मलकापूर रेल्वे स्थानकाच्या मालधक्यावर येणार्‍या वाहनांसाठी स्वतंत्र व्यवस्था देण्याची गरज आहे.