शहरं
Join us  
Trending Stories
1
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, दुबार मतदारावरही उचललं पाऊल
2
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
3
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
4
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
5
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
6
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
7
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
8
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
10
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
11
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
12
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
13
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
14
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
15
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
16
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
17
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
18
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
19
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
20
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर

खिचडी शिजविणे, मुलांना वाटप करणे ही काय शिक्षकांची कामे झाली...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:26 IST

विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देणे, ज्ञान देणे हे शिक्षकांचे आद्यकर्तव्य आहे. परंतु, हे कर्तव्य सोडून शिक्षकांच्या पाठीमागे अनेक अशैक्षणिक कामे ...

विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देणे, ज्ञान देणे हे शिक्षकांचे आद्यकर्तव्य आहे. परंतु, हे कर्तव्य सोडून शिक्षकांच्या पाठीमागे अनेक अशैक्षणिक कामे लादली जातात. याबाबत अनेकदा शिक्षक, शिक्षक संघटनांनीसुद्धा आवाज उठविला. परंतु तो आवाज नेहमी शासनाकडून दाबला जातो आणि सातत्याने अशैक्षणिक कार्य करण्यास शिक्षकांना भाग पाडले जाते. विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे काम, जनगणनेचे काम, शालेय पोषण आहाराची कामे शिक्षकांकडून सातत्याने करून घेतली जातात. आता तर याबाबत शिक्षकांकडून केवळ शैक्षणिक कार्यच करून घ्यायला हवेत, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निकाल देताना कोर्टाने शिक्षण अधिकार अधिनियम २७ चा हवाला दिला आहे. अगोदरसुद्धा अनेक असे निर्णय झाले आहेत. परंतु शिक्षकांकडील अशैक्षणिक कार्य काही कमी झाली नाहीत. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तरी अशैक्षणिक कार्य काढून घेत, केवळ शिक्षणाचेच कार्य आमच्याकडून करून घेतले जाईल, अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली.

शिक्षकांची कामे....

शालेय पोषण आहाराचे वितरण करणे, खिचडी शिजविणे

विद्यार्थ्यांचे आधार कार्ड तयार करणे

शाळेचे बांधकाम, डागडुजी, रंगकाम करणे, कोरोना काळात चेक पोस्टवर कर्तव्य

रेशन दुकानांवर ड्युटी दिली. जनगणनेचे काम करणे, निवडणुकीच्या याद्या तयार करणे, निवडणूक केंद्रावर काम करणे

शिक्षण सोडून इतर कामांसाठीच प्रत्येक शाळेत किमान एक शिक्षक

शिक्षणाव्यतिरिक्त प्रत्येक शाळेत इतर कामांसाठी एक शिक्षक कार्यरत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, शिष्यवृत्तीचे अर्ज भरणे, शिक्षणाधिकारी कार्यालयातील शाळासंबंधीची कामे, शिक्षकांच्या वेतनासंबंधीची कामे यासोबतच मंत्रालयातील शाळासंबंधीची कामे, शैक्षणिक सुनावणी, सेवानिवृत्ती, पेन्शन, वेतन संबंधीची कामे शाळेतील एका शिक्षकाकडे देण्यात आली आहेत.

एक शिक्षकी शाळेचे हाल

जिल्ह्यात अनेक एक शिक्षकी शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच शिक्षकांना शाळेतील अनेक अशैक्षणिक कामे करावी लागतात. शालेय पोषण आहाराचे वितरण, खिचडी शिजवणे, शाळेची स्वच्छता करणे, मुलांसाठी पिण्याचे पाणी भरणे, कार्यालयीन कामकाज करणे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्याची कामे शिक्षकाला करावी लागतात. त्यामुळे साहजिकच शैक्षणिक कामांकडे शिक्षकांचे दुर्लक्ष होते.

शिक्षकांचे पहिले कर्तव्य आहे, विद्यार्थ्यांना शिक्षण देणे, शिक्षकांनी त्यांची कर्तव्ये लक्षात घ्यावीत. राष्टीय कर्तव्यातही शिक्षक याेगदान देत असतात़ अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर व्हावा़

- प्रकाश मुकंद,

शिक्षणाधिकारी माध्यमिक.

शिक्षक संघटना काय म्हणतात?

कोरोना काळात शिक्षकांना चेक पोस्टवर, रेशन दुकाने, दारू दुकानांवर तैनात केले होते. निवडणुकीची कामे, जनगणनेची कामे करावी लागतात. शाळेत खिचडी शिजविण्याचे काम करावे लागते. अलीकडेच दापोली तालुक्यातील एका धरणावर शिक्षकांना तैनात केले होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे शासनाने पालन करावे आणि शासनाने शिक्षकांची अशैक्षणिक कामांमधून मुक्तता करावी.

-दिलीप दांदडे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक महासंघ, बुलडाणा.

शिक्षकांकडे अनेक अशैक्षणिक कामे आहेत. याबाबत शिक्षक संघटनांनी अनेकदा आवाज उठविला आहे. आता उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. या निर्णयाचे शासनाने पालन करावे आणि शिक्षकांकडील खिचडी वाटपाची कामे, निवडणुकीसंबंधीची, याद्या तयार करण्याची कामे काढून घ्यावीत. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करावी. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची शासनाने अंमलबजावणी करावी.

-डी. डी. वायाल, अध्यक्ष जि. प. माध्यमिक संघ.