शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

बुलडाणा जिल्ह्यातील पिके सुकण्याच्या मार्गावर

By admin | Updated: August 14, 2014 23:47 IST

खरीप पिके धोक्यात : वरूण राजाकडे शेतकर्‍यांची आर्त हाक

खामगाव : पावसाळा सुरु होऊन दोन महिने झाले मात्र आज येईल, उद्या येईल या भाबड्या आशेने शेतकरी दररोज आभाळाकडे पाहत आहे मात्र पावसाचा पत्ताच नसल्याने उगवलेले पिक आता धोक्यात आले आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटल्यामुळे दमदार पावसासाठी बळीराजाची आर्त हाक सुरु झाली आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकर्‍यांनी सरतेशेवटी नाईलाजाने पाऊस येईलच या आशेने पेरणी केली. खामगाव तालुक्यात १00 टक्के पेरण्या आटोपल्या असून पिकेही निघून आलेली आहेत. २२ व २३ जुलै रोजी पडलेल्या पावसाच्या आशेवर शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या. या पावसाच्या ओलीवर कशीबशी पिके उगून आली खरी, मात्र पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. खामगाव तालुक्यामध्ये ९ मंडळ असून प्रत्येक मंडळामध्ये पर्जन्यमापक यंत्रे बसविली आहेत. यामुळे मंडळनिहाय पावसाची मोजमाप करणे शक्य होत आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात मृग नक्षत्रापासून पुरेसा पाऊस झालाच नाही. परिणामी शेतकर्‍यांना उशिरा पेरण्या कराव्या लागल्या. कपाशी, सोयाबिन, मुग, उडीद, मका, ज्वारी, तूर या प्रमुख पिकांचा पेरा झालेला आहे. आतातर पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. उन्ह तापत असल्याने दुपारच्या वेळेस पिके अक्षरशा सुकलेली दिसत आहेत. येत्या काही वर्षात पाऊस नाही पडला तर खरीप हंगाम वाया जाण्याची दाट शक्यता आहे.*विहिरींची जलपातळी तळालातालुक्यात आतापर्यंत केवळ १४९.३0 मि.मि.सरासरी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत दमदार पाऊस पडला नसल्याने नदी नाले दुथळी भरुन वाहलेच नाहीत. विहिरीवरील पाण्यावर शेतकर्‍यांनी कपाशी तसेच इतर पिकांना पाणी देणे सुरु केले आहे. मात्र दमदार पावसाअभावी जलपातळीत दिवसेंदिवस घट होत असल्याचे दिसून येते आहे. वरुणराजा रुसून बसल्याने जमीनीला पावसाची ओळ लागली आहे. मात्र पाउसच नसल्याने विहिरींची जलपातळीही तळाला लागली आहे. त्यामुळे रब्बीची पिकेही धोक्यात आली आहेत.