शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मेहकरमध्ये दहाव्या दिवशी पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 14:55 IST

कोराडी प्रकल्पाच्या जलसाठ्यात आतापर्यंत काहीच वाढ न झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट स्वरूप धारण करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोराडी प्रकल्पाच्या जलसाठ्यात आतापर्यंत काहीच वाढ न झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट स्वरूप धारण करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सध्या शहराला दहाव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येतो. शासनाने तत्काळ वाढीव पाणीपुरवठा योजना तयार करून होणाºया समस्यांवर तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरत आहे.शहरात एकूण ७ हजार ९०० नळ कनेक्शनधारक आहेत. पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले. मात्र शहराला पाणीपुरवठा करणाºया कोराडी प्रकल्पातील साठ्यात वाढ झाली नाही. शहराला मृत साठ्यातूनच पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यावर्षी पावसाळ्यात साखरखेर्डा, लव्हाळा, मेरा आदी भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने कोराडी प्रकल्पाच्या जलसाठ्यात काहीच वाढ झाली नाही.येत्या एका महिन्यात पाऊस झाला नाही तर शहराला दहाव्या दिवशी होणारा पाणीपुरवठा १५ ते २० दिवसाआड जाण्याची शक्यता आहे. नगरपरिषद दरवर्षी या कोराडी प्रकल्पातून १.८६ दलघमी पाणी आरक्षित करते व शहराला दीड तास पाणीपुरवठा करण्यात येत आहे.सामान्य लोकांजवळ पाणी साठवण्यासाठी काहीच सुविधा नसल्याने नगरपरिषदेने एक तास पाणीपुरवठा केल्यास आठव्या दिवशी पाणीपुरवठा होऊ शकतो. दुसरीकडे मेहकर उपविभागातील सावंगी माळी, सावंगी वीर, चायगाव आधी प्रकल्पातही पाणी नसल्याने येणाºया दिवसात ही समस्या गंभीर स्वरूप धारण करण्याची चिन्हे दिसत आहेत.त्यासाठी शासनाने पेनटाकळी प्रकल्पातून पाण्याचे रिझर्वेशन काढून लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून शहराला पाणीपुरवठा केला तर ही समस्या काही अंशी सुटण्यास मदत होऊ शकते. शासनाने तत्काळ भविष्यात होणाºया पाणी समस्यांकडे लक्ष देऊन वाढीव पाणीपुरवठा योजना तयार करावी, अशी मागणी जोर धरत आहे. दहा दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील सर्व वॉर्डातील पाणीपुरवठा सुरळित करण्याची गरज आहे.

बुलडाण्यातील पाणीपुरवठा विस्कळितबुलडाणा: बुलडाणा शहराला येळगाव धरणावरुन पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र गेल्या आठ दिवसांपासून शहरवासियांना पाणी मिळाले नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.यंदा पावसाळ्याच्या सुरवातीलाच येळगाव धरण ओव्हर फ्लो झाले. त्यामुळे बुलडाणेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली. मात्र गेल्या आठ दिवसांपासून शहरात पाणीपुरवठा झालेला नाही. पाणीपुरवठा कनेक्शनची महावितरणची तार जळाल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले. येळगाव धरणावरुन आजूबाजूच्या गावांनाही पाणीपुरवठा करण्यात येतो. विजेची समस्या निर्माण झाल्याने त्या गावांचाही पाणीपुरवठा प्रभावित झाला. ऐन पावसाळ्यात पाणीसमस्येला सामोरे जावे लागत असल्याने बुलडाणेकर त्रस्त झाले आहेत. तसेच ग्रामिण भागातही पाणीटंचाई निर्माण झाली. पाणीपुरवठा सुरळित करण्याची गरज आहे. सध्या येळगाव धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्याद्वारे बुलडाणा व आजूबाजूच्या खेड्यांचीही तहान भागविली जावू शकते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकरwater transportजलवाहतूक