शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

'धाडस' ग्रुप चे शारंगधर नगरीत स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:34 IST

मेहकर: शहरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदकडून तिथीनुसार शिवजयंती निमित्त नागपूर ते रायगड सायकलने प्रवास करणाऱ्या 'धाडस' ...

मेहकर: शहरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदकडून तिथीनुसार शिवजयंती निमित्त नागपूर ते रायगड सायकलने प्रवास करणाऱ्या 'धाडस' ग्रृपचे मंगळवारी स्वागत करण्यात आले.

नागपूर ते रायगड असा ६७३ कि.मी.चा विविध विषयात जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा अनोखा प्रवास सुरू आहे. 'धाडस' ग्रुप छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन मार्गातील गावागावात महिला सशक्तीकरण, वृक्षारोपण, जलसंवर्धन, स्वच्छता, गड किल्ले संवर्धन अशा विविध विषयात जनजागृती करत आहे, अशी माहिती धाडस ग्रुपच्या प्रमुख वर्षा घाटोळे यांनी दिली. मंगळवारी सायंकाळी या टीमचे श्री. शारंगधर बालाजी मंदिरात आगमन झाले होते. यावेळी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी टीमचे स्वागत केले. श्री.शारंगधर बालाजी संस्थांनचे अध्यक्ष दीपक पांडे यांच्या वतीने संस्थानतर्फे मॅनेजर हनुमंत देशमुख यांनी या टीमचे स्वागत केले. भाजपा महिला मोर्चा माजी जिल्हा अध्यक्ष अर्चना पांडे यांनी आपल्या घरी टीमचे व्यवस्थापन केले होते. श्री.बालाजी संस्थानचे पुजारी यांनी धाडस टीमला मंदिराविषयी माहिती सांगितली. यावेळी अभाविप महाराष्ट्र प्रदेश शोध कार्य सहसंयोजक अंबादास मेव्हणकर, सागर पांचाळ, अजय जौंजाळ, सुदर्शन जवंजाळ, विशाल शिंदे आदी विद्यार्थी उपस्थित होते. गावागावात टीमचे स्वागत करण्यात येत आहे. १२ सदस्यांची ही टीम १ एप्रिलला रायगडावर पोहचणार आहे.