शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

गव्हाच्या उत्पादनात होणार २५ टक्क्याने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 13:43 IST

गहू पेरणी १५ नोव्हेंबरनंतर म्हणजे उशीराने केली गेल्याने यंदा गव्हाच्या उत्पादनात २५ टक्के घट येण्याची साधार भिती व्यक्त होत आहे.

- ब्रम्हानंद जाधव बुलडाणा: जिल्ह्यात रब्बी पेरणी ८३ टक्क्यापर्यंत पोहचली आहे. त्यामध्ये गहू पेरा नियोजित क्षेत्रापेक्षा निम्म्यावरच आहे. त्यातही गहू पेरणी १५ नोव्हेंबरनंतर म्हणजे उशीराने केली गेल्याने यंदा गव्हाच्या उत्पादनात २५ टक्के घट येण्याची साधार भिती व्यक्त होत आहे. अतीवृष्टीने रब्बी हंगामाच्या पेरणीस विलंब लागल्याचा फटका बऱ्याच पिकांना बसत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.रब्बी हंगामामध्ये गहू पीक हे अत्यंत महत्त्वाचे समजल्या जाते. इतर उत्पादनाच्या तुलनेत गव्हाची मागणीही सर्वाधिक असते. त्यामुळे बागायतदारांपाठोपाठ कोरडवाहू शेतकरीही गव्हाची पेरणी करतात. परंतू यंदाच्या रब्बी हंगामातील गहू पिकाचे नियोजनच कोलमडले. खरीप हंगाम अंतीम टप्प्यात असताना अतिवृष्टीचा जोर वाढला. त्यामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले. अतिपावसाने रब्बी हंगामावर संकट आले. रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी बहुतांश शेतामध्ये शेती मशागतही होऊ शकली नाही. परिणामी रब्बी हंगाम लांबला. जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र १ लाख ५७ हजार ७६० हेक्टर आहे. त्यापैकी ८३ टक्के म्हणजे १ लाख ३० हजार ९४२ हेक्टर पेरणी करण्यात आली आहे. बागायती शेतीमध्ये गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात होणे चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाची असते.उशिरा पेरणी १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत करू शकतात. बागायती गव्हाची पेरणी १५ नोव्हेंबरनंतर उशिराने केल्यास प्रत्येक पंधरवड्यात गव्हाचे उत्पादन हेक्टरी २.५ क्विंटल एवढे घटते.तर जिरायत गव्हाची पेरणी आॅक्टोबरच्या दुसºया पंधरावड्यातच करावी लागते; परंतू यंदा गव्हाची पेरणी विलंबाने झाल्यामुळे हेक्टरी २.५ क्विंटलची घट शेतकºयांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.सरासरीपेक्षा निम्म्यावर पेराजिल्ह्यात गहू पिकाचे सरासरी क्षेत्र ६६ हजार ५०३ हेक्टर आहे. परंतू आतापर्यंत २८ हजार ६१४ हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात गहू पिकाचा पेरा सरासरीपेक्षा ४३ टक्के म्हणजे निम्म्यावर आला आहे.

मुळकुजव्या रोगामुळे हानीगहू पिकास थंड व कोरडे हवामान चांगले मानवते. मात्र सध्या हवामानात वेळोवेळी होणाºया बदलाचा फटका गहू पिकाला बसत आहे. धुक्यामुळे गहू पिकांना फुटवे कमी येत आहेत. त्यात आता ढगाळ वातावरणाने रोपांची मुळकुजव्या रोगामुळे हानी होत आहे.

 

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी