शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

घराला आग लागल्याने लग्नाचे कापड खाक

By admin | Updated: May 9, 2017 01:47 IST

डिग्रस येथील घटना; टेलरिंग व्यावसायिकाचे लाखो रुपयांचे नुकसान.

देऊळगाव मही : येथील घरच्या लग्न समारंभात व्यस्त असलेल्या छगन कान्हुजी वाळ यांच्या घराला आग लागून टेलरिंगच्या साहित्यासह लग्नाचे शिवण्यासाठी आलेले कापड खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ६ मे रोजी संध्याकाळी ७.३0 वाजता घडली.देऊळगाव राजा तालुक्यातील दिग्रस बु. येथील छगन कान्हुजी वाळ यांच्या भावाच्या मुलीचे लग्न असल्याने घरातील सर्व मंडळी लग्नसमारंभारात होते. लग्न समारंभानंतर रात्री ११ वाजता गावातील काही नागरिकांनी छगन कान्हुजी वाळ यांच्याकडे धाव घेत तुमच्या घराला आग लागल्याची माहिती दिली. यावेळी त्वरित छगन वाळ याचे दोन्ही मुलांनी घराकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत घरातील साहित्य खाक झाले होते. घरी गजानन छगन वाळ यांचा टेलरिंग व्यवसाय असल्यामुळे घरात लग्नाचे जवळपास तीनशे ते साडेतीनशे कपडे शिवण्यासाठी आले होते. मात्र, आगीत साडेतीनशे कपड्यासह घरातील अनेक वस्तू जळून खाक झाल्या. सदर आग लागल्याची माहिती कळताच डिग्रस बु. येथील माजी पंचायत समिती सदस्य, माजी सरपंच लक्ष्मण पर्‍हाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच गजानन छगन वाळ यांना १ हजार १00 रुपयांची आर्थिक मदत दिली. यावेळी तलाठी यांनी पंचनामे करून शासन दरबारी माहिती देऊन पाठपुरावा करण्याची माहिती दिली. यावेळी देऊळगाव राजा पंचायत समितीचे सभापती, सरपंच सैयद, उपसरपंच साहेबराव मघाडे, सदस्य भगवान पाटील, गुलाब पाटील, गजानन वाघ, माजी सरपंच संतोष पाटील, माजी पोलीस पाटील उद्धवराव पाटील, लक्ष्मण देव्हारे, नितीन लाड, बाबूराव पर्‍हाड, ग्रामसेवक लताताई आरबडे हजर होते. या आगीत छगन वाळ यांच्या घराचे व त्यांच्या मुलाच्या लग्नसराईनिमित्त शिवण्यासाठी आलेले कपडे जळून मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या घटनेमुळे वाळ परिवारावर आर्थिक संकट कोसळले आहे. कांद्याच्या गंजीला आग; पाच लाखांचे नुकसानधोत्रानंदई : येथील भानुदास वामन बडधम यांच्या वाकी खु. शेत शिवारातील कांद्याची गंजी व साहित्य जळाल्याने पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ७ मे रोजी १0 वाजता घडली. यांचे शेत गट क्र.३८ या शेतामध्ये कांद्याचे बियाणेला सकाळी गंजीला अचानक आग लागली. या आगीमध्ये स्प्रिंकलरचे पाइप, पेट्रोल पंप, वायर बंडल, ताडपत्र्या जळून खाक झाल्या. घटनेची माहिती मिळताच तलाठी जी.के.केवट यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी सरपंच रामदास डोईफोडे, गजानन गीते, पो.पा.झगन खिल्लारे यांनी शेतकर्‍याला झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.