शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कौटुंबिक कारणावरून पत्नीची गळा आवळून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 16:09 IST

महिलेचे लक्ष्मी विकास घायाळ असे नाव आहे, तर विकास शेषराव घायाळ असे आरोपीचे नाव आहे.

लोणार : कौटुंबिक कारणावरून पत्नीचा शेतशिवारात गळा आवळून खून केल्याची घटना लोणार तालुक्यातील हिरडव परिसरात ३ सप्टेंबर रोजी घडली. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी फरार झाला असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.या घटनेत मृत झालेल्या महिलेचे लक्ष्मी विकास घायाळ असे नाव आहे तर विकास शेषराव घायाळ असे आरोपीचे नाव आहे. तीन सप्टेंबर रोजी विकास घायाळ (रा. हिरडव) हा पत्नी लक्ष्मी व दोन मुलांसह दुचाकीवर बोरखेडी येथे सासुरवाडीत गेला होता. तेथून परतल्यानंतर त्याने हिरडव येथे घरी सात वर्षाची मुलगी व तीन वर्षाच्या मुलाला ठेवून पत्नीसह हिरडव परिसरातील शेत गाठले. तेथे पत्नी लक्ष्मीचा साडीच्या पदराने गळा आवळून खून करीत पलायन केले, अशी तक्रार मेव्हणे संतोष भास्कर शहाणे यांनी लोणार पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी विकास शेषराव घायाळ याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.  दोन दिवसात लोणार तालुक्यात दोन खुनाच्या घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.दरम्यान, विकास घायाळ यास मद्याचे व्यसन होते. त्यातून त्याचा वाद होत होता. परिणामी त्याच्या कुटुंबियांनीही गेल्या वर्षी पाच एकर शेती विकासच्या नावे करून दिली होती. त्यामुळे तो वेगळा राहत होता. दरम्यान, मद्याचे व्यसन त्यास असल्याने त्याचे मेव्हणे संतोष भास्कर शहाणे यांनी गावात नातेवाईकांना तीन सप्टेंबर रोजी फोन करून लक्ष्मी आणि विकास घायाळ पोहोचले का? याची विचारपूस केली होती. त्यावेळी मुले घरी खेळत असल्याचे नातेवाईकांनी त्यांना सांगितले होते. मात्र पती-पत्नी शेतात गेले असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र संतोष शहाणे यांना संशय आल्यामुळे त्यांनी नातेवाईकांना शेत शिवारात पाहण्यासाठी पाठवले असता साडीच्या सहाय्याने लक्ष्मीचा गळा आवळून खून केल्याचे निदर्शनास आल्याने हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. सध्या आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.प्रकरणी संतोष भास्कर शहाणे (३२, रा. बोरखेडी, ता. लोणार) यांच्या तक्रारीवरून लोणार पोलिसांनी विकास घायाळ विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार रविंद्र देशमुख हे करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी