शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
3
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
4
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
5
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
6
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
7
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
8
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
9
'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
10
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
11
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
12
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
13
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!
14
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
15
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
16
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
17
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
18
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
19
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
20
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार

पाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराची होणार चौकशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 02:08 IST

बुलडाणा : जिल्ह्यातील १४२० गावातील पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाला असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली होती.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचा आदेश : वरिष्ठ अधिका-यांकडून होणार चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील १४२० गावातील पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाला असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली होती. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले असून, चौकशीसाठी आयएएस अधिकाºयांची नियुक्ती केली आहे.जिल्ह्यातील १४२० गावातील पाणीपुरवठा योजनेतील कामांचे चावडी वाचन करून भ्रष्टाचार करणाºयांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा २६ जानेवारीनंतर भ्रष्टाचारी व्यक्तीविरुद्ध कार्यवाही न करणाºयाची हत्या करेल, असा इशारा माजी मंत्री सुबोध सावजी यांनी दिला होता, तसेच व्टिटरवर या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून याची दखल घेत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे, तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता वरिष्ठ आयएएस अधिकाºयांची नेमणूक करण्यात येणार असून, सदर अधिकारी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे उत्तर मुख्यमंत्री कार्यालयाद्वारे व्टिट करून देण्यात आले आहे.बुलडाणा जिल्ह्यातील १४२० गावामध्ये राष्टÑीय पेयजल योजना, महाजल योजना, ग्रामीण पाणी पुरवठा तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना यांच्यावर व या योजनांच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला; परंतु नळ योजनेतून पाणी मिळाले नाही. तर भरपावसाळ्यात ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. ढिसाळ नियोजनामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. जिल्ह्यातील १४२० गावांमध्ये कमीत कमी १ ते जास्तीत जास्त ३ नळ योजना झालेल्या आहेत व होत आहे; परंतु जिल्हाभर नळ पाणीपुरवठा योजनेमार्फत पिण्याच्या पाण्याचा कडकडीत ठणठणाट आहे. १४२० गावामध्ये नळयोजनेच्या काही ठिकाणी कामाची सुरुवात झाली, तर काही ठिकाणी अद्याप सुरुवातही झाली नाही. याबाबत माजी मंत्री सुबोध सावजी व शैलेश सावजी आवाज उठवित पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच याकरिता एका समितीचेही गठन करण्यात आले आहे. याची थेट मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून, चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीत काय उघड होते व कुणावर कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पाण्यासाठी गेला अनेकांचा बळीजिल्ह्यातील १४२० गावात कोट्यवधीचा निधी खर्च होऊनही दरवर्षी महिला, पुरुष व जनावरांची जीवित हानी होते. आतापर्यंत पिण्याच्या पाण्याच्या कारणास्तव जवळपास १०० बळी गेलेले आहे. विहिरीमध्ये महिलांचा पडून मृत्यू होणे, पाणी आणताना पडल्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. हे सर्व नागरिक शासनाच्या उदासीन धोरणाचे बळी ठरले आहेत; मात्र त्यानंतरही याकडे शासनाने गांभिर्याने लक्ष दिले नाही.मुख्यमंत्र्यांनी चौकशी सुरू केली आहे. ही चांगली बाब आहे. ज्या अधिकाºयांनी भ्रष्टाचार केला, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत, त्यांच्याकडून रकमेची वसुली होत नाही. तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. नागरिकांच्या घरात जोपर्यंत पाणी जात नाही, तोपर्यंत आम्ही लढा सुरूच ठेवणार आहे.- सुबोध सावजी, माजी मंत्री, बुलडाणा.