शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

खिचडी शिजविणे, मुलांना वाटप करणे ही काय शिक्षकांची कामे झाली...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:26 IST

विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देणे, ज्ञान देणे हे शिक्षकांचे आद्यकर्तव्य आहे. परंतु, हे कर्तव्य सोडून शिक्षकांच्या पाठीमागे अनेक अशैक्षणिक कामे ...

विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देणे, ज्ञान देणे हे शिक्षकांचे आद्यकर्तव्य आहे. परंतु, हे कर्तव्य सोडून शिक्षकांच्या पाठीमागे अनेक अशैक्षणिक कामे लादली जातात. याबाबत अनेकदा शिक्षक, शिक्षक संघटनांनीसुद्धा आवाज उठविला. परंतु तो आवाज नेहमी शासनाकडून दाबला जातो आणि सातत्याने अशैक्षणिक कार्य करण्यास शिक्षकांना भाग पाडले जाते. विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे काम, जनगणनेचे काम, शालेय पोषण आहाराची कामे शिक्षकांकडून सातत्याने करून घेतली जातात. आता तर याबाबत शिक्षकांकडून केवळ शैक्षणिक कार्यच करून घ्यायला हवेत, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निकाल देताना कोर्टाने शिक्षण अधिकार अधिनियम २७ चा हवाला दिला आहे. अगोदरसुद्धा अनेक असे निर्णय झाले आहेत. परंतु शिक्षकांकडील अशैक्षणिक कार्य काही कमी झाली नाहीत. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तरी अशैक्षणिक कार्य काढून घेत, केवळ शिक्षणाचेच कार्य आमच्याकडून करून घेतले जाईल, अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली.

शिक्षकांची कामे....

शालेय पोषण आहाराचे वितरण करणे, खिचडी शिजविणे

विद्यार्थ्यांचे आधार कार्ड तयार करणे

शाळेचे बांधकाम, डागडुजी, रंगकाम करणे, कोरोना काळात चेक पोस्टवर कर्तव्य

रेशन दुकानांवर ड्युटी दिली. जनगणनेचे काम करणे, निवडणुकीच्या याद्या तयार करणे, निवडणूक केंद्रावर काम करणे

शिक्षण सोडून इतर कामांसाठीच प्रत्येक शाळेत किमान एक शिक्षक

शिक्षणाव्यतिरिक्त प्रत्येक शाळेत इतर कामांसाठी एक शिक्षक कार्यरत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, शिष्यवृत्तीचे अर्ज भरणे, शिक्षणाधिकारी कार्यालयातील शाळासंबंधीची कामे, शिक्षकांच्या वेतनासंबंधीची कामे यासोबतच मंत्रालयातील शाळासंबंधीची कामे, शैक्षणिक सुनावणी, सेवानिवृत्ती, पेन्शन, वेतन संबंधीची कामे शाळेतील एका शिक्षकाकडे देण्यात आली आहेत.

एक शिक्षकी शाळेचे हाल

जिल्ह्यात अनेक एक शिक्षकी शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच शिक्षकांना शाळेतील अनेक अशैक्षणिक कामे करावी लागतात. शालेय पोषण आहाराचे वितरण, खिचडी शिजवणे, शाळेची स्वच्छता करणे, मुलांसाठी पिण्याचे पाणी भरणे, कार्यालयीन कामकाज करणे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्याची कामे शिक्षकाला करावी लागतात. त्यामुळे साहजिकच शैक्षणिक कामांकडे शिक्षकांचे दुर्लक्ष होते.

शिक्षकांचे पहिले कर्तव्य आहे, विद्यार्थ्यांना शिक्षण देणे, शिक्षकांनी त्यांची कर्तव्ये लक्षात घ्यावीत. राष्टीय कर्तव्यातही शिक्षक याेगदान देत असतात़ अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर व्हावा़

- प्रकाश मुकंद,

शिक्षणाधिकारी माध्यमिक.

शिक्षक संघटना काय म्हणतात?

कोरोना काळात शिक्षकांना चेक पोस्टवर, रेशन दुकाने, दारू दुकानांवर तैनात केले होते. निवडणुकीची कामे, जनगणनेची कामे करावी लागतात. शाळेत खिचडी शिजविण्याचे काम करावे लागते. अलीकडेच दापोली तालुक्यातील एका धरणावर शिक्षकांना तैनात केले होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे शासनाने पालन करावे आणि शासनाने शिक्षकांची अशैक्षणिक कामांमधून मुक्तता करावी.

-दिलीप दांदडे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक महासंघ, बुलडाणा.

शिक्षकांकडे अनेक अशैक्षणिक कामे आहेत. याबाबत शिक्षक संघटनांनी अनेकदा आवाज उठविला आहे. आता उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. या निर्णयाचे शासनाने पालन करावे आणि शिक्षकांकडील खिचडी वाटपाची कामे, निवडणुकीसंबंधीची, याद्या तयार करण्याची कामे काढून घ्यावीत. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करावी. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची शासनाने अंमलबजावणी करावी.

-डी. डी. वायाल, अध्यक्ष जि. प. माध्यमिक संघ.