शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
4
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
5
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
6
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
7
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
10
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
12
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
13
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
14
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
15
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
16
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
17
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
18
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
19
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

पाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराची होणार चौकशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 02:08 IST

बुलडाणा : जिल्ह्यातील १४२० गावातील पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाला असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली होती.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचा आदेश : वरिष्ठ अधिका-यांकडून होणार चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील १४२० गावातील पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाला असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली होती. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले असून, चौकशीसाठी आयएएस अधिकाºयांची नियुक्ती केली आहे.जिल्ह्यातील १४२० गावातील पाणीपुरवठा योजनेतील कामांचे चावडी वाचन करून भ्रष्टाचार करणाºयांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा २६ जानेवारीनंतर भ्रष्टाचारी व्यक्तीविरुद्ध कार्यवाही न करणाºयाची हत्या करेल, असा इशारा माजी मंत्री सुबोध सावजी यांनी दिला होता, तसेच व्टिटरवर या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून याची दखल घेत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे, तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता वरिष्ठ आयएएस अधिकाºयांची नेमणूक करण्यात येणार असून, सदर अधिकारी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे उत्तर मुख्यमंत्री कार्यालयाद्वारे व्टिट करून देण्यात आले आहे.बुलडाणा जिल्ह्यातील १४२० गावामध्ये राष्टÑीय पेयजल योजना, महाजल योजना, ग्रामीण पाणी पुरवठा तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना यांच्यावर व या योजनांच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला; परंतु नळ योजनेतून पाणी मिळाले नाही. तर भरपावसाळ्यात ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. ढिसाळ नियोजनामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. जिल्ह्यातील १४२० गावांमध्ये कमीत कमी १ ते जास्तीत जास्त ३ नळ योजना झालेल्या आहेत व होत आहे; परंतु जिल्हाभर नळ पाणीपुरवठा योजनेमार्फत पिण्याच्या पाण्याचा कडकडीत ठणठणाट आहे. १४२० गावामध्ये नळयोजनेच्या काही ठिकाणी कामाची सुरुवात झाली, तर काही ठिकाणी अद्याप सुरुवातही झाली नाही. याबाबत माजी मंत्री सुबोध सावजी व शैलेश सावजी आवाज उठवित पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच याकरिता एका समितीचेही गठन करण्यात आले आहे. याची थेट मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून, चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीत काय उघड होते व कुणावर कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पाण्यासाठी गेला अनेकांचा बळीजिल्ह्यातील १४२० गावात कोट्यवधीचा निधी खर्च होऊनही दरवर्षी महिला, पुरुष व जनावरांची जीवित हानी होते. आतापर्यंत पिण्याच्या पाण्याच्या कारणास्तव जवळपास १०० बळी गेलेले आहे. विहिरीमध्ये महिलांचा पडून मृत्यू होणे, पाणी आणताना पडल्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. हे सर्व नागरिक शासनाच्या उदासीन धोरणाचे बळी ठरले आहेत; मात्र त्यानंतरही याकडे शासनाने गांभिर्याने लक्ष दिले नाही.मुख्यमंत्र्यांनी चौकशी सुरू केली आहे. ही चांगली बाब आहे. ज्या अधिकाºयांनी भ्रष्टाचार केला, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत, त्यांच्याकडून रकमेची वसुली होत नाही. तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. नागरिकांच्या घरात जोपर्यंत पाणी जात नाही, तोपर्यंत आम्ही लढा सुरूच ठेवणार आहे.- सुबोध सावजी, माजी मंत्री, बुलडाणा.