शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘श्रीं’चे श्रद्धापूर्वक स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:10 IST

शेगाव: श्री संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे काढण्यात आलेली पायदळ वारी पालखीसह रविवारी शेगावात परतली.

ठळक मुद्देभाविकांची अलोट गर्दी शेगावात संत गजाननाचा जयघोष

गजानन कलोरे।लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव: श्री संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे काढण्यात आलेली पायदळ वारी पालखीसह रविवारी शेगावात परतली. दोन महिन्यांच्या अथक प्रवासानंतर परतलेल्या वारकºयांचे भव्य स्वागत संस्थानसह शेगावकरांकडून करण्यात आले. यावेळी गजाननाच्या जयघोषाने संतनगरी दुमदुमली होती.दरवर्षीप्रमाणे पंढरपूर येथील आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी शेगाव येथून ३१ मे २०१७ रोजी निघाली होती. ५०० वारकºयांसह निघालेल्या या पालखी सोहळ्याचे परतीच्या प्रवासादरम्यान ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत झाले. शनिवारी खामगावात दाखल झाल्यानंतर वारकºयांचे स्वागत व मुक्काम झाला. त्यानंतर रविवारी पहाटे पालखी शेगावकडे मार्गस्थ झाली. या पालखीसमवेत खामगाव येथून हजारो भाविक पायदळ वारीत सहभागी झाले होते. त्यामुळे खामगाव ते शेगाव मार्गावरील वाहतूक दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली. सदर पालखी संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय येथे पोहचल्यानंतर संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांनी स्वागत केले. यावेळी श्रीकांतदादा पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य सोमाणी, नारायणदास पाटील, गोविंद कलोरे, पंकज शितुत, अशोक देशमुख, राजेंद्र शेगोकार, मधुकर घाटोळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. रमेशचंद्र डांगरा यांच्या हस्ते रजत मुखवट्याचे पूजन व आरती करण्यात आली. तसेच गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय व श्री गजानन महाराज इंग्लिश स्कूलच्यावतीने वारकºयांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. यानंतर पालखी व सोबतच्या भाविक भक्तांसाठी श्री गजानन वाटिका येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी संस्थानचे विश्वस्त नीळकंठदादा पाटील यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी तहसीलदार गणेश पवार यांनीही दर्शन घेतले. दुपारी २ वाजता श्रींची पालखी नगरपरिक्रमेकरिता मुख्य मार्गाने मार्गस्थ झाली. यावेळी शहरवासीयांनी दर्शनाकरिता एकच गर्दी केली होती. टाळमृदंगाच्या गजरात गजाननाच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय बनले होते. ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले. पालखी मार्गावर व मंदिर परिसरात विविध आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. श्रींच्या पालखी सोहळ्यानिमित्त शेगावात लाखो भाविकांनी गर्दी केली होती. खामगाव परिसरच नव्हे तर बुलडाणा जिल्ह्यातील कानाकोपºयातून व अन्य जिल्ह्याातील भाविकांनीसुद्धा संतनगरीत हजेरी लावली. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.पालखीतील शिस्त ठरली आकर्षणसदर पालखी सोहळ्यातील वारकºयांची शिस्त आकर्षण ठरली. गण गण गणात बोते, राधेकृष्ण कृष्णराधे, नाम विठ्ठलाचे व गजाननाचे, माथी कुमकुम टिळा, मुखी हरिनाम कंठी तुळशी माळ, अशा जयघोषात खांद्यावर पताका घेतलेले शेकडो वारकरी शिस्तबद्ध पद्धतीने पावली करतानाचे दृश्य डोळ्यात साठवण्यासारखे होते.