शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

घराला आग लागल्याने लग्नाचे कापड खाक

By admin | Updated: May 9, 2017 01:47 IST

डिग्रस येथील घटना; टेलरिंग व्यावसायिकाचे लाखो रुपयांचे नुकसान.

देऊळगाव मही : येथील घरच्या लग्न समारंभात व्यस्त असलेल्या छगन कान्हुजी वाळ यांच्या घराला आग लागून टेलरिंगच्या साहित्यासह लग्नाचे शिवण्यासाठी आलेले कापड खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ६ मे रोजी संध्याकाळी ७.३0 वाजता घडली.देऊळगाव राजा तालुक्यातील दिग्रस बु. येथील छगन कान्हुजी वाळ यांच्या भावाच्या मुलीचे लग्न असल्याने घरातील सर्व मंडळी लग्नसमारंभारात होते. लग्न समारंभानंतर रात्री ११ वाजता गावातील काही नागरिकांनी छगन कान्हुजी वाळ यांच्याकडे धाव घेत तुमच्या घराला आग लागल्याची माहिती दिली. यावेळी त्वरित छगन वाळ याचे दोन्ही मुलांनी घराकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत घरातील साहित्य खाक झाले होते. घरी गजानन छगन वाळ यांचा टेलरिंग व्यवसाय असल्यामुळे घरात लग्नाचे जवळपास तीनशे ते साडेतीनशे कपडे शिवण्यासाठी आले होते. मात्र, आगीत साडेतीनशे कपड्यासह घरातील अनेक वस्तू जळून खाक झाल्या. सदर आग लागल्याची माहिती कळताच डिग्रस बु. येथील माजी पंचायत समिती सदस्य, माजी सरपंच लक्ष्मण पर्‍हाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच गजानन छगन वाळ यांना १ हजार १00 रुपयांची आर्थिक मदत दिली. यावेळी तलाठी यांनी पंचनामे करून शासन दरबारी माहिती देऊन पाठपुरावा करण्याची माहिती दिली. यावेळी देऊळगाव राजा पंचायत समितीचे सभापती, सरपंच सैयद, उपसरपंच साहेबराव मघाडे, सदस्य भगवान पाटील, गुलाब पाटील, गजानन वाघ, माजी सरपंच संतोष पाटील, माजी पोलीस पाटील उद्धवराव पाटील, लक्ष्मण देव्हारे, नितीन लाड, बाबूराव पर्‍हाड, ग्रामसेवक लताताई आरबडे हजर होते. या आगीत छगन वाळ यांच्या घराचे व त्यांच्या मुलाच्या लग्नसराईनिमित्त शिवण्यासाठी आलेले कपडे जळून मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या घटनेमुळे वाळ परिवारावर आर्थिक संकट कोसळले आहे. कांद्याच्या गंजीला आग; पाच लाखांचे नुकसानधोत्रानंदई : येथील भानुदास वामन बडधम यांच्या वाकी खु. शेत शिवारातील कांद्याची गंजी व साहित्य जळाल्याने पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ७ मे रोजी १0 वाजता घडली. यांचे शेत गट क्र.३८ या शेतामध्ये कांद्याचे बियाणेला सकाळी गंजीला अचानक आग लागली. या आगीमध्ये स्प्रिंकलरचे पाइप, पेट्रोल पंप, वायर बंडल, ताडपत्र्या जळून खाक झाल्या. घटनेची माहिती मिळताच तलाठी जी.के.केवट यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी सरपंच रामदास डोईफोडे, गजानन गीते, पो.पा.झगन खिल्लारे यांनी शेतकर्‍याला झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.