शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

शेतक-यांच्या मढय़ावर विकासाचा मार्ग!

By admin | Updated: July 27, 2016 00:17 IST

महामार्गाला एक तुकडाही देणार नसल्याचा बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामपंचायती घेणार ठराव.

विवेक चांदूरकर / बुलडाणानागपूर- मुंबई या महामार्गाकरिता (सुपर एक्स्प्रेस हायवे) जिल्ह्यातील २२ हजार हेक्टर जमीन जाणार असून, शेतकर्‍यांच्या हातची रोजी रोटी हिरावल्या जाणार आहे. त्यामुळे या विरोधात आता शासन विरुद्ध शेतकरी, असा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे असून, त्याची ठिणगी महामार्ग संघर्ष समितीच्या निर्मितीने पडली आहे. नागपूर-मुंबई हे ७१0 किलोमीटरचे अंतर ८ तासात पूर्ण करता यावे, याकरिता शासनाने मुंबई ते नागपूर या सुपर हायवेच्या निर्मितीला सुरुवात केली आहे. या महामार्गाकरिता आतापर्यंत सॅटेलाईटद्वारे चार वेळा सर्वेक्षणही करण्यात आले आहे. या मार्गाची आखणी करताना यामध्ये शहरे व गावे, मोठी धरणे, सिंचन प्रकल्प, अभयारण्य, बागायती क्षेत्र असलेली शेती येवू नये, अशी जागा निवडण्यात आली आहे. या मार्गावर सध्या सरळ १२ जिल्हे तर अप्रत्यक्ष २0 जिल्हे जोडली आहेत. या महामार्गामुळे विकास होईल, असा दावा करीत हा विकासाचा मार्ग असल्याचे शासन दाखवित असले, तरी यामध्ये जिल्ह्यातील तीन तालुक्यातील ४९ गावांमधील २२ हजार हेक्टर शेती जाणार आहे. या शेतकर्‍यांकडे शेती हाच उपजीविकेचा एकमेव मार्ग असल्यामुळे महामार्गाला जमीन न देण्याचा निर्णय शेतकर्‍यांनी घेतला आहे. याकरिता संघर्ष समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीने या महामार्गासाठी जिल्ह्यातील कोणत्याही गावातील जमिनीचा एक तुकडाही न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मेहकर तालुक्यातील १९ ग्रामपंचायती या महामार्गाला जमीन न देण्याचा ठराव घेणार असून, गुरूवारी उपविभागीय महसूल अधिकार्‍यांना सादर करणार आहेत. त्यामुळे या महामार्गाविरोधात आता संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. शासनाच्यावतीने नेहमीच शेतकर्‍यांची जमीन अधिग्रहीत करताना मोठमोठी आश्‍वासने देण्यात येतात. एकदा शेतकर्‍यांनी जमीन दिल्यावर त्यांना शासकीय कार्यालयाच्या पायर्‍या झिजवाव्या लागतात. धरणे, रस्ते, वीजखांब यामध्ये जमीन गेलेल्या अनेक शेतकर्‍यांचे हे अनुभव असल्यामुळे आता शेतकरी सावध पवित्रा घेणार आहेत. जमीन न देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शेतकरी ठाम आहेत. जिल्ह्यातून जाणार ८२ किमीचा रस्ता नागपूर-मुंबई महामार्गातील ७१0 पैकी ८२ किमीचा रस्ता जिल्ह्यातून जाणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील लोणार, मेहकर व सिंदखेडराजा या तीन तालुक्यातील जमीन या महामार्गात जाणार आहे. या मार्गाला बुलडाणा जिल्ह्यातून दोन कनेक्टीव्हीटी राहणार आहेत. तसेच जिल्ह्यात एका ठिकाणी टाऊनशीपही उभारण्यात येणार आहे. - तर रस्ता होऊ देणार नाही - ह्यस्वाभिमानीह्णचा इशारा जिल्ह्यातून नागपूर मुंबई महामार्ग जात असून, हजारो हेक्टर जमीन यामध्ये जाणार आहे. केंद्रिय नेते मोबदल्याबाबत मोठमोठय़ा घोषणा करीत आहेत; मात्र प्रत्यक्ष शेतकर्‍यांना १00 मोबदला मिळाला नाही तर हा रस्ता होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राणा चंदन यांनी दिला आहे. जिल्हाभरातील शेतकरी या रस्त्याविरोधात उभे करू रस्त्याचे काम बंद पाडू, असेही त्यांनी सांगितले. शासन केवळ घोषणा करते; मात्र प्रत्यक्ष शेतकर्‍यांना मोबदला मिळत नाही, असाच प्रकार यावेळी झाला, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना खपवून घेणार नाही, असा इशारा राणा चंदन यांनी दिला.