शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

गव्हाच्या उत्पादनात होणार २५ टक्क्याने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 13:43 IST

गहू पेरणी १५ नोव्हेंबरनंतर म्हणजे उशीराने केली गेल्याने यंदा गव्हाच्या उत्पादनात २५ टक्के घट येण्याची साधार भिती व्यक्त होत आहे.

- ब्रम्हानंद जाधव बुलडाणा: जिल्ह्यात रब्बी पेरणी ८३ टक्क्यापर्यंत पोहचली आहे. त्यामध्ये गहू पेरा नियोजित क्षेत्रापेक्षा निम्म्यावरच आहे. त्यातही गहू पेरणी १५ नोव्हेंबरनंतर म्हणजे उशीराने केली गेल्याने यंदा गव्हाच्या उत्पादनात २५ टक्के घट येण्याची साधार भिती व्यक्त होत आहे. अतीवृष्टीने रब्बी हंगामाच्या पेरणीस विलंब लागल्याचा फटका बऱ्याच पिकांना बसत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.रब्बी हंगामामध्ये गहू पीक हे अत्यंत महत्त्वाचे समजल्या जाते. इतर उत्पादनाच्या तुलनेत गव्हाची मागणीही सर्वाधिक असते. त्यामुळे बागायतदारांपाठोपाठ कोरडवाहू शेतकरीही गव्हाची पेरणी करतात. परंतू यंदाच्या रब्बी हंगामातील गहू पिकाचे नियोजनच कोलमडले. खरीप हंगाम अंतीम टप्प्यात असताना अतिवृष्टीचा जोर वाढला. त्यामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले. अतिपावसाने रब्बी हंगामावर संकट आले. रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी बहुतांश शेतामध्ये शेती मशागतही होऊ शकली नाही. परिणामी रब्बी हंगाम लांबला. जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र १ लाख ५७ हजार ७६० हेक्टर आहे. त्यापैकी ८३ टक्के म्हणजे १ लाख ३० हजार ९४२ हेक्टर पेरणी करण्यात आली आहे. बागायती शेतीमध्ये गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात होणे चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाची असते.उशिरा पेरणी १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत करू शकतात. बागायती गव्हाची पेरणी १५ नोव्हेंबरनंतर उशिराने केल्यास प्रत्येक पंधरवड्यात गव्हाचे उत्पादन हेक्टरी २.५ क्विंटल एवढे घटते.तर जिरायत गव्हाची पेरणी आॅक्टोबरच्या दुसºया पंधरावड्यातच करावी लागते; परंतू यंदा गव्हाची पेरणी विलंबाने झाल्यामुळे हेक्टरी २.५ क्विंटलची घट शेतकºयांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.सरासरीपेक्षा निम्म्यावर पेराजिल्ह्यात गहू पिकाचे सरासरी क्षेत्र ६६ हजार ५०३ हेक्टर आहे. परंतू आतापर्यंत २८ हजार ६१४ हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात गहू पिकाचा पेरा सरासरीपेक्षा ४३ टक्के म्हणजे निम्म्यावर आला आहे.

मुळकुजव्या रोगामुळे हानीगहू पिकास थंड व कोरडे हवामान चांगले मानवते. मात्र सध्या हवामानात वेळोवेळी होणाºया बदलाचा फटका गहू पिकाला बसत आहे. धुक्यामुळे गहू पिकांना फुटवे कमी येत आहेत. त्यात आता ढगाळ वातावरणाने रोपांची मुळकुजव्या रोगामुळे हानी होत आहे.

 

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी