शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सातपुड्यातील वन्यप्राण्यासाठी पाणवठे तयार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 22:35 IST

जळगाव जामोद- वनपरिक्षेत्राधिकारी यांनी सातपुड्याच्या जंगलामध्ये नैसर्गिक १० पानवठे निर्माण करुन वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.

वनविभागाचे प्रयत्न: सामाजिक संस्थांचीही मदतजळगाव जामोद : उन्हाळ्यात सातपुड्यातील सर्व नदया-नाले आटून जातात. अशावेळी वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागते. आणि या भटकंतीमध्ये अनेकदा हे वन्यप्राणी लोकवस्तीतही भटकतात तर काही पाण्याअभावी मृत्यू पावतात. त्यासाठी जळगाव जामोद वनपरिक्षेत्राधिकारी यांनी संभाव्य दखल घेवून सातपुड्याच्या जंगलामध्ये नैसर्गिक १० पानवठे निर्माण करुन वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.तालुक्याच्या उत्तरेस पूर्ण सातपुडा पर्वत असून या सातपुड्यात अनेक वन्यप्राण्यांचे अस्तित्व आहे. यामध्ये वाघ, बिबट, अस्वल, हरिण, रानडुक्कर, निलगाय, सांबर, तडसे इत्यादी वन्यप्राण्यांसह पक्ष्यांचेही मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. पावसाळा आणि हिवाळ्यात हिरवळ आणि नदी नाल्यांनी खुळाळणारा सातपुडा उन्हाळ्यात एकदम रुक्ष वाळवंटासारखा होतो. नदयांचे-नाल्यांचे पाणी आटून जाते. झरेही कोरडे पडतात. अशा परिस्थितीत वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी पंचाईत होते. हे प्राणी मग लोकवस्तीकडे धाव घेतात आणि अशावेळी त्यांच्या जिवीतास धोका निर्माण होतो. त्यामुळे वन्यप्राण्यांनी जंगल सोडू नये त्यासाठी जंगलातच कृत्रीम परंतु एकदम नैसर्गिक वाटणारे पानवठे निर्माण करुन त्यांची तहान भागवण्याची व्यवस्था सातपुड्यात जळगाव वनविभागाने केली आहे.या वनपरिक्षेत्रात एकूण जामोद, खांडवी, जळगाव आणि वरवट हे चार बिट आहेत. त्यामध्ये खांडवी बिटमध्ये ३, जळगाव बीट ३, जामोद २ आणि वरवट बिटमध्ये २ असे एकूण १० पानवठे तयार करण्यात आले आणि या प्रत्येक पानवठ्यामध्ये दर ५ ते ६ दिवसानंतर ३ हजार लिटरचे १ टँकर पाणी सोडण्यात येते आणि मग वन्यप्राण्यांना पिण्यास सोयीचे ठरते. हे १० पानवठे सातपुड्यातील निमखेडी, हनवतखेड, इस्लामपूर, पूर्व रायपूर, पश्चीम रायपूर, भेंडवळ, पिंगळी आणि जामोद या परिसरात तयार करण्यात आले आहेत.असे बनवतात नैसर्गिक पानवठे४वन्यप्राण्यांना कुठेही कृत्रीमतेचा आभास होवू नये. त्यांनी नि:संकोचपणे पाणी पिण्यासाठी यावे म्हणून पानवठे बनवितांना विशेष काळजी घेतली जाते. यासाठी साडेपाच मिटर व्यासाचा खड्डा खोदला जातो. त्यामध्ये खाली काळीमाती त्यावर गवत टाकतात. गवतावर पॉलीथीन अंथरले जाते आणि त्यावर बारीक दगड, वाळू आणि थोडी काळी माती टाकण्यात येते. त्यामुळे हे पानवठे एकदम नैसर्गिक वाटतात आणि त्यामध्ये पाणी सुध्दा साचुन राहते. सदर पानवठे ज्या भागात वन्यप्राण्यांचा अधिक वावर आहे अशा भागामध्ये घेण्यात आले. त्यासाठी सन्मानग्रुपचे हि भरपूर सहकार्य मिळाले. त्यांनी जागा शोधण्यास मदत केली तर सदर पानवठ्यामध्ये एप्रील, मे आणि जून असे दोन ते अडीच महिने जोपर्यंत पाऊस पडत नाही. तोपर्यंत टँकरने पाणी सोडण्यात येईल, असे वनपरिक्षेत्राधिकारी नवनाथ कांबळे यांनी सांगितले.